AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात तिसरा महत्त्वाचा पक्ष म्हणून राजकारणात येणार बीआरएस?, बीआरएसला मिळणार यांची साथ

एमआयएम, छत्रपती संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर यांच्याशी चंद्रशेखर राव यांची जवळीक आगामी काळात राज्यातील समीकरण बदलू शकणारी ठरू शकते.

राज्यात तिसरा महत्त्वाचा पक्ष म्हणून राजकारणात येणार बीआरएस?, बीआरएसला मिळणार यांची साथ
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Jun 17, 2023 | 5:33 PM
Share

राजीव गिरी, प्रतिनिधी, नांदेड : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आपल्या बीआरएस या पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार करायला सुरुवात केलीय. नांदेडला दोन सभा घेतल्यानंतर के चंद्रशेखर राव यांनी औरंगाबाद आणि नागपूर इथेही सभा घेतल्या. अद्याप राज्य स्तरावरचा मोठा म्हणावा असा नेता बीआरएसच्या गळाला लागला नाही. पण स्थानिक पातळीवरच्या ताकतवान नेत्यांनी बीआरएस मध्ये प्रवेश केलाय. त्यातच एमआयएम, छत्रपती संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर यांच्याशी चंद्रशेखर राव यांची जवळीक आगामी काळात राज्यातील समीकरण बदलू शकणारी ठरू शकते.

असद ओवेसी यांच्या एमआयएम या राजकीय पक्षाने नांदेडमधून दहा वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात प्रवेश केला होता. त्यावेळी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत एमआयएमने मिळवलेले यश पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. याच एमआयएम पाठोपाठ हैदराबादचा बीआरएस हा राजकीय पक्ष आता नांदेडमार्ग राज्यात येऊ पाहतोय.

बीआरएसची मोर्चेबांधणी सुरू

नांदेडमधून शंकर अण्णा धोंडगे, सुरेश गायकवाड, यशपाल भिंगे, जाकेर चाऊस आणि नागनाथ घिसेवाड आदी मंडळींनी बीआरएसमध्ये प्रवेश केलाय. त्याचबरोबर हर्षवर्धन जाधव विदर्भातील राजू तोडसाम यांच्यासह काही काही माजी आमदारांनी बीआरएसमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे बीआरएस आता चांगलेच चर्चेत आलय. बीआरएस आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी करत असल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश दादा गायकवाड यांनी सांगितलंय.

अब की बार किसान सरकार

तेलंगणा राज्यातील लोक कल्याणकारी योजनांची प्रसिद्धी करत तशाच योजना महाराष्ट्रात राबवण्यासाठी केसीआरच्या हातात सत्ता द्या असे या पक्षाचे धोरण आहे. अब की बार किसान सरकार म्हणत केसीआर यांनी शेतकरी नेत्यांना प्रथम पसंती दिलीय. त्यातून नांदेडचे माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी बीआरएसमध्ये प्रवेश करत पक्षाचे जोरात काम सुरू केलंय. नुकताच शंकर अण्णा समर्थकांचा आमरसाची मेजवानी देत मेळावा घेतला. तेव्हा लोहा कंधारमधून निवडणूक लढवणार असल्याची घोषणादेखील त्यांनी केलीय.

महाराष्ट्रात पाय रोवण्यास सुरुवात

दलित, अल्पसंख्याक आणि शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानत भारत राष्ट्र समिती या पक्षाने महाराष्ट्रात पाय रोवण्यास सुरुवात केलीय. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय पक्षांची भाऊगर्दी काही कमी नाही. तिथे नवख्या बीआरएसला पहिल्याच निवडणुकीत यश मिळेल, असं म्हणणं धाडसाचं होईल. पण बीआरएसच्या रूपाने मतदारांना एक नवीन पर्याय उपलब्ध झालाय. राजकारणात सर्वसामान्य लोकांना येण्यासाठी बीआरएस हा चांगला पर्याय असल्याचे मत पक्षाचे नेते यशपाल भिंगे यांनी व्यक्त केलय.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार