AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवरायांचा संघर्ष स्वराज्यासाठी होता, सत्ता लालसेसाठी नव्हे; अमित शाह यांच्या हस्ते शिवसृष्टीचं लोकार्पण

शिवाजी महाराज जर नसते तर पाकिस्तानची बॉर्डर आपल्या घराजवळ राहिली असती, हे यशवंतराव चव्हाण यांनी म्हटलं होतं. त्यात तथ्य आहे. शिवाजी महाराजांची महती सांगणारं हे विधान आहे.

शिवरायांचा संघर्ष स्वराज्यासाठी होता, सत्ता लालसेसाठी नव्हे; अमित शाह यांच्या हस्ते शिवसृष्टीचं लोकार्पण
Amit ShahImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 19, 2023 | 1:28 PM
Share

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन एका राजाचं जीवन नाहीये. तर हा एक विचार आहे. हा विचार मानणारे अनेक लोक हे शिवसृष्टीचं काम पुढे नेतील. या कामात हजारो लोक सामील होतील. ही शिवसृष्टी आशिया खंडातील सर्वात मोठं आणि ऐतिहासिक थीम पार्क होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच छत्रपती शिवाजी महाराज यांचा संघर्ष हा स्वराज्यासाठी होता. सत्ता लालसेसाठी त्यांचा संघर्ष नव्हता, असं देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं. अमित शाह यांच्या हस्ते शिवसृष्टीचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

शिवाजी महाराजांचं जीवन सत्ता लालसेचं नव्हतं. शिवाजी महाराजांचं जीवन स्वराज्य स्थापन करण्याचं होतं. संघर्षाचं होतं. शिवाजी महाराज हे साहसी राजे होते. ते स्वत: लढाईत पुढे असायचे. लढाईचे नेतृत्व स्वत: करायचे. फारच थोडे राजे आहेत की जे स्वत: फ्रंटवर असायचे. त्यापैकी शिवाजी महाराज एक आहेत. त्यांच्या आयुष्यातील अशा कितीतरी लढाया आहेत. ज्या त्यांनी स्वत: लढल्या आहेत. एवढा शूरवीर राजा या धरतीवर झाला नाही, असं प्रतिपादन अमित शाह यांनी केलं.

आज शिवसृष्टीचं लोकार्पण होत आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं स्वप्न साकार होत आहे. आज शिवजयंतीही आहे. लोकार्पणासाठी शिवजयंतीचा मुहुर्त योग्यच आहे. यापेक्षा वेगळा योग्य मुहुर्त असूच शकत नाही, असं शाह म्हणाले.

सर्वात मोठं थीम पार्क

शिवसृष्टीतून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जनतेपर्यंत पोहोचतील. शिवसृष्टी आशिया खंडातील सर्वात मोठं आणि ऐतिहासिक थीम पार्क होईल. शिवसृष्टी साकारणं हे ईश्वरीय काम आहे. शिवसृष्टीतून इतिहासाला उजाळा मिळेल. फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील इतिहास प्रेमींसाठी हे महत्त्वाचं स्थळ ठरेल, असं ते म्हणाले.

संपत्तीचा वापर स्वत:साठी केला नाही

शिवाजी महाराज जर नसते तर पाकिस्तानची बॉर्डर आपल्या घराजवळ राहिली असती, हे यशवंतराव चव्हाण यांनी म्हटलं होतं. त्यात तथ्य आहे. शिवाजी महाराजांची महती सांगणारं हे विधान आहे, असं सांगतानाच शिवाजी महाराजांप्रमाणेच पंतप्रधान मोदींनी काशी विश्वनाथ, सोमनाथांच्या मंदिराचे पूर्णनिर्मिती केली, असं त्यांनी सांगितलं. शिवाजी महाराजांनी राज्याच्या संपत्तीचा वापर कधीच स्वतःसाठी केला नाही, असंही ते म्हणाले.

शिवाजी महाराज हा विचार

बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घराघरात पोहोचवण्याचं काम केलं. गुजरातमध्ये 8 जिल्ह्यात जाणता राजा नाट्यसोबत मी गेलो होतो. बाबासाहेब पुरंदरे यांनी देशावर खूप मोठे उपकार केले आहेत. या लोकापर्ण सोहळ्यात सहभागी झालो स्वतःला भाग्यवान समजतो. या ठिकाणी येणारा प्रत्येकजण शिवाजी महाराजांचा एक संदेश घेऊन जाणार. शिवाजी महाराज ही एक व्यक्ती नसून एक विचार आहे, असं त्यांनी सांगितलं.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.