AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khadakwasla Dam : खडकवासला धरण 100 टक्के भरलं; पुण्यातील पाणीकपात रद्द होणार?

खडकवासला धरण (Khadakwasla Dam) 100 टक्के भरलं आहे. त्यामुळे आता पुण्यातील पाणीतपातीचा निर्णय मागे घेण्यात येण्याची शक्यता आहे.

Khadakwasla Dam : खडकवासला धरण 100 टक्के भरलं; पुण्यातील पाणीकपात रद्द होणार?
| Updated on: Jul 17, 2022 | 1:53 PM
Share

पुणे: पुण्यातील (Pune) खडकवासला (Khadakwasla) धरण 100 टक्के भरलं आहे. सध्या पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस (Rain) पडत असून, पावसामुळे जवळपास सर्वच धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. खडकवासला धरण 100 टक्के भरलं आहे. त्यामुळे आता पुण्यातील पाणीकपातीचा निर्णय मागे घेण्यात येण्याची शक्यता आहे. पुणेकरांना खडकवासला धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. जून महिन्यात म्हणावा असा पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील अनेक धरणाच्या पाणीपातळीत घट झाली होतो. खडकवासला धरणाची पातळी देखील कमी झाली होती. त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र जुलै महिन्यात जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. पावसाची संततधार सुरूच आहे. धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण 100 टक्के भरलं आहे. धरण भरल्यामुळे पुणेकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मात्र दुसरीकडे या पावसाचा शेतीला मोठा फटका बसला आहे.

शेतीला फटका

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे धरणाची पाणीपातळी वाढली. त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे आणि पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. या नद्यांचे पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. तर काही ठिकाणी संपूर्ण जमीन वाहून गेली आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. मात्र पाऊस उघडत नसल्याने सध्या दुबार पेरणी देखील शक्य नाही. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर आली आहे. पिके पाण्याखाली गेल्याने पिवळी पडली आहे. तसेच अनेकांच्या घरात पाणी देखील शिरले आहे. पाण्यामुळे अनेकांना स्थलांतर करण्याची वेळी आली आहे.

राज्यात सर्वदूर पाऊस

जुलै महिन्यात राज्यातील जवळपास सर्वच विभागात जोरदार पाऊस झाला आहे. पुणे, पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे  आलेल्या पुराचा फटका अनेकांना बसला. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तर पुरामुळे परिस्थिती बिकट बनली आहे. नद्या काठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.  खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवत असून, त्यांनी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या आहेत.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.