AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अण्णा हजारेंचा केंद्र सरकारला अल्टीमेटम, शेतकऱ्यांच्या प्रश्नी शेवटचं उपोषण करण्याचा इशारा

30 जानेवारीला शेतकऱ्यांच्या प्रश्नी शेवटच उपोषण करणार असल्याचा इशारा अण्णा हजारेंनी दिला. (Anna Hajare Fast Agitation)

अण्णा हजारेंचा केंद्र सरकारला अल्टीमेटम, शेतकऱ्यांच्या प्रश्नी शेवटचं उपोषण करण्याचा इशारा
अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक
| Updated on: Jan 15, 2021 | 1:45 PM
Share

अहमदनगर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत गेल्या दीड महिन्यांहून अधिक काळ शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा देत 30 जानेवारीला उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. दिल्लीतील रामलीला मैदानात उपोषणाला परवानगी न दिल्यास जिथे जागा मिळेल तिथे उपोषण करु, असा इशारा अण्णा हजारेंनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अण्णा हजारेंनी पत्र लिहीलेल्या पत्रांना केंद्र सरकारकडून उत्तर दिलं गेलं नसल्याची माहिती देण्यात आली आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा अण्णा हजारे यांनी यापूर्वीच दिला होता. (Anna Hajare said he will going on Fast Agitation on 30 January for Farmers issue )

30 जानेवारीला उपोषण

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी यापूर्वी केंद्र सरकारला दिलेल्या इशाऱ्या नुसार 30 जानेवारी म्हणजेच महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनी दिल्लीत उपोषण करणार आहेत. केंद्र सरकारनं रामलीला मैदानात उपोषणाला परवानगी द्यावी, अशी मागणी अण्णा हजारेंनी केली आहे. शेतकरी आंदोलनाविषयी 5 पत्र लिहून देखील सरकारकडून उत्तर आलं नसल्याचा दावा अण्णांनी केला आहे. सरकारनं दिलेले आश्वासन 30 जानेवारीपर्यंत पूर्ण न केल्यास अण्णा हजारे शेतकऱ्यांच्या प्रश्नी शेवटचं उपोषण करणार आहेत.

सरकार पोकळ आश्वासनं देतं त्यांच्यावर विश्वास नाही

अहमदनगरमधील राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलत असताना केंद्र सरकारला आंदोलनाचा इशारा दिला होता. अण्णा यावेळी म्हणाले होते की, “शेतकऱ्यांसाठी गेल्या तीन वर्षांपासून आंदोलन करत आहे, परंतु सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणतीही ठोस पावलं उचलली नाहीत. हे सरकार केवळ पोकळ आश्वासनं देत आहे. त्यामुळे माझा त्यांच्यावर बिलकुल विश्वास नाही”.

अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे, खासदार भागवत कराड आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली. अण्णांसोबत चर्चा करून एक महिन्याची मुदत मागून अण्णांनी आंदोलन करू नये अशी विनंती देखील त्यांनी केली होती. मात्र, आता अण्णांनी अश्वासनांवर विश्वास न ठेवता शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास जानेवारी महिन्याच्या शेवटी आयुष्यातील शेवटचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आता केंद्र सरकार याबाबत काय भूमिका घेतंय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट्स, पाहा गुड मॉर्निंग महाराष्ट्र, दररोज सकाळी 7 वा. @TV9Marathi वर

संबंधित बातम्या:

‘संकटमोचक’ गिरीश महाजन अण्णांच्या भेटीला, शेतकरी आंदोलनात न उतरण्यासाठी भाजपची डिप्लोमसी?

भाजपला अण्णांची भीती?, बागडे राळेगणसिद्धीत; दीड तास खलबतं

(Anna Hajare said he will going on Fast Agitation on 30 January for Farmers issue )

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.