AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Ajit Pawar : ‘…नाही तर मी अधिकाऱ्यांना खडसावतो, कारण आपण जनतेला बांधील’

दोन वर्षे खूप अडचणीची होती. अनेक नैसर्गिक आपत्तीला सामोरे जात असतानाही जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले. त्यांचे कौतुक केले पाहिजे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काढले.

Pune Ajit Pawar : '...नाही तर मी अधिकाऱ्यांना खडसावतो, कारण आपण जनतेला बांधील'
उपमुख्यमंत्री अजित पवारImage Credit source: tv9
Reporter Ashwini Satav Doke
Reporter Ashwini Satav Doke | Edited By: Pradeep Garad | Updated on: Apr 09, 2022 | 4:17 PM
Share

पुणे : दोन वर्षे खूप अडचणीची होती. अनेक नैसर्गिक आपत्तीला सामोरे जात असतानाही जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले. त्यांचे कौतुक केले पाहिजे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काढले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेच्या (ZP) विविध विभागात काम करणाऱ्या उत्कृष्ठ अधिकाऱ्यांचा पुरस्काराने (Award) गौरव करण्यात आला, या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, की उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टीमने कितीही लोकाभिमुख काम करायचे ठरवले तरी अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय ते लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत. मी अधिकाऱ्यांना जबाबदारी दिली आणि त्यांनी ती पूर्ण केली नाही तर मी अधिकाऱ्यांना खडसावतो. तो माझा अधिकार आहे. कारण मी जनतेला बांधील आहे, असे ते म्हणाले.

‘चांगल्या आरोग्य सेवा देण्याचा आमचा प्रयत्न’

पुढे ते म्हणाले, की मी लहानपणापासूनच पवार साहेबांच्या कामाची पद्धत पाहत आलो आहे. त्यांनी नेहमी दूरदृष्टी ठेऊन काम केले आहे. तीच गोष्ट माझ्यात आली, मी ते शिकलो. इथे दत्ता मामा भरणे आहेत, जिल्हा परिषदेतून पुढे आलेले कार्यकर्ते आहेत. मी त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले. कारण त्यांना पुढे आमदार होता यावे. पुणे जिल्ह्यात आपण इंद्रायणी मेडी सिटी जाहीर केली आहे. चांगल्या आरोग्य सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

‘सामाजिक बांधिलकी ठेऊन काम करा’

अधिकाऱ्यांवर अन्याय झाला तर जरूर मला सांगा. मात्र तुम्हाला दिलेल्या कामाकडे कानाडोळा केला तर ते मला अजिबात चालणार नाही. तुमच्या भरवशावरच आम्ही राज्याचा गाडा हाकत असतो. सगळ्यांनाच क्रीम पोस्टिंग मिळत नाही. तुम्हीही ग्रामीण भागातून आला असाल. तेव्हा सामाजिक बांधिलकी ठेऊन काम करा, असा सल्ला त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

आणखी वाचा :

NCP Morcha : राजगुरूनगरात राष्ट्रवादीनं पोलीस स्टेशनपर्यंत काढला मोर्चा, शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध

Dilip Mohite Patil : ‘मातोश्रीबाहेर मोर्चा काढायचा होता, मग समजली असती हल्ल्याची किंमत काय मोजावी लागते ते..’

Ajit Pawar On St: त्याला काहीच अर्थ नाही, भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया अजित पवारांनी उडवून लावल्या

Follow Us
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे विधान
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये...
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?