AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रवी राणा हे बच्चू कडूंबाबत खोटं बोलत असतील तर.., सुषमा अंधारे यांनी काय केलं पाहिजे ते सांगितलं

राज्यात जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर बोलणं गरजेचं आहे.

रवी राणा हे बच्चू कडूंबाबत खोटं बोलत असतील तर.., सुषमा अंधारे यांनी काय केलं पाहिजे ते सांगितलं
सुषमा अंधारे यांचा रोख कुणाकडं Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Oct 30, 2022 | 8:50 PM
Share

नांदेड : आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा या दोघांनाही सागर बंगल्यावर बोलावण्यात आलं आहे. त्यांची समोरासमोर चर्चा होणार असल्याचं कळतं. हा वाद मिटेल का, यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या गटनेच्या सुषमा अंधारे म्हणाल्या, तो त्यांचा लूकआऊट आहे. त्यांच्याकडं काय चाललं हे मी कसं सांगू शकते. पण, एक नक्की आहे. रवी राणा खोटं बोलत असतील, तर रवी राणानं केलेल्या सगळ्या आक्रस्ताळे विधानांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दंडीत केलं पाहिजे.

पण, रवी राणा खरं बोलत असतील तर मात्र कठीण आहे. या देशातील संसदीय लोकशाहीतील चौकटचं विस्कळून जात आहे. ते क्लीअरकट सांगत आहेत की, खोके घेऊन जाणाऱ्यांपैकी मी नाही.

लोकांमध्ये तुमची खोकेवाली सरकार अशी प्रतिमा झाली आहे. ही प्रतिमा कदाचित खरी आहे. मग,हे सगळे खोके घेऊन जाणारे लोकं आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खोके कोणी दिले.

अधिवेशन काळात अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाशक्तीच्या कृपेशिवाय हे शक्य नव्हतं. आम्ही रात्री मी आणि देवेंद्रजी वेष बदलून भेटत होतो.

खोके देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत गेले की, अजून कोणाच्या मार्फत गेले. याचंसुद्धा उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला मिळालं पाहिजे. कारण खोक्यांमधून गेलेले पैसे हे महाराष्ट्राच्या घामातून गेलेले पैसे आहेत.

राज्यात जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर बोलणं गरजेचं आहे. मुळात हिंदुत्व कशाची खातात हेच भाजपला माहीत नाही. भाजपचं राजकारण हे कायमचं द्वेषमुलक राजकारण राहिलं आहे.

भाजप जाती-धर्मामध्ये राजकारण करू पाहते. त्याला छेद देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कटिबद्ध असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.