AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होतील’, अंबादास दानवे यांचं कार्यकर्त्यांसमोर मोठं वक्तव्य

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अतिशय मोठं वक्तव्य केलं आहे. इंडिया आघाडीला देशात बहुमत आलं तर उद्धव ठाकरे हे देशाचे नवे पंतप्रधान होतील, असं मोठं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं आहे. याबाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती अंबादास दानवे यांनी कार्यकर्त्यांना दिली.

'उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होतील', अंबादास दानवे यांचं कार्यकर्त्यांसमोर मोठं वक्तव्य
उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे
| Edited By: | Updated on: Jun 03, 2024 | 9:44 PM
Share

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठं भाकीत वर्तवलं आहे. इंडिया आघाडीला देशात बहुमत आलं तर उद्धव ठाकरे हे देशाचे नवे पंतप्रधान होतील, असं मोठं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं. ठाकरे गटाची लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी छत्रपती संभाजीनगरमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. या दोन्ही नेत्यांनी निकालाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना नियोजनाबाबत सूचना केल्या. यावेळी अंबादास दानवे यांनी मोठं वक्तव्य केलं. “परवा इंडिया आघाडीची बैठक झाली. त्यामध्ये असं म्हणतात की, देशात इंडिया आघाडीला मेजॉरिटी आली तर पंतप्रधान उद्धवजी ठाकरे होतील”, असं मोठं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं.

अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले?

“सकाळची वेळ सर्वांनी पाळली पाहिजे. सगळ्यांना संपर्क केला जाईल. परवा इंडिया आघाडीची बैठक झाली. त्यामध्ये असं म्हणतात की, देशात इंडिया आघाडीला मेजॉरिटी आली तर पंतप्रधान उद्धवजी ठाकरे होतील. मला वाटतं, सर्व शिवसैनिकांना याच्यासारखा आनंद होणारा कोणताही क्षण नसेल. शिवसेना संपली, नकली शिवसेना, असं म्हणताय. पण हीच शिवसेना देशाचं नेतृत्व करेल. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे”, असं अंबादास दानवे म्हणाले.

“राज्याचे डीजी आहेत, त्यांना भेटायला गेलो होतो. ॲडिशनल डीजी आहेत, त्यांना देखील भेटलो. हे चार जण होती. त्यातला एकही माणूस असं म्हटला नाही की तुम्ही हारणार आहेत. ते उलट म्हटले की, येणारा काळ तुमचा आहे. अनेक सर्व्हे येत आहेत. सर्व्हेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या जागा दाखवल्या जातात. एका सर्व्हेमध्ये तर 17 ते 18 जागा दाखवल्या आहेत. आपल्यातले गद्दार गेले ते म्हणजे आपल्यातली घाण गेली. येणाऱ्या काळात या संभाजीनगर लोकसभेच्या विजयातून मराठवाड्यात महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आपण नक्की काम करू”, असा विश्वास अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.