AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gadchiroli | भामरागड तालुक्यात अजूनही 150 घरे पाण्याखाली, पुरामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

सततच्या पावसामुळे गडचिरोलीतील नद्यांना पूर आला होता. इतकेच नाही तर गेल्या तीन दिवसांपासून अनेक भागांमध्ये विजपुरवठा खंडित देखील करण्यात आलायं. यामुळे भामरागड वासियांचे जनजीवन विस्कळीत झाले. पुरामुळे 214 नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.

Gadchiroli | भामरागड तालुक्यात अजूनही 150 घरे पाण्याखाली, पुरामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत
| Edited By: | Updated on: Aug 18, 2022 | 11:38 AM
Share

गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात मागील तीन दिवसांपासून पूर स्थिती कायम होती. आज सकाळपासून पूर ओसरत आलायं. मात्र, अजूनही अनेक घरेही पाण्याखालीच आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस (Rain) सुरूयं. यामुळे नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला. या पावसाचा सर्वाधिक फटका हा गडचिरोली जिल्हामध्ये बसलेला दिसतोयं. भामरागड (Bhamragarh) तालुक्यातील जवळपास 150 घरे पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.

पुरामुळे 214 नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी हलविले

सततच्या पावसामुळे गडचिरोलीतील नद्यांना पूर आला होता. इतकेच नाही तर गेल्या तीन दिवसांपासून अनेक भागांमध्ये विजपुरवठा खंडित देखील करण्यात आलायं. यामुळे भामरागड वासियांचे जनजीवन विस्कळीत झाले. पुरामुळे 214 नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती.

वीज सेवा खंडित नागरिकांचे मोठे हाल

14 ऑगस्टपासून भामरागड तालुक्यात सातत्याने मुसळधार पाऊस कोसळत असल्याने तेथील वीज सेवा खंडित करण्यात आली होती. इतकेच नाही तर 14 ऑगस्टपासून दूरध्वनी सेवा देखील खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या समस्या निर्माण झाल्या होत्या. जिल्ह्यात पुराचा सर्वात जास्त फटका भामरागड तालुक्यालाच बसल्याचे बोलले जात आहे. इंद्रावती नदीची पाणी पातळी अजूनही जास्तच आहे.

पावसामुळे घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान

दहा दिवस गडचिरोली जिल्ह्यात पुराची स्थिती होती. दक्षिण गडचिरोलीत केले दहा दिवस पुराने हाहाकार माजविला होता. या पावसामध्ये घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. एक जूनपासून जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 169 टक्के पावसाची नोंद झाली आहे. आता कुठेतरी पूरस्थिती दूर झालीयं. मात्र, अजूनही वीज सेवा खंडितच आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.