AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : मध्यप्रदेशसह विदर्भात पावसाची बॅटिंग, हतनूर धरणाच्या 16 दरवाज्यातून दुसऱ्या दिवशी विसर्ग सुरु

मध्यप्रदेश आणि विदर्भात जोरदार पावसामुळे हतनूर धरणात साठा वाढला असल्यानं सलग दुसऱ्या दिवशी हतनूर धरणातून पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं आहे.

Video : मध्यप्रदेशसह विदर्भात पावसाची बॅटिंग, हतनूर धरणाच्या 16 दरवाज्यातून दुसऱ्या दिवशी विसर्ग सुरु
हतनूर धरण
| Edited By: | Updated on: Jul 13, 2021 | 3:14 PM
Share

जळगाव:मध्यप्रदेश आणि विदर्भात जोरदार पावसामुळे हतनूर धरणात साठा वाढला असल्यानं सलग दुसऱ्या दिवशी हतनूर धरणातून पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं आहे. भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे 16 दरवाजे उघडले असून यातून 37 हजार 575 क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नदीकाठच्या गावांना जलसंपदा विभागानं आणि जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.

16 दरवाजातून विसर्ग सुरु

हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं हजेरी लावल्यानं पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे आज पुन्हा दुसऱ्या दिवशी ही भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे 16 दरवाजे पूर्णपणे उघडले आहेत. पूर्णा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे हातनूर क्षेत्रात पाण्याची पातळी वाढल्यामुळे 16 दरवाजे उघडण्यात आले आहेत, अशी माहिती हतनूर प्रशासनाची आहे. हतनूर धरणातून 37575 क्युसेस एवढा पाण्याचा विसर्ग तापी नदीत सोडण्यात आला आहे.

सोमवारीही पाण्याचा विसर्ग सुरु

गेल्या काही दिवसांपासून जळगावात मुसळधार पाऊस कोसळत आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने सोमवारी धरणाचे 16 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. यामुळे नदीकाठच्या गावात नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

नदीपात्रात गुरेढोरे न सोडण्याचे आवाहन

येत्या काही तासात नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाची पाणीपातळी नियंत्रित करण्याकरिता द्वार परिचालन करण्यात येईल आणि नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येईल. तसेच पुढील 24 ते 48 तासात पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता आहे. पाण्याचा प्रवाह लक्षात घेता नदी पात्रात विसर्ग वाढू शकतो. त्यामुळे तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये आणि नदी पात्रामध्ये जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे जिल्हा प्रशासनाने कडून कळविण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

VIDEO | जळगावात तुफान पाऊस, हतनूर धरणाचे 16 दरवाजे उघडले

दहा तासांच्या प्रतिक्षेनंतर एकनाथ शिंदे जळगाव महापालिकेत आले; मात्र नगरसेवकांच्या पदरी निराशाच

(Jalgaon hatnur dam 16 gates opened to release in Tapi river due to rain in watershed area)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.