AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nandurbar Accident : भरधाव वाहनानं 3 दुचाकींना चिरडले, दिवाळीत 5 जणांवर काळाचा घाला, अपघाताने गावावर शोककळा

Accident Near Pimpod Village : नंदुरबार तालुक्यातील पिंपळोद गावाजवळ भीषण अपघात झाला. अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो वाहनाने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या 3 मोटरसायकलींना चिरडले. ऐन दिवाळीत 5 जणांवर काळाने घाला घातला.

Nandurbar Accident : भरधाव वाहनानं 3 दुचाकींना चिरडले, दिवाळीत 5 जणांवर काळाचा घाला, अपघाताने गावावर शोककळा
नंदुरबार अपघात
| Updated on: Nov 03, 2024 | 8:59 AM
Share

राज्यात रस्ते वाहन अपघाताचे सत्र सुरूच आहे. नंदुरबार तालुक्यातील पिंपळोद गावाजवळ भीषण अपघात घडला. या अपघातात त 5 जणांचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. भरधाव वेगात असणाऱ्या बोलेरो वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असेल्या 3 दुचाकींना चिरडले. ऐन दिवाळीत कुटुंबावर शोककळा पसरली. 2 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातात चार चाकी वाहनांसह मोटरसायकलींचा जागीच चुरडा झाला.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, 2 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता नंदुरबार ते धानोरा रस्त्यावर लोय पिंपळोद गावाजवळ हा अपघात घडला. एक मोटारसायकल नादुरुस्त होती. अंधार असल्याने दुचाकी दुरूस्तीसाठी इतर दोन दुचाकी घटनास्थळी आल्या होत्या. त्यावेळी नंदुरबारकडून धानोराकडे एक बोलेरो भरधाव वेगात जात होती. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या तीन दुचाकीला चिरडले. त्यात 5 जणांचा मृत्यू झाला.

या अपघातात योगेश कालूसिंग नाईक, राहुल धर्मेंद्र वळवी, अनिल सोन्या मोरे, चेतन सुनील नाईक, श्रीकृष्ण लालसिंग ठाकरे यांचा मृत्यू झाला. तीन दुचाकींना ठोकरल्यानंतर बोलेरो गाडीही उलटली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऐन दिवाळीतच या गावावर शोककळा पसरली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी गर्दी केली. त्यांच्या आक्रोशाने अनेकांची मनं हेलावली.

दोन खासगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक, अपघातात 1 जण ठार तर 20 जण जखमी

वाशिमच्या कामरगाव जवळ रात्री दोन वाजताच्या सुमारास दोन खासगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली. भीषण अपघात झाला असून यामध्ये रॉयल ट्रॅव्हल्सचा चालक श्रीधर कायवाडे हा जागीच ठार तर 20 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. शब्रिज आणि रॉयल ट्रॅव्हल्स मध्ये ही भीषण धडक झाली. दोन्ही ट्रॅव्हल्स मधील जखमींना अमरावती च्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.अपघाता नंतर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.