AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधींना प्रोत्साहन दिलं पाहिजे, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचं सर्वात मोठं विधान; असं का म्हणाले दादा?

Chandrakant Patil on Rahul Gandhi : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्ययाबाबत चंद्रकात पाटील यांनी वक्तव्य केलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाने चर्चांना उधाण आलं आहे. चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

राहुल गांधींना प्रोत्साहन दिलं पाहिजे, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचं सर्वात मोठं विधान; असं का म्हणाले दादा?
राहुल गांधी, चंद्रकांत पाटीलImage Credit source: Facebook
| Updated on: Jul 06, 2024 | 6:18 PM
Share

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरीनगरीकडे मार्गस्थ झालेली आहे. वारकऱ्यांची पावलं पंढरपूरच्या दिशेने चालत आहेत. अशात पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज पंढरपूरमध्ये आहेत. ते तिथला आढवा घेत आहेत. कोविड आला, त्यावेळेस वाटलं होतं की वारी नावाचा प्रकार संपेल… परंतू कोविडमुळे वारीत काही फरक पडला नाही. पाऊस चांगला झाल्यामुळे यावर्षी आषाढी यात्रेला 18 लाखाच्या वर भाविक येतील असा अंदाज आहे. त्यामुळे पालकमंत्री म्हणून मी या वारकऱ्यांच्या सर्व सोयी सुविधा व्यवस्थित आहेत का नाही ते पाहण्यासाठी आलो आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

राहुल गांधी यांच्याबाबत काय म्हणाले?

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेचे नेते राहुल गांधी यांचं नाव न घेता चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे. उशिरा का होईना देवासमोर नतमस्तक व्हायची इच्छा निर्माण झाली. जसं जसं आपलं वय जाते तस तसे परमेश्वराची आस निर्माण होते. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

काँग्रेसला टोला

काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत अचानक लॉटरी लागली आहे. एकचे 14 खासदार झाले आहेत. त्यामुळे ते हवेत आहेत. त्यामुळे विधानसभेच्या 288 जागा काय सुचतात… एकला चलो काय सुचतं ठीक आहे. पण आम्ही मात्र विधानसभेला आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे सध्या मराठवाडा दौरा करत आहेत. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  मनोज जरांगे पाटील सरकार वारंवार आवाहन करत आहेत. पण सगे सोयऱ्यांची अधिसूचना जी काढली आहे ती जरांगे यांनीच ड्राफ्ट केली आहे. त्या अधिसूचनेला आठ लाख हरकती आले आहेत. तीच अधिसूचना आपण काढत आहोत. या अधिसुचनेमुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोठेही धक्का लागणार नाही. 2017 सालिच रक्त संबंधा मध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही. हा कायदा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नोंद ज्याची सापडेल त्याला कुणबी सर्टिफिकेट मिळेल, असं चंद्रकांत पाटील म्हणले.

Follow Us
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....
पंतप्रधानांच्या आवाहनाचे अनोखे स्वागत! महापौरांनी इलेक्ट्रिक बाईकने...
पंतप्रधानांच्या आवाहनाचे अनोखे स्वागत! महापौरांनी इलेक्ट्रिक बाईकने....
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं.
सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन, मुख्यमंत्री ऑन बाईक......
सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन, मुख्यमंत्री ऑन बाईक.......
25 लाखात चक्क 16 महिने... 20 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल, NCP...
25 लाखात चक्क 16 महिने... 20 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल, NCP....
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ.
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!.
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत.