सर्वपक्षीय बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार, दिल्लीत घडामोडींना वेग, अरविंद सावंत म्हणाले, सुरूवातच..
आज सर्वपक्षीय बैठक दिल्लीत बोलावण्यात आली होती. मात्र, बैठकीला सुरूवात होऊन काही वेळ होताच विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. विरोधी पक्षाचे प्रमुख गट नेत्यांनी बैठकीतून बाहेर येत बहिष्कार टाकला. यावर अरविंद सावंत यांनी मोठे भाष्य केले.

शिवसेना ठाकरे गटाच्या तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. त्यातच काल या बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी मंजुरी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यातच आता TMC च्या फुटीर खासदारांना बैठकीसाठी बोलावल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यांनी जोरदार विरोध करत बैठक सोडली आणि बैठकीवर बहिष्कार टाकला. यावर नुकताच खासदार अरविंद सावंत यांनी मोठे विधान केले. अरविंद सावंत यांनी म्हटले की, सरकारने बैठक बोलावली होती. त्या बैठकीत तृणमूल काँग्रेस आणि आम्ही आमच्या पक्षातून लोक बाहेर पडले तृणमूल काँग्रेसची संख्या 28 केली आणि जे 20 जण आहेत, त्यांना वेगळी बसण्याची व्यवस्था करण्यात आली.
ते ज्या पक्षात गेले तो पक्षच कुठे अस्थित्वात आहे की नाही माहिती नाही. त्यांचा मुद्दा वेगळा आहे आणि आमचा मुद्दा वेगळा आहे. आमच्या मुद्द्यात त्यांनी सुरूवातच अशी केलेली आहे की, 6 जणांना आम्ही अॅपिलेशन मान्य केले. पण अॅपिलिकेशन हा शब्द कायद्यात कुठेही मान्य नाही. घटनेमध्ये अशी कोणतीही तरतूद नसताना अशा लोकांना मान्यता देणे गैर आहे.
म्हणून आज आम्ही सर्वांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. सर्वपक्षीय बैठकीतून विरोधक बाहेर पडले आहेत. या सर्वपक्षीय बैठकीत सर्वच प्रमुख नेते पोहोचले होते. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व पक्षाचे नेते बैठकीला पोहोचले होते. मात्र, बैठकीला सुरूवात होताच यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बैठकीतून बाहेर येण्याचा निर्णय घेतला.
तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांनी बंडखोरी केली. त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. त्याच गटाच्या गटनेत्याला या बैठकीला बोलावण्यात आल्याने विरोधक आक्रमक झाले. हे 20 खासदार तृणमूल काँग्रेसचेच असल्याचा दावा करण्यात आला. उद्यापासून अधिवेशनाला सुरूवात होत आहे. त्यापूर्वीच विरोधक आक्रमक भूमिका घेत आहेत. हे अधिवेशन जोरदार गाजणार असल्याचे स्पष्ट आहे.
