AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे शहरातील व्यक्तीला कोर्टाने दिली सर्वात मोठी शिक्षा, १००, २०० वर्षेही नाही तर त्यापेक्षाही जास्त

जिल्हा न्यायालयाने एका प्रकरणात आरोपीला मोठी शिक्षा दिलाय. आरोपीला दहा, वीस वर्ष नाही तर त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी शिक्षा सुनावली आहे. अगदी शंभर, दोनशे वर्षांपेक्षाही कितीतरी जास्त शिक्षा देण्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे.

पुणे शहरातील व्यक्तीला कोर्टाने दिली सर्वात मोठी शिक्षा, १००, २०० वर्षेही नाही तर त्यापेक्षाही जास्त
इकबाल मिर्चीचा कथित साथीदार हारुन युसुफला जामीनImage Credit source: Google
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 25, 2023 | 11:59 AM
Share

पुणे, सिहोर : गुन्हेगारांना होणाऱ्या शिक्षेचे अनेक प्रकार तुम्ही ऐकले असतील अन् वाचले असतील. परंतु नुकताच मध्य प्रदेशातील न्यायालयाने दिलेला निकाल ऐकून आश्चर्य वाटेल. मध्य प्रदेशातील सिहोर जिल्हा न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. न्यायालयाने आरोपींना जबर बसणारी शिक्षा दिली आहे. शिक्षा झालेल्या व्यक्तींमध्ये पुणे शहरातील व्यक्तीचाही समावेश आहे. एका आरोपीला दहा, वीस वर्ष नाही तर त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी शिक्षा झाली आहे. अगदी शंभर, दोनशे वर्षांपेक्षाही जास्त शिक्षा झालीय.

काय आहे प्रकरण

न्यायालयाने शिक्षा दिलेले प्रकरण फसवणुकीचे आहे. साईप्रसाद कंपनीच्या संचालकानी चिंटफंड कंपनी सुरु केली. त्यामाध्यमातून कोट्यवधी रुपयांमध्ये लोकांची फसवणूक केली. न्यायालयाने त्यांना 250 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. कंपनीच्या सिहोर शाखेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

कोणाला झाली शिक्षा

चिटफंड प्रकरणात शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव बाळासाहेब भापकर आहे. त्याला 250 वर्षांची शिक्षा झाली आहे. भापकर याच्यासह कंपनीचे सीहोर शाखेचे कर्मचारी दीपसिंग वर्मा, लखनलाल वर्मा, जितेंद्र कुमार आणि राजेश परमार यांनाही प्रत्येकी पाच वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे. सिहोर जिल्हा न्यायालयाचे विशेष न्यायाधीश संजयकुमार शाही यांनी ही शिक्षा दिली.

काय केले आरोपीने

आरोपी बाळासाहेब भापकर याने साई प्रसाद नावाने चिटफंड कंपनी स्थापन केली होती. या कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांना पाच वर्षांत दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवले. यामुळे चांगल्या नफ्याच्या आमिषाने अनेकांनी चिटफंड कंपनीत पैसे गुंतवले. मात्र पैसे देण्याची वेळ आली तेव्हा कंपनीला कुलूप लावून पळ काढला. या प्रकरणी 2016 मध्ये सीहोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आता न्यायालयाने या कंपनीच्या संचालकाला 250 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

बाळासाहेब पुण्यातील रहिवाशी

चिटफंड कंपनीचे संचालक बाळासाहेब भापकर हे पुणे शहरातील रहिवासी आहेत. दीप सिंग वर्मा, राजेश उर्फ ​​चेतनारायण परमार, लखन लाल वर्मा आणि जितेंद्र कुमार वर्मा यांच्यासोबत तो ही कंपनी चालवत होता. या प्रकरणी बाळासाहेब भापकर यांना 250 वर्षांची शिक्षा झाली आहे.

Follow Us
शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी
NCP Banner | शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? कायदेशीर परवानगी अन्... राजकीय चर्चांना उधाण
आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये....
Shrirampur Crime Case | आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये मृतदेहासह पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन
मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह....
Asangaon to Vasind | मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह एक्स्प्रेस गाड्या अर्धा तास रांगेत
री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून...
Kalyan Collapsed Building | री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून उडी मारून...
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय घडामोडींना वेग
विनायक राऊत यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप, गिरीजा राऊतांच्या तक्रारीनंत
विनायक राऊत यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप, गिरीजा राऊतांच्या तक्रारीनंतर विशेष पथक स्थापन, आता...
तब्बल 7 हजार सायकलवरून पंढरी गाठणाऱ्या वारकऱ्यांचा उत्साह पाहाच
Pandharpur | आषाढी वारीत सायकल वारीची धूम! तब्बल 7 हजार सायकलवरून पंढरी गाठणाऱ्या वारकऱ्यांचा उत्साह पाहाच
नीता अंबानी ठरल्या मोस्ट पॉवरफुल वुमन 2026, मुंबईतील भव्य कार्यक्रमात
Nita Ambani | नीता अंबानी ठरल्या मोस्ट पॉवरफुल वुमन 2026, मुंबईतील भव्य कार्यक्रमात बहुमान!
भारतासह इतर देशांचे 650 विमान उड्डाण रद्द; अचानक... नेमकं काय घडतंय?
भारतासह इतर देशांचे 650 विमान उड्डाण रद्द; अचानक... नेमकं काय घडतंय?
जाता पंढरीशी सुख वाटे जिवा... संत सोपानदेवांच्या पालखीने धरला पंढरीचा
जाता पंढरीशी सुख वाटे जिवा... संत सोपानदेवांच्या पालखीने धरला पंढरीचा मार्ग