AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना एकदाच टोल भरावा लागणार, किती पैसे मोजावे लागणार?

समृद्धी महामार्गावरील प्रवासासाठी किती टोल भरावा लागेल?

समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना एकदाच टोल भरावा लागणार, किती पैसे मोजावे लागणार?
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Dec 10, 2022 | 2:50 PM
Share

मुंबई : राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणारा 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग आता लोकांच्या सेवेसाठी सज्ज झालाय. ‘वेगवान प्रवास’ अशी ओळख निर्माण करणारा समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg Opening) आपल्या खिशाला परवडणारा आहे का? प्रवासासाठी असा प्रश्न अनेकांना पडलाय. तुम्ही जर समृद्धी महामार्गावरून प्रवास (Samruddhi Mahamarg Toll) करणार असाल, तर तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील? पाहुयात…

इतर महामार्गावरू प्रवास करताना अनेकदा टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी थांबावं लागतं. पण समृद्धी महामार्गावरचा प्रवास हा विना अडथळा असणार आहे. तुम्हाला एकदाच टोल भरावा लागणार आहे.

समृद्धी महामार्गावर प्रवासाला सुरुवात केल्यानंतर तुम्ही सुसाट प्रवास करू शकणार आहात. ज्या ठिकाणी तुम्ही समृद्धी महामार्गातून बाहेर पडणार आहात तिथे Exit Point ला एकदाच टोल भरावा लागणार आहे. तो प्रतिकिलोमीटरच्या हिशोबाने असेल.

कारसाठी किती टोल?

कारने प्रवास करताना प्रतिकिलोमीटर 1 रुपया 73 या दराने पैसे द्यावे लागणार आहेत. जितके किलोमीटर अंतर तुम्ही पार केलं असेल तितकेच पैसे तुम्हाला भरावे लागणार आहेत. जर तुम्ही नागपूर ते शिर्डी असा 520 किलोमीटरचा प्रवास कारने करणार असाल तर तुम्हाला 900 रूपये भरावे लागतील. तेच जर तुम्ही नागपूर ते मुंबई असा प्रवास करणार असाल तर 1200 रुपयांच्या आसपास खर्च करावा लागणार.

जड वाहनांसाठी किती टोल?

मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी 2 रुपये 79 पैसे इतका खर्च येणार आहे. बस ट्रक किंवा अन्य जड वाहनांसाठी 5 रुपये 85 प्रतिकिलोमीटर दर असेल. त्याचप्रमाणे मोठ्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी 6 रुपये 38 प्रतिकिलोमीटर दर असेल.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.