AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“या सरकारच्या आर्थिक धोरणामुळे सामान्य माणसाच्या डोक्यावर महागाईच ओझं”; राष्ट्रवादीचा केंद्र-राज्य सरकारवर हल्लाबोल

केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजप सत्तेत आहे. राज्यातील आणि देशातील समस्या न मिठवता या दोन्ही सरकारकडून नको ते समस्या निर्माण केल्या जात आहेत.

या सरकारच्या आर्थिक धोरणामुळे सामान्य माणसाच्या डोक्यावर महागाईच ओझं; राष्ट्रवादीचा केंद्र-राज्य सरकारवर हल्लाबोल
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jan 04, 2023 | 8:14 PM
Share

पुणेः मागील गेल्या काही दिवसांपासून राज्याबरोबर देशात महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे देशातील जनसामान्य नागरिक महागाईमुळे त्रस्त झाला आहे. महागाई, बेरोजगारी, औद्योगिक क्षेत्राला देशातीला आणि राज्यातील सरकारामुळे मोठा फटका बसला आहे त्यामुळे अशा सरकारला आम्हाला पुन्हा संधी द्यायची नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारला लगावला आहे. राज्य आणि केंद्रातील सरकारच्या भूमिकेमुळेच महाराष्ट्रातील जनतेचे हाल होत आहेत अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

सामान्य माणसाला महागाईच्या गर्तेत ढकलून देण्याचं काम राज्यकर्ते करत आहेत. या सरकारच्या आर्थिक धोरणामुळे सामान्य माणसाच्या डोक्यावर महागाईच ओझं आहे.

महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक संकटामुळे येथील नागरिक मेटाकुटीला आला आहे. जनसामान्यांना डोकेदुखी ठरणाऱ्या या अशा सरकारला आम्हाला पुन्हा संधी द्यायचीच नाही असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

राज्याबरोबरच देशावर बेरोजगारीच मोठे संकट आहे. लोकांना काम करण्याची संधी दिली जात नाही त्यामुळे येथील प्रत्येक नागरिक हा आर्थिक संकटात सापडल आहे.

देशात ज्या प्रमाणे महागाईचे संकट आहे, त्याच प्रमाणे बेरोजगारीचेही मोठे संकट आहे. बेरोजगारीमुळे विवाह ठरणे मुश्किल झाले आहे. नोकरी नाही म्हणून लग्नासाठी मुलांसाठी मुली मिळत नाही ही आता राज्यातील युवकांसमोर समस्या निर्माण झाली आहे. या बेरोजगारीचा परिमाण मुलांची लग्न थांबण्यावर झाला असल्याची चिंताही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजप सत्तेत आहे. राज्यातील आणि देशातील समस्या न मिठवता या दोन्ही सरकारकडून नको ते समस्या निर्माण केल्या जात आहेत.

लोकं महागाईमुळे मेटाकुटीला आलेली असतानाच भाजपकडून मात्र जाती जातीमध्ये तेड निर्माण करून धर्मा धर्मामध्ये वाद निर्माण केले जात आहेत. धर्म, जात यावर वाद निर्माण केल्यामुळे लोकांचं लक्ष विचलित केले जात असल्याची टीकाही त्यांनी भाजपवर केली आहे.

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग