AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वाभिमानीचा ऊस बिलासाठी आंदोलनाचा इशारा, शेतकऱ्यांच्या खात्यावर 21जूनपासून पैसे जमा होणार, संजयकाका पाटील यांची माहिती

तासगाव आणि नागेवाडी कारखान्याची थकीत बिले सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होईल,त्याचबरोबर एकही शेतकऱ्यांचे पैसे बुडणार नाहीत,असा विश्वास खासदार संजयकाका पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

स्वाभिमानीचा ऊस बिलासाठी आंदोलनाचा इशारा, शेतकऱ्यांच्या खात्यावर 21जूनपासून पैसे जमा होणार, संजयकाका पाटील यांची माहिती
महेश खराडे, संजयकाका पाटील
| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 11:17 PM
Share

सांगली: तासगाव आणि नागेवाडी कारखान्याची थकीत बिले सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होईल. त्याचबरोबर एकही शेतकऱ्यांचे पैसे बुडणार नाहीत,असा विश्वास खासदार संजयकाका पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. थकीत बिलांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सागंली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. खासदार संजयकाका पाटील यांनी त्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. (Sanjaykaka Patil said Tasgaon and Nagewadi sugar mill transfer bill from Monday after protest warning of Swabhimani Shetkari Sanghatna)

स्वाभिमानीचा आंदोलनाचा इशारा

तासगाव आणि विटयाच्या नागेवाडी साखर कारखान्यांकडून गेल्या सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांची उसाची बिल देण्यात आलेले नाहीत. या थकीत बिलाच्या मागणीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून खासदार संजय काका पाटील यांच्या मालकीच्या कारखान्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते.त्यानंतर संजय काका पाटील यांनी शुक्रवारपर्यंत पैसे जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं.मात्र तरीही पैसे जमा झाले नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 21 जून ला सोमवारी खासदार संजयकाका पाटील यांच्यावर आरोप करत घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा महेश खराडे यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांना चार पैसे मिळतील यासाठी प्रयत्न

खासदार संजयकाका पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन तासगाव आणि नागेवाडी या दोन साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चार अधिक पैसे मिळतील यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. तसेच या दोन्ही कारखान्यांच्या माध्यमातून उपपदार्थ बनवण्याचे प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. केंद्राकडूनही याला मान्यता मिळाली आहे,हे प्रकल्प उभारन्यासाठी केलेल्या गुंतवणूक यामुळे शेतकऱ्यांची बिल देण्यास विलंब झाला. त्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो, असं संजयकाका पाटील म्हणाले.

शेतकऱ्यांचे पैसे कोणत्याही परिस्थितीत बुडणार नाहीत,लवकरच या दोन्ही कारखान्याच्या माध्यमातून उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना चांगला दर देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही ग्वाहीही संजयकाका पाटील यांनी दिली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन करत कोणताही उद्योग आपण लपून केला नसल्याचेही खासदार संजयकाका पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्री म्हणाले, स्वबळाची भाषा केली तर लोक जोड्यानं हाणतील, त्यावर नाना पटोले म्हणतात…

कोरोना काळातल्या कष्टाचा सन्मान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन” ने सन्मानित

(Sanjaykaka Patil said Tasgaon and Nagewadi sugar mill transfer bill from monday after protest warning of Swabhimani Shetkari Sanghatna)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.