AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khadakwasla Dam : खडकवासला धरण 100 टक्के भरलं; पुण्यातील पाणीकपात रद्द होणार?

खडकवासला धरण (Khadakwasla Dam) 100 टक्के भरलं आहे. त्यामुळे आता पुण्यातील पाणीतपातीचा निर्णय मागे घेण्यात येण्याची शक्यता आहे.

Khadakwasla Dam : खडकवासला धरण 100 टक्के भरलं; पुण्यातील पाणीकपात रद्द होणार?
| Updated on: Jul 17, 2022 | 1:53 PM
Share

पुणे: पुण्यातील (Pune) खडकवासला (Khadakwasla) धरण 100 टक्के भरलं आहे. सध्या पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस (Rain) पडत असून, पावसामुळे जवळपास सर्वच धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. खडकवासला धरण 100 टक्के भरलं आहे. त्यामुळे आता पुण्यातील पाणीकपातीचा निर्णय मागे घेण्यात येण्याची शक्यता आहे. पुणेकरांना खडकवासला धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. जून महिन्यात म्हणावा असा पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील अनेक धरणाच्या पाणीपातळीत घट झाली होतो. खडकवासला धरणाची पातळी देखील कमी झाली होती. त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र जुलै महिन्यात जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. पावसाची संततधार सुरूच आहे. धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण 100 टक्के भरलं आहे. धरण भरल्यामुळे पुणेकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मात्र दुसरीकडे या पावसाचा शेतीला मोठा फटका बसला आहे.

शेतीला फटका

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे धरणाची पाणीपातळी वाढली. त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे आणि पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. या नद्यांचे पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. तर काही ठिकाणी संपूर्ण जमीन वाहून गेली आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. मात्र पाऊस उघडत नसल्याने सध्या दुबार पेरणी देखील शक्य नाही. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर आली आहे. पिके पाण्याखाली गेल्याने पिवळी पडली आहे. तसेच अनेकांच्या घरात पाणी देखील शिरले आहे. पाण्यामुळे अनेकांना स्थलांतर करण्याची वेळी आली आहे.

राज्यात सर्वदूर पाऊस

जुलै महिन्यात राज्यातील जवळपास सर्वच विभागात जोरदार पाऊस झाला आहे. पुणे, पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे  आलेल्या पुराचा फटका अनेकांना बसला. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तर पुरामुळे परिस्थिती बिकट बनली आहे. नद्या काठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.  खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवत असून, त्यांनी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या आहेत.

Follow Us
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका.
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच..
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच...
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स.
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण.
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो...
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो....
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार.
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट...
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट....
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे.
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव.