AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवरायांचा संघर्ष स्वराज्यासाठी होता, सत्ता लालसेसाठी नव्हे; अमित शाह यांच्या हस्ते शिवसृष्टीचं लोकार्पण

शिवाजी महाराज जर नसते तर पाकिस्तानची बॉर्डर आपल्या घराजवळ राहिली असती, हे यशवंतराव चव्हाण यांनी म्हटलं होतं. त्यात तथ्य आहे. शिवाजी महाराजांची महती सांगणारं हे विधान आहे.

शिवरायांचा संघर्ष स्वराज्यासाठी होता, सत्ता लालसेसाठी नव्हे; अमित शाह यांच्या हस्ते शिवसृष्टीचं लोकार्पण
Amit ShahImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 19, 2023 | 1:28 PM
Share

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन एका राजाचं जीवन नाहीये. तर हा एक विचार आहे. हा विचार मानणारे अनेक लोक हे शिवसृष्टीचं काम पुढे नेतील. या कामात हजारो लोक सामील होतील. ही शिवसृष्टी आशिया खंडातील सर्वात मोठं आणि ऐतिहासिक थीम पार्क होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच छत्रपती शिवाजी महाराज यांचा संघर्ष हा स्वराज्यासाठी होता. सत्ता लालसेसाठी त्यांचा संघर्ष नव्हता, असं देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं. अमित शाह यांच्या हस्ते शिवसृष्टीचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

शिवाजी महाराजांचं जीवन सत्ता लालसेचं नव्हतं. शिवाजी महाराजांचं जीवन स्वराज्य स्थापन करण्याचं होतं. संघर्षाचं होतं. शिवाजी महाराज हे साहसी राजे होते. ते स्वत: लढाईत पुढे असायचे. लढाईचे नेतृत्व स्वत: करायचे. फारच थोडे राजे आहेत की जे स्वत: फ्रंटवर असायचे. त्यापैकी शिवाजी महाराज एक आहेत. त्यांच्या आयुष्यातील अशा कितीतरी लढाया आहेत. ज्या त्यांनी स्वत: लढल्या आहेत. एवढा शूरवीर राजा या धरतीवर झाला नाही, असं प्रतिपादन अमित शाह यांनी केलं.

आज शिवसृष्टीचं लोकार्पण होत आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं स्वप्न साकार होत आहे. आज शिवजयंतीही आहे. लोकार्पणासाठी शिवजयंतीचा मुहुर्त योग्यच आहे. यापेक्षा वेगळा योग्य मुहुर्त असूच शकत नाही, असं शाह म्हणाले.

सर्वात मोठं थीम पार्क

शिवसृष्टीतून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जनतेपर्यंत पोहोचतील. शिवसृष्टी आशिया खंडातील सर्वात मोठं आणि ऐतिहासिक थीम पार्क होईल. शिवसृष्टी साकारणं हे ईश्वरीय काम आहे. शिवसृष्टीतून इतिहासाला उजाळा मिळेल. फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील इतिहास प्रेमींसाठी हे महत्त्वाचं स्थळ ठरेल, असं ते म्हणाले.

संपत्तीचा वापर स्वत:साठी केला नाही

शिवाजी महाराज जर नसते तर पाकिस्तानची बॉर्डर आपल्या घराजवळ राहिली असती, हे यशवंतराव चव्हाण यांनी म्हटलं होतं. त्यात तथ्य आहे. शिवाजी महाराजांची महती सांगणारं हे विधान आहे, असं सांगतानाच शिवाजी महाराजांप्रमाणेच पंतप्रधान मोदींनी काशी विश्वनाथ, सोमनाथांच्या मंदिराचे पूर्णनिर्मिती केली, असं त्यांनी सांगितलं. शिवाजी महाराजांनी राज्याच्या संपत्तीचा वापर कधीच स्वतःसाठी केला नाही, असंही ते म्हणाले.

शिवाजी महाराज हा विचार

बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घराघरात पोहोचवण्याचं काम केलं. गुजरातमध्ये 8 जिल्ह्यात जाणता राजा नाट्यसोबत मी गेलो होतो. बाबासाहेब पुरंदरे यांनी देशावर खूप मोठे उपकार केले आहेत. या लोकापर्ण सोहळ्यात सहभागी झालो स्वतःला भाग्यवान समजतो. या ठिकाणी येणारा प्रत्येकजण शिवाजी महाराजांचा एक संदेश घेऊन जाणार. शिवाजी महाराज ही एक व्यक्ती नसून एक विचार आहे, असं त्यांनी सांगितलं.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.