AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परभणीत कोंबिंग ऑपरेशनच्या नावावर बाळंतीण महिला, लहान मुलींना मारहाण…प्रकाश आंबेडकर यांचा मोठा आरोप

परभणी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आयोग, एससी-एसटी आयोग आणि मानवी हक्क आयोगाच्या अहवालाकडे लक्ष घालावे. परभणी घटनेबाबत पोलीस अधीक्षक आणि पोलीस महानिरीक्षकांनी खरी माहिती सरकारला दिली का? त्याचा तपास करावा

परभणीत कोंबिंग ऑपरेशनच्या नावावर बाळंतीण महिला, लहान मुलींना मारहाण...प्रकाश आंबेडकर यांचा मोठा आरोप
प्रकाश आंबेडकरImage Credit source: tv9 marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Dec 20, 2024 | 8:26 PM
Share

परभणी आणि बीड घटनेवरुन हिवाळी अधिवेशात राज्य सरकार अडचणीत आले आहे. परभणीमध्ये झालेल्या जाळपोळीनंतर या ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले. कोंबिंग ऑपरेशनमध्ये काही जणांची घर तोडण्यात आली. तर काही जणांना घरात शिरून मारहाण करण्यात आली. कोंबिंग ऑपरेशनच्या नावावर बाळंतीण महिला आणि लहान मुलींना मारहाण झाली असल्याचा आरोप बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. या घटनेची सरकारने पोलिसांकडून नाही तर इतर कमिटींकडून चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच या घटनेबाबत सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य खरे असल्याचे त्यांनी सांगितले.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, परभणी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आयोग, एससी-एसटी आयोग आणि मानवी हक्क आयोगाच्या अहवालाकडे लक्ष घालावे. परभणी घटनेबाबत पोलीस अधीक्षक आणि पोलीस महानिरीक्षकांनी खरी माहिती सरकारला दिली का? त्याचा तपास करावा आणि योग्य कारवाई करावी. तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 1 करोड रुपयांची भरपाई आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत घ्यावी, ही आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सभागृहात जे वक्तव्य केले होते, त्यामध्ये तथ्य आहे. परभणीतील कोबिंग ऑपरेशनबाबत मी त्यांच्या संपर्कात होतो. त्यांना विनंती केली पोलिसांकडून होणारा अमानुष लाठीहल्ला थांबवण्यात यावा. कोंबिंग ऑपरेशन थांबवावे. त्यानंतर मला कॉनकॉलमध्ये घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आयजी यांचा कॉल झाला.

मुख्यमंत्री काय म्हणाले…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले होते की, मला प्रकाश आंबेडकर यांचा फोन आला. त्यांनी परभणीत कोंबिंग ऑपरेशन राबवले जात असल्याचे सांगितले. त्यानंतर मी तत्काळ पोलिसांना विचारले. परभणीत कसले ऑपरेशन सुरू आहे. त्यावेळी पोलिसांनी सांगितले की, जाळपोळीच्या घटनेमध्ये जे लोक व्हिडिओमध्ये दिसत आहेत, त्यांना पकडले जात आहे. त्यानंतर आयजी, माझे आणि प्रकाश आंबेडकर यांचे एकत्रित बोलणे झाले. त्यानंतर कोबिंग ऑपरेशन थांबले. त्यानंतर कोणालाही अटकही केलेली नाही.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत