AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : पाण्यात पडलेल्या पाच जणांना अग्निशामक दलानं वाचवलं, कारसह एसएम जोशी पुलाखाली कोसळलं होतं पालघरमधलं कुटुंब

अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीत उड्या टाकत प्रवेश केला आणि दोरी, लाइफ जॅकेट आणि इतर उपकरणे वापरून कुटुंबातील सदस्यांची सुटका केली. हे कुटुंब मूळचे पालघर जिल्ह्यातील असून ते नातेवाईकांना भेटण्यासाठी पुण्याला आले होते.

Pune : पाण्यात पडलेल्या पाच जणांना अग्निशामक दलानं वाचवलं, कारसह एसएम जोशी पुलाखाली कोसळलं होतं पालघरमधलं कुटुंब
नदीत अडकलेल्यांना अग्निशामक दलानं वाचवलंImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Aug 12, 2022 | 12:49 PM
Share

पुणे : एसएम जोशी पुलाखाली (S M Joshi bridge) नदीत पडलेल्या कारमधील कुटुंबाला वाचवण्यात यश आले आहे. पुणे अग्निशामक दलाने शुक्रवारी एसएम जोशी पुलाखालून या सर्वांना बाहेर काढच एका कुटुंबातील पाच जणांना वाचवले. अधिकाऱ्यांनी कुणाल ललवानी (28), प्रिया ललवानी (22), कपिल ललवानी (21), वंचिता ललवानी (13) आणि कृष्णा ललवानी (8) अशी कुटुंबीयांची कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. गरवारे कॉलेजजवळील (Garware college) एस. एम. जोशी पुलाखाली नदीत एक कार तरंगत असल्याचा फोन अग्निशामक दलाच्या (Firebrigade) नियंत्रण कक्षाला मध्यरात्री 1.46 वाजता आला. अग्निशामक अधिकारी राजेश जगताप, चालक ज्ञानेश्‍वर खेडेकर, अग्निशामक दलाचे जवान किशोर बने, दिलीप घाडशी, संदिप कार्ले यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि कारमधून सर्वांना सुखरूपपणे बाहेर काढले. दरम्यान, हे कुटुंब अत्यंत भयभीत झालेले पाहायला मिळत होते.

पालघर जिल्ह्यातील कुटुंब

अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीत उड्या टाकत प्रवेश केला आणि दोरी, लाइफ जॅकेट आणि इतर उपकरणे वापरून कुटुंबातील सदस्यांची सुटका केली. हे कुटुंब मूळचे पालघर जिल्ह्यातील असून ते नातेवाईकांना भेटण्यासाठी पुण्याला आले होते. नदीकाठी रस्त्याने जात असताना त्यांची कार प्रवाहात वाहून गेली होती. त्यानंतर ते पुलाखाली एका ठिकाणी अडकले होते. मुसळधार पावसानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने रात्री नदीचा प्रवाह तीव्र झाला होता. घटनेची माहिती मिळताच पुणे शहर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी जमलेल्या गर्दीवर पोलिसांनी नियंत्रण मिळवले तर अग्निशामक दलाने बचावकार्य केले.

अग्निशामकचे मदतकार्य

सतर्कतेचा इशारा

राज्यात सध्या सर्वदूर पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी पाहावयास मिळत आहे. पुण्यासह राज्याला रेड अलर्ट हवामान विभागाने आधीच घोषित केला आहे. अत्यावश्यक असल्याशिवास प्रवास करू नये, अशा सूचना आणि सतर्कतेचा इशारादेखील देण्यात आला आहे. त्यातही मुंबई-पुणे आणि परिसरात दरडी कोसळण्याच्याही घटना घडत आहेत. संभाव्य हानी टाळण्यासाठी प्रशासनातर्फे काळजीही घेण्यात येत आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या घटना होऊ नयेत, यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहणाचे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य