AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिराळा पोलीस ठाण्याच्या कामगिरीतून इतरांनी प्रेरणा घ्यावी; राज्यातील पोलीस उत्तम काम करत आहेत – जयंत पाटील

कोणावरही अन्याय होणार नाही, हीच आमच्या सरकारची जबाबदारी आहे. सध्या राज्यातील पोलीस उत्कृष्ट काम करत आहेत. पोलिसांनी अधिकाधिक चांगले काम करावे त्यासाठी पोलीस दलात चांगल्या अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. पोलीस चोवीस तास जनतेसाठीच काम करत असतात, असे प्रतिपादन मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

शिराळा पोलीस ठाण्याच्या कामगिरीतून इतरांनी प्रेरणा घ्यावी; राज्यातील पोलीस उत्तम काम करत आहेत - जयंत पाटील
| Edited By: | Updated on: Dec 06, 2021 | 6:21 AM
Share

सांगली : कोणावरही अन्याय होणार नाही, हीच आमच्या सरकारची जबाबदारी आहे. सध्या राज्यातील पोलीस उत्कृष्ट काम करत आहेत. पोलिसांनी अधिकाधिक चांगले काम करावे त्यासाठी पोलीस दलात चांगल्या अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. पोलीस चोवीस तास जनतेसाठीच काम करत असतात, असे प्रतिपादन मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. सांगलीच्या शिराळा पोलीस ठाण्याचा देशातील सर्वोत्तम पोलीस ठाण्याच्या यादीत सातवा क्रमांक आला आहे. याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पाटील बोलत होते.

चांगल्या दर्जासाठी सर्वांनी प्रयत्न करावे

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, शिराळा पोलीस ठाण्याचे हे यश राज्यातील इतर पोलीस ठाण्यांना प्रेरणा देणारे आहे. आयएसओ मानांकनामुळे पोलीस ठाण्याचा चेहरा -मोहरा बदलू लागला आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात स्वच्छता व नीटनेटकेपणा आला आहे. बदलत्या काळानुसार नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत पोलीस प्रशासनाने आमूलाग्र बदल घडवले आहेत. शिराळा पोलीस ठाण्याला मिळालेला दर्जा कायम ठेवण्याची जबाबदारी ही आता सर्वांची आहे.

पाणी प्रश्नावरून फडणवीसांना प्रत्युत्तर 

दरम्यान त्यापूर्वी त्यांनी फडणवीस यांनी पुण्याच्या पाणी प्रश्नावरून सरकारवर केलेल्या टिकेला देखील प्रत्युत्तर दिले. पुण्याच्या पाणी कपातीबाबत महाराष्ट्र सरकारचा किंवा जलसंपदा विभागाचा कोणताही प्रस्ताव नाही. कोणताही विचार झालेला नाही. जे पत्र पालिकेला देण्यात आलंय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशी 11 पत्र देण्यात आली होती. त्यांनी 180 एमएलडी पाणी बंद केलं होतं. असं आमचं धोरण नाही. त्यांनी काल येऊन सांगितलं मात्र पाणी कपातही त्यांनीच केली होती. त्यांनाच पुणेकर धडा शिकवतील. 180 एमएलडी पाणी कपात पुणेकरांना सहन करावी लागली, अशा शब्दात जयंत पाटील यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे.

संबंधित बातम्या 

Omicron : राज्यात आणखी 7 जणांना ओमिक्रॉन, पिंपरी-चिंचवडमध्ये 6, पुण्यात 1 ओमिक्रॉनबाधित

Omicron cases: धोका वाढला! पिंपरी-चिंचवडमध्ये दोन लहान मुलींना ओमिक्रॉनची लागण, आरोग्य विभागाचे धाबे दणाणले

Omicron : ओमिक्रॉनचे 8 रुग्ण आढळल्याने राज्याचे धाबे दणाणले, दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांशी बैठक

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.