AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khadakwasla Dam : खडकवासला धरण 100 टक्के भरलं; पुण्यातील पाणीकपात रद्द होणार?

खडकवासला धरण (Khadakwasla Dam) 100 टक्के भरलं आहे. त्यामुळे आता पुण्यातील पाणीतपातीचा निर्णय मागे घेण्यात येण्याची शक्यता आहे.

Khadakwasla Dam : खडकवासला धरण 100 टक्के भरलं; पुण्यातील पाणीकपात रद्द होणार?
| Updated on: Jul 17, 2022 | 1:53 PM
Share

पुणे: पुण्यातील (Pune) खडकवासला (Khadakwasla) धरण 100 टक्के भरलं आहे. सध्या पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस (Rain) पडत असून, पावसामुळे जवळपास सर्वच धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. खडकवासला धरण 100 टक्के भरलं आहे. त्यामुळे आता पुण्यातील पाणीकपातीचा निर्णय मागे घेण्यात येण्याची शक्यता आहे. पुणेकरांना खडकवासला धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. जून महिन्यात म्हणावा असा पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील अनेक धरणाच्या पाणीपातळीत घट झाली होतो. खडकवासला धरणाची पातळी देखील कमी झाली होती. त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र जुलै महिन्यात जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. पावसाची संततधार सुरूच आहे. धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण 100 टक्के भरलं आहे. धरण भरल्यामुळे पुणेकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मात्र दुसरीकडे या पावसाचा शेतीला मोठा फटका बसला आहे.

शेतीला फटका

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे धरणाची पाणीपातळी वाढली. त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे आणि पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. या नद्यांचे पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. तर काही ठिकाणी संपूर्ण जमीन वाहून गेली आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. मात्र पाऊस उघडत नसल्याने सध्या दुबार पेरणी देखील शक्य नाही. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर आली आहे. पिके पाण्याखाली गेल्याने पिवळी पडली आहे. तसेच अनेकांच्या घरात पाणी देखील शिरले आहे. पाण्यामुळे अनेकांना स्थलांतर करण्याची वेळी आली आहे.

राज्यात सर्वदूर पाऊस

जुलै महिन्यात राज्यातील जवळपास सर्वच विभागात जोरदार पाऊस झाला आहे. पुणे, पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे  आलेल्या पुराचा फटका अनेकांना बसला. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तर पुरामुळे परिस्थिती बिकट बनली आहे. नद्या काठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.  खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवत असून, त्यांनी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या आहेत.

Follow Us
शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Raut on NCP | शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले, थेट...
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर