AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMC election 2022 : प्रभाग रचनेतल्या बदलामुळे पुणेकर नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा, विवेक वेलणकरांचा आरोप

केवळ पैसाच नाही, तर श्रमही आपण पाहायला हवे. सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती. त्यांची नेहमीची कामे सोडून ही कामे केली. नागरिकांनी निवडणुकीच्या निमित्ताने हा सवाल विचारला पाहिजे, असे विवेक वेलणकर म्हणाले.

PMC election 2022 : प्रभाग रचनेतल्या बदलामुळे पुणेकर नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा, विवेक वेलणकरांचा आरोप
प्रभाग रचनेतील बदलावरून विवेक वेलणकरांचे राजकारण्यांना प्रश्नImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Aug 07, 2022 | 12:06 PM
Share

अभिजीत पोते, पुणे : जे चालले आहे, ते अत्यंत वाईच पद्धतीने सुरू आहे. तीन सदस्यीय प्रभाग रचनेवरून (Ward) आता पुन्हा चार सदस्यांचा प्रभाग करण्यात आला आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे, असा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी केला आहे. ते पुण्यात टीव्ही 9 सोबत बोलत होते. महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत राज्य सरकारने पुन्हा मोठा बदल केला आहे. महाविकास आघाडी सरकारने महानगरपालिकेत निवडणूक (PMC election 2022) प्रभाग रचना बदलत तीन सदस्यांचा वॉर्ड केला होता. पण राज्य सरकारने काल पूर्ण नवा निर्णय घेतला आणि पुणे महानगरपालिकेत चार सदस्यांचा प्रभाग असेल, असे नव्याने जाहीर केले आहे. पण सरकारच्या या निर्णय बदलाने पुणेकरांना मात्र मोठा आर्थिक फटका बसला आहे, असे ते म्हणाले.

नव्याने सुरू होणार प्रक्रिया

या प्रभाग रचनेतील बदलामुळे पुणेकरांनी भरलेल्या दीड कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे, असे ते म्हणाले. आधी एक, दोन का तीन यावर महिने वाया गेले. मग तीनवर फायनल झाले. सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आणि आता अचानक चारचे पुढे आले आहे. यापूर्वी महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. पण आता सर्व प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने, नव्या नियमांनुसार ही प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. त्यामुळे आधी केलेला दीड कोटी रुपये खर्च हा पाण्यात जाणार आहे.

‘पैसाच नाही श्रमही वाया

केवळ पैसाच नाही, तर श्रमही आपण पाहायला हवे. सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती. त्यांची नेहमीची कामे सोडून ही कामे केली. नागरिकांनी निवडणुकीच्या निमित्ताने हा सवाल विचारला पाहिजे, असे ते म्हणाले. राजकारणापुढे काहीही या राजकारण्यांना दिसत नाही, असा आरोपही वेलणकर यांनी केला आहे.

‘राजकारणासाठी पुणेकरांच्या पैशाचा बळी’

महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी यावेळी तीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी महापालिकेने तीन सदस्य प्रभाग रचना अंतिम झाल्यावर मतदार याद्यांच्या छापाईसाठी 71 लाख, प्रभाग सोडत, आरक्षण सोडत यासाठी 64 लाख रुपये खर्च केले होते. पण आता हा सगळा खर्च वाया गेला आहे आणि राजकारणी लोक केवळ राजकारणासाठी पुणेकरांच्या पैशाचा बळी देत असल्याचा आरोप आता पुणेकर करतात.

Follow Us
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली उपस्थिती; नेमकी भानगड काय?
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ