AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रवी राणा हे बच्चू कडूंबाबत खोटं बोलत असतील तर.., सुषमा अंधारे यांनी काय केलं पाहिजे ते सांगितलं

राज्यात जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर बोलणं गरजेचं आहे.

रवी राणा हे बच्चू कडूंबाबत खोटं बोलत असतील तर.., सुषमा अंधारे यांनी काय केलं पाहिजे ते सांगितलं
सुषमा अंधारे यांचा रोख कुणाकडं Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Oct 30, 2022 | 8:50 PM
Share

नांदेड : आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा या दोघांनाही सागर बंगल्यावर बोलावण्यात आलं आहे. त्यांची समोरासमोर चर्चा होणार असल्याचं कळतं. हा वाद मिटेल का, यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या गटनेच्या सुषमा अंधारे म्हणाल्या, तो त्यांचा लूकआऊट आहे. त्यांच्याकडं काय चाललं हे मी कसं सांगू शकते. पण, एक नक्की आहे. रवी राणा खोटं बोलत असतील, तर रवी राणानं केलेल्या सगळ्या आक्रस्ताळे विधानांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दंडीत केलं पाहिजे.

पण, रवी राणा खरं बोलत असतील तर मात्र कठीण आहे. या देशातील संसदीय लोकशाहीतील चौकटचं विस्कळून जात आहे. ते क्लीअरकट सांगत आहेत की, खोके घेऊन जाणाऱ्यांपैकी मी नाही.

लोकांमध्ये तुमची खोकेवाली सरकार अशी प्रतिमा झाली आहे. ही प्रतिमा कदाचित खरी आहे. मग,हे सगळे खोके घेऊन जाणारे लोकं आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खोके कोणी दिले.

अधिवेशन काळात अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाशक्तीच्या कृपेशिवाय हे शक्य नव्हतं. आम्ही रात्री मी आणि देवेंद्रजी वेष बदलून भेटत होतो.

खोके देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत गेले की, अजून कोणाच्या मार्फत गेले. याचंसुद्धा उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला मिळालं पाहिजे. कारण खोक्यांमधून गेलेले पैसे हे महाराष्ट्राच्या घामातून गेलेले पैसे आहेत.

राज्यात जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर बोलणं गरजेचं आहे. मुळात हिंदुत्व कशाची खातात हेच भाजपला माहीत नाही. भाजपचं राजकारण हे कायमचं द्वेषमुलक राजकारण राहिलं आहे.

भाजप जाती-धर्मामध्ये राजकारण करू पाहते. त्याला छेद देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कटिबद्ध असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या.

ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला
ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला.
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर.
विधानसभेत बळीराजाच्या दुर्दशेवरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं
विधानसभेत बळीराजाच्या दुर्दशेवरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं....
अदानी, राहुल गांधी पहिल्यांदाच एकसाथ? पवारांच्या निवासस्थानी काय घडलं?
अदानी, राहुल गांधी पहिल्यांदाच एकसाथ? पवारांच्या निवासस्थानी काय घडलं?.
कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद... भाजप नेत्यांवर समोय्यांची नाराजी?
कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद... भाजप नेत्यांवर समोय्यांची नाराजी?.
मुख्यमंत्र्यांची महायुतीच्या आमदारांसह ब्रेकफास्ट मिटिंग, कशावर चर्चा?
मुख्यमंत्र्यांची महायुतीच्या आमदारांसह ब्रेकफास्ट मिटिंग, कशावर चर्चा?.
राज ठाकरे यांची ठाणे न्यायालयात आज सुनावणी, 2008 चं प्रकरण नेमकं काय?
राज ठाकरे यांची ठाणे न्यायालयात आज सुनावणी, 2008 चं प्रकरण नेमकं काय?.
सरकार आलं पण 1 वरून 2 नंबर झाले, शिंदेंवरून सभागृहात जोरदार टोलेबाजी
सरकार आलं पण 1 वरून 2 नंबर झाले, शिंदेंवरून सभागृहात जोरदार टोलेबाजी.
'एक नंबर'वरून आर.आर पाटलांचा भाषण चर्चेत अन् जयंत पाटलांचीही टोलेबाजी
'एक नंबर'वरून आर.आर पाटलांचा भाषण चर्चेत अन् जयंत पाटलांचीही टोलेबाजी.