AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hingoli Incident : औंढा नागनाथ मंदिरातील गेट कोसळला, दहा वर्षाच्या बालकाचा दबून मृत्यू

घरची परिस्थिती बेताची असल्याने दहा वर्षाचा चिमुकला औंढा नागनाथ मंदिरात गंध लावण्याचे काम करायचा. नेहमीप्रमाणे तो आज सकाळी मंदिरात गेला, पण पुन्हा घरी परतलाच नाही.

Hingoli Incident : औंढा नागनाथ मंदिरातील गेट कोसळला, दहा वर्षाच्या बालकाचा दबून मृत्यू
मंदिराचा गेट अंगावर कोसळून मुलाचा मृत्यूImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 25, 2023 | 12:59 PM
Share

हिंगोली / 25 जुलै 2023 : औंढा नागनाथ येथील बारा ज्योतिर्लिंग एक असलेल्या मंदिराच्या पूर्व दिशेला मंदिराच्या बाहेर जाण्यासाठी लावण्यात आलेला लोखंडी गेट कोसळल्याची घटना आज सकाळी सातच्या सुमारास घडली. या गेटखाली दबून दहा वर्षाच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बालकाचा मृतेदह रुग्णालयात पाठवण्यात आला. पीडित मुलगा नागनाथ मंदिर परिसरात गंध लावण्याचे काम करुन उदरनिर्वाह करत होता. औंढा नागनाथ बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. यामुळे येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. आज घडलेल्या घटनेमुळे भाविकांच्याही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मंदिरात गंध लावण्याचे काम करत होता चिमुकला

पीडित कुटुंब मूळचे लातूरचे असून, गेली अनेक वर्षे कामानिमित्त औंढा नागनाथ येथे राहतात. घरची परिस्थिती बेताची असल्याने आणि आई-वडिलांना काम करणे जमत नसल्याने मयत मुलगा सकाळी मंदिर परिसरात गंध लावण्याचे काम करुन पैसे कमवायचा. या पैशाने कुटुंबाला हातभार लावत होता. मंदिरात काम करुन तो शाळेत जायचा. तो नेहमीप्रमाणे आज सकाळी मंदिरात गंध लावण्याचे काम करण्यासाठी गेला.

मंदिर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुर्घटना

सकाळी 7 वाजता मंदिरातून बाहेर पडत असतानाच नागनाथ मंदिराच्या पूर्व दिशेला असलेला गेट त्याच्या अंगावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हा गेट तारेने बांधलेला होता. मुलाचा त्याला धक्का लागल्याने गेट अंगावर पडला आणि ही दुर्घटना घडली. मंदिर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. आता चौकशी करून दोषींवर काय कावाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.