AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोक नाटकाचं तिकीट काढतात, पण…; देवेंद्र फडणवीसांचं अमोल कोल्हेंवर टीकास्त्र

Devendra Fadnavis on Amol Kolhe Shirur Loksabha Election 2024 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे. नाटकाचं उदाहरण देत अमोल कोल्हे यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीस काय म्हणाले? वाचा सविस्तर...

लोक नाटकाचं तिकीट काढतात, पण...; देवेंद्र फडणवीसांचं अमोल कोल्हेंवर टीकास्त्र
| Updated on: May 06, 2024 | 4:26 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. अमोल कोल्हेंना नाटक येत. त्यांना रडता येत ड्रामा करता येतो. लोक नाटकाचे तिकीट घेवून नाटक पाहतात. मात्र नाटक फ्लॉप गेलं की पुन्हा नाटकं पाहायला लोक जात नाहीत. शिरूरची जनता हुशार आहे. कोल्हे लोकांमध्ये गेले की त्यांचं जोरदार स्वागत होतंय. मग कोल्हेंना वाटत वा वा काय स्वागत होत आहे… मात्र जनता हळूच विचारते की खासदार साहेब पाच वर्षे कुठे होतात?, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शिरूर आणि परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुढील दोन ते अडीच वर्षात सोडवणार आहोत. भारतात गुंतवणूक आली की ती महाराष्ट्रात येते आणि महाराष्ट्रात आली की ती किती पहिली पुण्यात येते. आपल्यासोबत मजबूत पंतप्रधान आहेत, असंही फडणवीस म्हणालेत.

नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक

ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या सेवा मोफत देण्याच काम नरेंद्र मोदींनी केलं. दिव्यांगांसाठी फायद्याच्या योजना आणल्या. पारंपरिक व्यवसाय करण्याचा आर्थिक फायदा कसा होईल, यासाठी योजना आणली आणि अनेक उद्योजक त्यातून तयार झाले. शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना फायदा झाला. पीक कर्ज मोदींनी दिलं. मोदी पहिल्यांदा निवडून आले तेव्हा आपल्या राज्यातील जाणते राजे हे म्हटले की मोदी यांना उसातले काय समजतं? मात्र मोदींनी ऊसाच्या शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळवून दिले, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांच्या टीकेला उत्तर दिलंय.

पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर

ऊसाच्या शेतकऱ्यावर इन्कटॅक्स लावला होता. पवार हे पंतप्रधान याना भेटायचे मात्र हात हालवत पुन्हा माघारी यायचे. शेतकऱ्यावर असलेला इन्कमटॅक्स वाढत गेला. मोदींनी शेतकऱ्याचा टॅक्स माफ करण्याचे काम केले . देशाच्या लोकसभेत आढळराव यांनी चांगलं काम केलं असून त्यांनी चांगला संघर्ष केला. शिवाजी आढळराव आणि महेश लांडगे यांनी बैलगाडा शर्यती सुरू केल्या. आपलं सरकार आलं. म्हणून हे शक्य झालं. ही जागा आता राष्ट्रवादीकडे गेली आणि आढळराव हे शिवसेनेचे होते. आता आढळराव यांनी पक्ष बदलला आहे. मी मधस्थी केली आणि महायुतीकडून आढळराव यांना उमेदवारी देवू उमेदवारी घोषित झाली, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.