AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : पाण्यात पडलेल्या पाच जणांना अग्निशामक दलानं वाचवलं, कारसह एसएम जोशी पुलाखाली कोसळलं होतं पालघरमधलं कुटुंब

अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीत उड्या टाकत प्रवेश केला आणि दोरी, लाइफ जॅकेट आणि इतर उपकरणे वापरून कुटुंबातील सदस्यांची सुटका केली. हे कुटुंब मूळचे पालघर जिल्ह्यातील असून ते नातेवाईकांना भेटण्यासाठी पुण्याला आले होते.

Pune : पाण्यात पडलेल्या पाच जणांना अग्निशामक दलानं वाचवलं, कारसह एसएम जोशी पुलाखाली कोसळलं होतं पालघरमधलं कुटुंब
नदीत अडकलेल्यांना अग्निशामक दलानं वाचवलंImage Credit source: tv9
| Updated on: Aug 12, 2022 | 12:49 PM
Share

पुणे : एसएम जोशी पुलाखाली (S M Joshi bridge) नदीत पडलेल्या कारमधील कुटुंबाला वाचवण्यात यश आले आहे. पुणे अग्निशामक दलाने शुक्रवारी एसएम जोशी पुलाखालून या सर्वांना बाहेर काढच एका कुटुंबातील पाच जणांना वाचवले. अधिकाऱ्यांनी कुणाल ललवानी (28), प्रिया ललवानी (22), कपिल ललवानी (21), वंचिता ललवानी (13) आणि कृष्णा ललवानी (8) अशी कुटुंबीयांची कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. गरवारे कॉलेजजवळील (Garware college) एस. एम. जोशी पुलाखाली नदीत एक कार तरंगत असल्याचा फोन अग्निशामक दलाच्या (Firebrigade) नियंत्रण कक्षाला मध्यरात्री 1.46 वाजता आला. अग्निशामक अधिकारी राजेश जगताप, चालक ज्ञानेश्‍वर खेडेकर, अग्निशामक दलाचे जवान किशोर बने, दिलीप घाडशी, संदिप कार्ले यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि कारमधून सर्वांना सुखरूपपणे बाहेर काढले. दरम्यान, हे कुटुंब अत्यंत भयभीत झालेले पाहायला मिळत होते.

पालघर जिल्ह्यातील कुटुंब

अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीत उड्या टाकत प्रवेश केला आणि दोरी, लाइफ जॅकेट आणि इतर उपकरणे वापरून कुटुंबातील सदस्यांची सुटका केली. हे कुटुंब मूळचे पालघर जिल्ह्यातील असून ते नातेवाईकांना भेटण्यासाठी पुण्याला आले होते. नदीकाठी रस्त्याने जात असताना त्यांची कार प्रवाहात वाहून गेली होती. त्यानंतर ते पुलाखाली एका ठिकाणी अडकले होते. मुसळधार पावसानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने रात्री नदीचा प्रवाह तीव्र झाला होता. घटनेची माहिती मिळताच पुणे शहर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी जमलेल्या गर्दीवर पोलिसांनी नियंत्रण मिळवले तर अग्निशामक दलाने बचावकार्य केले.

अग्निशामकचे मदतकार्य

सतर्कतेचा इशारा

राज्यात सध्या सर्वदूर पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी पाहावयास मिळत आहे. पुण्यासह राज्याला रेड अलर्ट हवामान विभागाने आधीच घोषित केला आहे. अत्यावश्यक असल्याशिवास प्रवास करू नये, अशा सूचना आणि सतर्कतेचा इशारादेखील देण्यात आला आहे. त्यातही मुंबई-पुणे आणि परिसरात दरडी कोसळण्याच्याही घटना घडत आहेत. संभाव्य हानी टाळण्यासाठी प्रशासनातर्फे काळजीही घेण्यात येत आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या घटना होऊ नयेत, यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहणाचे आवाहन करण्यात आले आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.