AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींची गॅरंटी खोटी निघाली, लोकांच्या विश्वासाला तडा – शरद पवार

महाराष्ट्रात आणि देशात असं दिसतंय की भाजप आणि मोदी सरकार यांच्याबद्दल लोकांच्या मनातील विश्वासाला तडा गेला आहे. मोदींच्या गॅरंटीवर लोकांचा आता विश्वास नाहीये, हे या लोकसभा निवडणुकीतून स्पष्ट झालं आहे. मोदींची गॅरंटी खोटी निघाली, अशा शब्दांत शरद पवारांनी टीका केली.

मोदींची गॅरंटी खोटी निघाली, लोकांच्या विश्वासाला तडा - शरद पवार
शरद पवार
| Updated on: Jun 20, 2024 | 10:18 AM
Share

महाराष्ट्रात आणि देशात असं दिसतंय की भाजप आणि मोदी सरकार यांच्याबद्दल लोकांच्या मनातील विश्वासाला तडा गेला आहे. मोदींच्या गॅरंटीवर लोकांचा आता विश्वास नाहीये, हे या लोकसभा निवडणुकीतून स्पष्ट झालं आहे. मोदींची गॅरंटी खोटी निघाली, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी टीकास्त्र सोडलं. लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर भाजपची महाराष्ट्रात मोठी पिछेहाट झाली आणि केंद्रातही स्वबळावर सत्ता मिळवता आलेली नसून एनडीएचं सरकार स्थापन करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही सरकारचे कान टोचण्यात आले होते.

राज्यात महाविकास आघाडीला चांगली मत आणि जागा मिळाल्या. त्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता, शरद पवार यांनी लोकांचा मोदींवर, सरकारवर विश्वास उरला नसल्याचे नमूद केले. मोदींनी जी आश्वासनं दिली होती ती गेल्या 5-10 वर्षांत त्यांनी पाळली नाहीत हे लोकांच्या लक्षात आलं. आणि लोकांना बदल हवाय, त्यामुळे राज्यात हे चित्र दिसलं असं पवार म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत लोकांचा मूड काय हे स्पष्ट झालं

या लोकसभा निवडणुकीत तुम्ही बघितलंत तर राज्यात आम्ही (मविआ) 30-31 जागा जिंकल्या. विधानसभेचं जर तुम्ही पाहिलं तर 155 मतदारसंघामध्ये आम्हा लोकांचा विजय झालेला आहे. 288 जागांची विधानसभा , त्यातला 155 मतदारसंघात विरोधकांना बहुमत मिळतं, याचा अर्थ भविष्यात विधानसभा निवडणुकीत लोकांचा मूड काय हे स्पष्ट होतं. त्यादृष्टीने पावलं टाकणं ही आमची जबाबदारी आहे, असंही पवार म्हणाले.

भुजबळांशी संपर्क नाही

मी राष्ट्रवादी सोबत आहे, अजित दादांसोबत नाही, या छगन भुजबळ यांच्या वक्तव्याने आणि त्यांचा सध्याच्या एकंदर भूमिकेमुळेच ते शरद पवार गटासोबत पुन्हा जाणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यांच्या या विधानाचा अर्थ काय घ्यायचा, याबद्दल शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं.

त्यांच्या या विधानामागची पार्श्वभूमी काय हे मला माहीत नाही. माझी त्यांची वर्ष-सहा महिन्यांत भेट नाही. त्यामुळे त्यांच्या विधानबद्दल मला काही माहीत नाही असे शरद पवार म्हणाले. त्यांच्याकडून कोणताही संपर्क साधण्यात आलेल नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आधी लोकसभा नतर राज्यसभेसाठी उमेदवारी न मिळाल्याने भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असून भुजबळांचं पुढलं पाऊल काय असेल याबद्दल तर्क-वितर्क सुरू आहेत.

Follow Us
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...