AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहमदनगरमध्ये लॉकडाऊनची गरज नाही : पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अहमदनगरला लॉकडाऊनची कोणतीही गरज नाही. प्रशासनाने सर्व खबरदारी घेतल्याचं मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं आहे (Hasan Mushrif on Ahmednagar lockdown need).

अहमदनगरमध्ये लॉकडाऊनची गरज नाही : पालकमंत्री हसन मुश्रीफ
| Updated on: Jul 25, 2020 | 2:17 PM
Share

अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अहमदनगरला लॉकडाऊनची कोणतीही गरज नाही. प्रशासनाने सर्व खबरदारी घेतल्याचं मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं आहे (Hasan Mushrif on Ahmednagar lockdown need). नागरिकांनीच योग्य ती खबरदारी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. त्यामुळे तूर्तास तरी अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊन होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. हसन मुश्रीफ यांनी आज (25 जुलै) जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे ही आढावा बैठक झाली.

ग्रामपंचायत मुदत संपल्यावर पालकमंत्र्यांच्या शिफारशीने ग्रामपंचायतवर प्रशासक नेमावा असं परिपत्रक ग्रामविकास विभागाने काढलं आहे. यावर उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश काढत प्रशासक हा शासकीय अधिकारी नेमावा असं म्हटलं. शिवाय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पालकमंत्र्यांच्या शिफारशीला विरोध केला. मात्र, गावगाडा चालू राहण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती असल्याचं स्पष्टीकरण हसन मुश्रीफ यांनी दिलं. इतकेच नाही तर सध्या ग्रामपंचायत कारभार चालवणं हा छातीवरचा धोंडा असल्याचंही ते म्हणाले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

‘बकरी ईद में बचेंगे तो मोहरम में नाचेंगे’

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुस्लीम बांधवांनी बकरी ईद घरीच साजरा करावा, असं आवाहन केलं आहे. ‘बकरी ईद में बचेंगे, तो मोहरम में नाचेंगे’ असं म्हणत त्यांनी पुढील वर्षी उत्साहात ईद साजरा करण्याचा आशावाद व्यक्त केला.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 858 पर्यंत पोहचली आहे. आज 70 नव्या कोरोना रुग्णांची बर पडली आहे. यापैकी आतापर्यंत उपचारानंतर 1480 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच 1327 रुग्ण कोरोना सक्रीय असून ते उपचार घेत आहेत. अहमदनगरमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये संगमनेर तालुक्यातील 12, पारनेर तालुक्यातील 5, नेवासा तालुक्यातील 2, राहातामधील 11, राहुरी 7, कोपरगाव 3, नगर ग्रामीण 3, नगर शहर 11, पाथर्डी 1, शेवगाव 1, भिंगार 10, कर्जत 2, अकोले तालुका 1, नांदेड 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा :

युद्ध असो वा नैसर्गिक आपत्ती निवडणुका घेतल्याच पाहिजे, न्यायालयाने आदेश काढावा : प्रकाश आंबेडकर

राज्यात आतापर्यंत 8232 पोलिसांना कोरोना, 93 पोलिसांचा मृत्यू

माझ्या मतदारसंघात सर्वात आधी राम मंदिर बांधलं, पण कोरोना संकटात डॉक्टर हाच देव : जयंत पाटील

Hasan Mushrif on Ahmednagar lockdown need

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.