AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khadakwasla Dam : खडकवासला धरण 100 टक्के भरलं; पुण्यातील पाणीकपात रद्द होणार?

खडकवासला धरण (Khadakwasla Dam) 100 टक्के भरलं आहे. त्यामुळे आता पुण्यातील पाणीतपातीचा निर्णय मागे घेण्यात येण्याची शक्यता आहे.

Khadakwasla Dam : खडकवासला धरण 100 टक्के भरलं; पुण्यातील पाणीकपात रद्द होणार?
| Updated on: Jul 17, 2022 | 1:53 PM
Share

पुणे: पुण्यातील (Pune) खडकवासला (Khadakwasla) धरण 100 टक्के भरलं आहे. सध्या पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस (Rain) पडत असून, पावसामुळे जवळपास सर्वच धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. खडकवासला धरण 100 टक्के भरलं आहे. त्यामुळे आता पुण्यातील पाणीकपातीचा निर्णय मागे घेण्यात येण्याची शक्यता आहे. पुणेकरांना खडकवासला धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. जून महिन्यात म्हणावा असा पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील अनेक धरणाच्या पाणीपातळीत घट झाली होतो. खडकवासला धरणाची पातळी देखील कमी झाली होती. त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र जुलै महिन्यात जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. पावसाची संततधार सुरूच आहे. धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण 100 टक्के भरलं आहे. धरण भरल्यामुळे पुणेकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मात्र दुसरीकडे या पावसाचा शेतीला मोठा फटका बसला आहे.

शेतीला फटका

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे धरणाची पाणीपातळी वाढली. त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे आणि पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. या नद्यांचे पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. तर काही ठिकाणी संपूर्ण जमीन वाहून गेली आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. मात्र पाऊस उघडत नसल्याने सध्या दुबार पेरणी देखील शक्य नाही. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर आली आहे. पिके पाण्याखाली गेल्याने पिवळी पडली आहे. तसेच अनेकांच्या घरात पाणी देखील शिरले आहे. पाण्यामुळे अनेकांना स्थलांतर करण्याची वेळी आली आहे.

राज्यात सर्वदूर पाऊस

जुलै महिन्यात राज्यातील जवळपास सर्वच विभागात जोरदार पाऊस झाला आहे. पुणे, पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे  आलेल्या पुराचा फटका अनेकांना बसला. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तर पुरामुळे परिस्थिती बिकट बनली आहे. नद्या काठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.  खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवत असून, त्यांनी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या आहेत.

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत