AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : प्रत्येक जिल्ह्यात सायन्स सेंटर सुरू करणार, अजित पवारांची घोषणा; सायन्स अॅन्ड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटरचं बारामतीत उद्घाटन

प्रत्येक मुलाला स्वतःचे सामर्थ्य कौशल्य ओळखण्यात समर्थन करणे आणि ज्ञान कौशल्य आणि मूल्याचा पाया मजबूत करणार. त्याबरोबरच रोजगार आणि व्यावसायिक कौशल्य यांच्या निर्मितीसाठी आणि भविष्यातील शिक्षणासाठी पुढे जाण्यास तयार करणे याला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे, असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar : प्रत्येक जिल्ह्यात सायन्स सेंटर सुरू करणार, अजित पवारांची घोषणा; सायन्स अॅन्ड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटरचं बारामतीत उद्घाटन
अजित पवार Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jun 16, 2022 | 12:52 PM
Share

बारामती, पुणे : विज्ञानदृष्टी (Science) निर्माण करणारे शिक्षण हे आपल्याला हवे आहे. आपल्याकडे अनेक मोठमोठ्या विज्ञान संस्था आहेत. विद्यार्थ्यांना कधीतरी त्या ठिकाणी भेट देण्याची संधी मिळते. आमच्या विद्यार्थ्यांना वाटते परंतु त्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाची क्रीडांगण ठरतील अशी केंद्र सुरू होणे ही काळाची गरज आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले. ते बारामतीत बोलत होते. सायन्स अॅन्ड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटरचे उद्घाटन आज करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी त्यांनी विज्ञानाची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani), शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर शरद पवार इन्स्पायर फेलोशिप समारंभही पार पडला. फेलोशिप प्राप्त विद्यार्थ्यांशी थेट संवाद मान्यवरांनी साधला.

‘प्रत्येक जिल्ह्यात सायन्स सेंटर सुरू करणार’

अजित पवार म्हणाले, की विज्ञान-तंत्रज्ञानाची गरज ओळखून राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग मुंबई महाराष्ट्रात जाण्याचा प्रयत्न करणार आहे. या सेंटरचा विज्ञानाची गोडी निर्माण करण्यात नक्कीच उपयोग होईल, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही, असे म्हणत किती लोकांना माहिती आहे माहीत नाही, परंतु महाराष्ट्रात 9 ते 18 वयोगटातील 67 लाख शालेय मुले आणि 26,800 माध्यमिक शाळांच्यामध्ये औपचारिक शालेय शिक्षण त्या त्या ठिकाणी घेत आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. पुढच्या वर्षाच्या अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्ह्यात सायन्स सेंटर सुरू केले जाणार. सरकार म्हणून आम्ही पुढाकार घेऊ, अशी घोषणा अजित पवारांनी यावेळी केली.

आजची पिढी देशाचे उद्याचे मनुष्यबळ

प्रत्येक मुलाला स्वतःचे सामर्थ्य कौशल्य ओळखण्यात समर्थन करणे आणि ज्ञान कौशल्य आणि मूल्याचा पाया मजबूत करणार. त्याबरोबरच रोजगार आणि व्यावसायिक कौशल्य यांच्या निर्मितीसाठी आणि भविष्यातील शिक्षणासाठी पुढे जाण्यास तयार करणे याला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे, असे अजित पवार म्हणाले. आपली आजची पिढी हे आपल्या देशाचे उद्याचे मनुष्यबळ आहे. त्यांना भविष्यकालीन येणाऱ्या आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यास तयार करत असताना त्या आव्हानांवर मात करून संधीत रुपांतर करता येईल, याचा विचार होणे गरजेचे आहे, असे अजित पवार म्हणाले.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.