AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोपीनाथ मुंडे यांच्या नावानं महामंडळ होतंय, त्यांच्या वारसांना संधी मिळाली पण जमलं नाही, धनंजय मुंडे यांची पंकजा मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका

धनंजय मुंडे यांनी या मेळाव्यात ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं पंकजा मुंडे यांचं नाव न घेता टीका केली आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या नावानं महामंडळ होतंय, त्यांच्या वारसांना संधी मिळाली पण जमलं नाही, धनंजय मुंडे यांची पंकजा मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका
धनंजय मुंडेImage Credit source: Tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 03, 2022 | 8:40 PM
Share

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ऑनलाईन उपस्थितीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे उद्धाघटन करण्यात आलं. पुणे येथील सामाजिक न्याय भवन परिसर, येरवडा या ठिकाणी उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) उपस्थित होते. धनंजय मुंडे यांनी या मेळाव्यात ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं पंकजा मुंडे यांचं नाव न घेता टीका केली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या नावानं हे महामंडळ सुरु होत आहे. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर ऊसतोड मजुरांसाठी संघर्ष केला. त्यांच्या वारसदारांना संधी मिळाली पण त्यानाही हे महामंडळ निर्माण करता आलं नाही, असं धनंजय मुंडे म्हणत पंकजा मुंडे यांचं नाव न घेता टीका केली आहे.

धनजंय मुंडे काय म्हणाले?

माझ्या जीवनातला आजचा क्षण सुवर्ण अक्षराने लिहावा असा आहे. माझा जन्म ऊसतोड मजुराच्या पोटी झालाय. माझा जीवनातला हा दिवस अजित पवार यांच्या शिवाय शक्यच नव्हता हे प्रामाणिकपणे सांगतो.मागच्या सरकारच्या काळात मंडळ आलं गेलं. नाव जरी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं आहे तरी त्यांनी आयुष्यभर ऊसतोड मजुरांसाठी लढा दिला. त्यांच्या कार्यकालात त्यांना हे महामंडळ देणं शक्य झालं नाही. त्यांच्यानंतर त्यांच्या वारसदारांना संधी मिळाली पण त्यांनाही हे महामंडळ निर्माण करता आले नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले. कदाचित हे महामंडळ माझ्या आणि अजित पवार यांच्या हस्ते व्हावं, ही नियतीची इच्छा असावी, असं धनंजय मुंडे म्हणाले.आजचा कार्यक्रम हा मुंडे साहेबांनी ही आदरांजली आहे.

पाहा व्हिडीओ

ऊसतोड भगिनी आहेत, त्यांचा प्रश्न आहे. चार दिवस कमी होतात म्हणून आमच्या भगिनीच गर्भायश काढावा लागत असेल तर काय तोंड घेऊन आम्ही मंत्रिपदी बसलोय, अशी खंत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. आमच्या भगिनींच्या आरोग्याची काळजीही महामंडळ घेईल. भगवान गड असेल किंवा बीड जिल्ह्यातील इतर गड असतील हे कोणत्याही मोठ्या माणसांच्या देणगीवर नाही तर ऊसतोड मजुरांच्या देणगीवर मोठे होतायेत, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

कारखाने ऊसतोड कामगारांच्या जीवावर चालतात : बाळासाहेब थोरात

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्रात ऊस कारखाने हे ऊसतोड कामगारांच्या जीवावर चालतात, असं म्हटलंय. अनेक कष्ट हे ऊसतोड कामगार घेतात, त्यांच्या घामावरच ही अर्थव्यवस्था चालते हे विसरुन चालणार नाही, असं थोरात म्हणाले. साखर कारखाना असला तरी तुमच्याबद्दल आपुलकी ठेवणारे आम्ही आहोत. गोपीनाथ मुंडे हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री ठेवणारं व्यक्तिमत्व होतं, असं देखील बाळासाहेब थोरात म्हणाले.

इतर बातम्या:

धनंजयजी, तुम्ही बीडमध्ये ऊस तोडणी मजुरांचा मेळावा घ्या, मी येईन कोयत्याऐवजी वही पेन पुस्तक देऊया : उद्धव ठाकरे

Akola: जेव्हा मोठ्या बहिणीला छोटेपणीच आई व्हावं लागतं! का? आईला परीक्षा देता यावी म्हणून…

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.