AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणातील अनोखा योगायोग, भाऊ-बहीण झाले सरपंच अन् उपसरपंच

Sarpanch and upsarpanch election : एखाद्या गावात भाऊ अन् बहिण सरपंच अन् उपसरपंच होण्याचा दुर्मिळ योग आला आहे. पुणे जिल्ह्यात एकाच वेळी नातेवाईकांना गावातील दोन्ही मोठी पदे मिळाली आहे. या योगायोगाची चर्चा होत आहे.

राजकारणातील अनोखा योगायोग, भाऊ-बहीण झाले सरपंच अन् उपसरपंच
| Updated on: Apr 22, 2023 | 12:21 PM
Share

मुळशी, पुणे : गावातील राजकारण हे दिल्ली, मुंबईतील राजकारणापेक्षा वेगळे असते. गावात सर्वांना सोबत घेऊन चालावे लागते. प्रत्येक गट आणि समाजाला स्थान द्यावे लागते. नाहीतर लहान गावांमधील राजकारण कटूता निर्माण करु शकते. राज्यातील राजकारणात पुणे जिल्ह्यातील राजकारणाची चर्चा नेहमी होत असते. त्याचा आदर्श घेऊन नवनवीन पायंडे पडत असतात. आता पुणे जिल्ह्यात एकाच वेळी भाऊ सरपंच झाला तर बहीण उपसरंपच झाली. एकाच वेळी नातेवाईकांना गावातील दोन्ही मोठी पदे मिळाल्याचा हा दुर्मिळ योगायोग ठरला.

कुठे झाली निवडणूक

पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यातील भुकूम गावात सरपंच आणि उपसरपंचाची निवडणूक होणार होती. परंतु सर्व सदस्यांनी मिळून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर भुकूम गावाच्या इतिहासात प्रथमच मावस बहीण-भाऊ सरपंच -उपसरपंच पदी विराजमान झाले आहेत. गावाच्या सरपंचपदी मयुरी आमले यांची बिनविरोध निवड झाली तर उपसरपंचपदी अंकुश खाटपे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

मयुरी यांच्या माध्यमातून महिला राज

गावात सरंपचपद महिलेकडे गेले आहे. मयुरी आमले सरपंच झाल्या आहेत. यामुळे गावाचा कारभार एका आर्थाने महिलांकडे गेला आहे. युवा सरंपच झालेल्या मयुरी आमले गावाच्या विकासासाठी मोठा बदल करणार आहे. यामुळेच गावकऱ्यांनी विश्वासाने त्यांची बिनविरोध निवड केली आहे.

सर्वच क्षेत्रात महिला

सध्या नोकरी, व्यवसाय, राजकारण, समाजकारण आता सर्वच क्षेत्रात महिला मजल मारत आहे. राजकारणात अनेक महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. महिला संधी मिळाल्यास तिने तिचे सोने करून गावाचा कायापालट केला आहे. कधी घराचा उंबरठा ओलांडला नसलेली महिला आता गावचा कारभार सांभाळत आहेत.

बिनविरोध निवड गरजेची का

ग्रामपंचायत निवडणुकीत कुठलाही उमेदवार राजकीय पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढत नसला तरी राजकीय पक्षांचा निवडणुकीत शिरकाव असतोच. मतदार संख्या कमी असल्याने प्रत्येक मत अत्यंत महत्वाचे होऊन जाते. त्यामुळे गावातील समाज जीवन पूर्णपणे ढवळून निघते. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होतात, अनेक वेळा भांडणं-वाद निर्माण होतात. गाव हा पक्षांमध्ये, जातीमध्ये विभागाला जाऊन भावकी आणि समाजामध्ये दुफळी निर्माण होते. यामुळे बिनविरोध निवड कधी चागंली संस्कृती आहे.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.