AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“या सरकारच्या आर्थिक धोरणामुळे सामान्य माणसाच्या डोक्यावर महागाईच ओझं”; राष्ट्रवादीचा केंद्र-राज्य सरकारवर हल्लाबोल

केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजप सत्तेत आहे. राज्यातील आणि देशातील समस्या न मिठवता या दोन्ही सरकारकडून नको ते समस्या निर्माण केल्या जात आहेत.

या सरकारच्या आर्थिक धोरणामुळे सामान्य माणसाच्या डोक्यावर महागाईच ओझं; राष्ट्रवादीचा केंद्र-राज्य सरकारवर हल्लाबोल
| Updated on: Jan 04, 2023 | 8:14 PM
Share

पुणेः मागील गेल्या काही दिवसांपासून राज्याबरोबर देशात महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे देशातील जनसामान्य नागरिक महागाईमुळे त्रस्त झाला आहे. महागाई, बेरोजगारी, औद्योगिक क्षेत्राला देशातीला आणि राज्यातील सरकारामुळे मोठा फटका बसला आहे त्यामुळे अशा सरकारला आम्हाला पुन्हा संधी द्यायची नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारला लगावला आहे. राज्य आणि केंद्रातील सरकारच्या भूमिकेमुळेच महाराष्ट्रातील जनतेचे हाल होत आहेत अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

सामान्य माणसाला महागाईच्या गर्तेत ढकलून देण्याचं काम राज्यकर्ते करत आहेत. या सरकारच्या आर्थिक धोरणामुळे सामान्य माणसाच्या डोक्यावर महागाईच ओझं आहे.

महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक संकटामुळे येथील नागरिक मेटाकुटीला आला आहे. जनसामान्यांना डोकेदुखी ठरणाऱ्या या अशा सरकारला आम्हाला पुन्हा संधी द्यायचीच नाही असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

राज्याबरोबरच देशावर बेरोजगारीच मोठे संकट आहे. लोकांना काम करण्याची संधी दिली जात नाही त्यामुळे येथील प्रत्येक नागरिक हा आर्थिक संकटात सापडल आहे.

देशात ज्या प्रमाणे महागाईचे संकट आहे, त्याच प्रमाणे बेरोजगारीचेही मोठे संकट आहे. बेरोजगारीमुळे विवाह ठरणे मुश्किल झाले आहे. नोकरी नाही म्हणून लग्नासाठी मुलांसाठी मुली मिळत नाही ही आता राज्यातील युवकांसमोर समस्या निर्माण झाली आहे. या बेरोजगारीचा परिमाण मुलांची लग्न थांबण्यावर झाला असल्याची चिंताही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजप सत्तेत आहे. राज्यातील आणि देशातील समस्या न मिठवता या दोन्ही सरकारकडून नको ते समस्या निर्माण केल्या जात आहेत.

लोकं महागाईमुळे मेटाकुटीला आलेली असतानाच भाजपकडून मात्र जाती जातीमध्ये तेड निर्माण करून धर्मा धर्मामध्ये वाद निर्माण केले जात आहेत. धर्म, जात यावर वाद निर्माण केल्यामुळे लोकांचं लक्ष विचलित केले जात असल्याची टीकाही त्यांनी भाजपवर केली आहे.

Follow Us
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.
इराण–इस्त्रायल युद्धावर भारताची भूमिका कुठे?
इराण–इस्त्रायल युद्धावर भारताची भूमिका कुठे?.
जय श्रीराम म्हणा सर्व काही मिळेल;गॅस टंचाईवरून राऊतांचा सरकारवर निशाणा
जय श्रीराम म्हणा सर्व काही मिळेल;गॅस टंचाईवरून राऊतांचा सरकारवर निशाणा.
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?.
युद्धाचा परिणाम घरगुती गॅस सिलेंडरवर, थेट पोलीस बंदोबस्तात वाटप
युद्धाचा परिणाम घरगुती गॅस सिलेंडरवर, थेट पोलीस बंदोबस्तात वाटप.
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.