AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gadchiroli | भामरागड तालुक्यात अजूनही 150 घरे पाण्याखाली, पुरामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

सततच्या पावसामुळे गडचिरोलीतील नद्यांना पूर आला होता. इतकेच नाही तर गेल्या तीन दिवसांपासून अनेक भागांमध्ये विजपुरवठा खंडित देखील करण्यात आलायं. यामुळे भामरागड वासियांचे जनजीवन विस्कळीत झाले. पुरामुळे 214 नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.

Gadchiroli | भामरागड तालुक्यात अजूनही 150 घरे पाण्याखाली, पुरामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत
| Edited By: | Updated on: Aug 18, 2022 | 11:38 AM
Share

गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात मागील तीन दिवसांपासून पूर स्थिती कायम होती. आज सकाळपासून पूर ओसरत आलायं. मात्र, अजूनही अनेक घरेही पाण्याखालीच आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस (Rain) सुरूयं. यामुळे नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला. या पावसाचा सर्वाधिक फटका हा गडचिरोली जिल्हामध्ये बसलेला दिसतोयं. भामरागड (Bhamragarh) तालुक्यातील जवळपास 150 घरे पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.

पुरामुळे 214 नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी हलविले

सततच्या पावसामुळे गडचिरोलीतील नद्यांना पूर आला होता. इतकेच नाही तर गेल्या तीन दिवसांपासून अनेक भागांमध्ये विजपुरवठा खंडित देखील करण्यात आलायं. यामुळे भामरागड वासियांचे जनजीवन विस्कळीत झाले. पुरामुळे 214 नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती.

वीज सेवा खंडित नागरिकांचे मोठे हाल

14 ऑगस्टपासून भामरागड तालुक्यात सातत्याने मुसळधार पाऊस कोसळत असल्याने तेथील वीज सेवा खंडित करण्यात आली होती. इतकेच नाही तर 14 ऑगस्टपासून दूरध्वनी सेवा देखील खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या समस्या निर्माण झाल्या होत्या. जिल्ह्यात पुराचा सर्वात जास्त फटका भामरागड तालुक्यालाच बसल्याचे बोलले जात आहे. इंद्रावती नदीची पाणी पातळी अजूनही जास्तच आहे.

पावसामुळे घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान

दहा दिवस गडचिरोली जिल्ह्यात पुराची स्थिती होती. दक्षिण गडचिरोलीत केले दहा दिवस पुराने हाहाकार माजविला होता. या पावसामध्ये घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. एक जूनपासून जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 169 टक्के पावसाची नोंद झाली आहे. आता कुठेतरी पूरस्थिती दूर झालीयं. मात्र, अजूनही वीज सेवा खंडितच आहे.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.