AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रकाश आंबेडकरांनी बाहेर काढलं नवं अस्त्र, राज्यातलं राजकारणच बदलणार, ओबीसींना केलं असं आवाहन की…

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सध्याच्या ओबीसींनी राजकारणात उतरावे, असे आवाहन केले आहे. तसेच धर्म नव्हे तर ओबीसी संकटात आसेही आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांनी बाहेर काढलं नवं अस्त्र, राज्यातलं राजकारणच बदलणार, ओबीसींना केलं असं आवाहन की...
prakash ambedkar
| Updated on: Nov 10, 2025 | 4:52 PM
Share

मराठा समाजाला कुणबी असल्याचे प्रमाणपत्र मिळत आहे. सरकारच्या जीआरनंतर या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. दरम्यान, आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणावर महत्त्वाचे भाष्य केले आहे. आज धर्म नव्हे तर ओबीसी धोक्यात आहेत. ओबीसी सत्ताधारी झाल्याशिवाय आरक्षण वाचणार नाही. ओबीसींच्या राजकीय लढ्याला सुरुवात झाली आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

…तेव्हापासून फडणवीसांची भाषा बदलली

प्रकाश आंबेडकर जालन्यात जाहीर सभेत बोलत होते. या सभेत बोलताना त्यांनी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यावर भाष्य केले. जरांगे मुंबईत ठिय्या मांडून बसले आणि काँग्रेस, बीजेपी, शिंदे, राष्ट्रवादीचे 190 आमदार आमदार जरांगे यांच्या दर्शनाला गेले. हेच आमदार देवेंद्र फडणीस यांना भेटले तशी फडणवीस यांची भाषा बदलली. याच आमदारांनी जरांगे काय म्हणतात ते ऐकण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांना सल्ला दिला आणि कुणबी प्रमाणपत्राचा जीआर निघाला, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच देवेंद्र फडणवीस 2 सप्टेंबर रोजीचा GR रद्द करणार आहेत का? असा सवालही त्यांनी केला.

एसी आणि एसटी हा वर्ग आरक्षणवादी

ओबीसीच्या राजकीय लढाईला सुरवात झाली आहे. ओबीसींनी मोठ्या प्रमाणात आपले उमेदवार जाहीर केले पाहिजेत. प्रत्येक मतदारसंघामध्ये एक तरी ओबीसी मतदार असायला हवा. काही मतदारसंघ एससी प्रवर्गासाठी राखीव आहेत. काही मतदारसंघ एसटीसाठी राखीव आहेत. एसी आणि एसटी हा वर्ग आरक्षणवादी आहे. हे लक्षात घ्यायला हवे. जे लोक आरक्षणवादी आहेत, त्यांनाच मतदान करायला हवं. आपल मत हे ओबीसीला, आपलं मत हे एसटीला असायला हवे, असेही यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले.

ओबीसी नेत्यांच्या नाड्या तिसऱ्याच्या हातामध्ये

धर्म नाही तर ओबीसी संकटात आला आहे. ओबीसी सत्ताधारी झाल्याशिवाय आरक्षण वाचणार नाही. ओबीसी नेत्यांच्या नाड्या तिसऱ्याच्या हातामध्ये आहेत. कळसुत्री बाहुल्याप्रमाणे हे ओबीसी नेते नाचवलं जात आहेत, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी ओबीसींनी राजकारणात उतरावे, असे आवाहन केले आहे. दरम्यान, आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे ते ओबीसींची मोट घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. याचे भविष्यात काय परिणाम दिसणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.