AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना एकदाच टोल भरावा लागणार, किती पैसे मोजावे लागणार?

समृद्धी महामार्गावरील प्रवासासाठी किती टोल भरावा लागेल?

समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना एकदाच टोल भरावा लागणार, किती पैसे मोजावे लागणार?
| Updated on: Dec 10, 2022 | 2:50 PM
Share

मुंबई : राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणारा 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग आता लोकांच्या सेवेसाठी सज्ज झालाय. ‘वेगवान प्रवास’ अशी ओळख निर्माण करणारा समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg Opening) आपल्या खिशाला परवडणारा आहे का? प्रवासासाठी असा प्रश्न अनेकांना पडलाय. तुम्ही जर समृद्धी महामार्गावरून प्रवास (Samruddhi Mahamarg Toll) करणार असाल, तर तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील? पाहुयात…

इतर महामार्गावरू प्रवास करताना अनेकदा टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी थांबावं लागतं. पण समृद्धी महामार्गावरचा प्रवास हा विना अडथळा असणार आहे. तुम्हाला एकदाच टोल भरावा लागणार आहे.

समृद्धी महामार्गावर प्रवासाला सुरुवात केल्यानंतर तुम्ही सुसाट प्रवास करू शकणार आहात. ज्या ठिकाणी तुम्ही समृद्धी महामार्गातून बाहेर पडणार आहात तिथे Exit Point ला एकदाच टोल भरावा लागणार आहे. तो प्रतिकिलोमीटरच्या हिशोबाने असेल.

कारसाठी किती टोल?

कारने प्रवास करताना प्रतिकिलोमीटर 1 रुपया 73 या दराने पैसे द्यावे लागणार आहेत. जितके किलोमीटर अंतर तुम्ही पार केलं असेल तितकेच पैसे तुम्हाला भरावे लागणार आहेत. जर तुम्ही नागपूर ते शिर्डी असा 520 किलोमीटरचा प्रवास कारने करणार असाल तर तुम्हाला 900 रूपये भरावे लागतील. तेच जर तुम्ही नागपूर ते मुंबई असा प्रवास करणार असाल तर 1200 रुपयांच्या आसपास खर्च करावा लागणार.

जड वाहनांसाठी किती टोल?

मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी 2 रुपये 79 पैसे इतका खर्च येणार आहे. बस ट्रक किंवा अन्य जड वाहनांसाठी 5 रुपये 85 प्रतिकिलोमीटर दर असेल. त्याचप्रमाणे मोठ्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी 6 रुपये 38 प्रतिकिलोमीटर दर असेल.

महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?.
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड.
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून.
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?.
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये.
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल.
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.
मुंबई हादरली! बाप झाला हैवान, मुकबधीर मुलीवर अत्याचार
मुंबई हादरली! बाप झाला हैवान, मुकबधीर मुलीवर अत्याचार.
सुनेत्रा पवारांचा बॅनरवरून फोटो गायब; रायगडमधील प्रकाराने खळबळ
सुनेत्रा पवारांचा बॅनरवरून फोटो गायब; रायगडमधील प्रकाराने खळबळ.
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.