AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना एकदाच टोल भरावा लागणार, किती पैसे मोजावे लागणार?

समृद्धी महामार्गावरील प्रवासासाठी किती टोल भरावा लागेल?

समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना एकदाच टोल भरावा लागणार, किती पैसे मोजावे लागणार?
| Updated on: Dec 10, 2022 | 2:50 PM
Share

मुंबई : राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणारा 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग आता लोकांच्या सेवेसाठी सज्ज झालाय. ‘वेगवान प्रवास’ अशी ओळख निर्माण करणारा समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg Opening) आपल्या खिशाला परवडणारा आहे का? प्रवासासाठी असा प्रश्न अनेकांना पडलाय. तुम्ही जर समृद्धी महामार्गावरून प्रवास (Samruddhi Mahamarg Toll) करणार असाल, तर तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील? पाहुयात…

इतर महामार्गावरू प्रवास करताना अनेकदा टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी थांबावं लागतं. पण समृद्धी महामार्गावरचा प्रवास हा विना अडथळा असणार आहे. तुम्हाला एकदाच टोल भरावा लागणार आहे.

समृद्धी महामार्गावर प्रवासाला सुरुवात केल्यानंतर तुम्ही सुसाट प्रवास करू शकणार आहात. ज्या ठिकाणी तुम्ही समृद्धी महामार्गातून बाहेर पडणार आहात तिथे Exit Point ला एकदाच टोल भरावा लागणार आहे. तो प्रतिकिलोमीटरच्या हिशोबाने असेल.

कारसाठी किती टोल?

कारने प्रवास करताना प्रतिकिलोमीटर 1 रुपया 73 या दराने पैसे द्यावे लागणार आहेत. जितके किलोमीटर अंतर तुम्ही पार केलं असेल तितकेच पैसे तुम्हाला भरावे लागणार आहेत. जर तुम्ही नागपूर ते शिर्डी असा 520 किलोमीटरचा प्रवास कारने करणार असाल तर तुम्हाला 900 रूपये भरावे लागतील. तेच जर तुम्ही नागपूर ते मुंबई असा प्रवास करणार असाल तर 1200 रुपयांच्या आसपास खर्च करावा लागणार.

जड वाहनांसाठी किती टोल?

मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी 2 रुपये 79 पैसे इतका खर्च येणार आहे. बस ट्रक किंवा अन्य जड वाहनांसाठी 5 रुपये 85 प्रतिकिलोमीटर दर असेल. त्याचप्रमाणे मोठ्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी 6 रुपये 38 प्रतिकिलोमीटर दर असेल.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.