AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समृद्धी महामार्ग आल्याने काय फायदा होणार?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उलगडून सांगितलं…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची Exclusive मुलाखत...

समृद्धी महामार्ग आल्याने काय फायदा होणार?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उलगडून सांगितलं...
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Dec 10, 2022 | 10:06 AM
Share

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं उद्या लोकार्पण होणार आहे. त्याआधी समृद्धी महामार्गामुळे (Samruddhi Mahamarg) काय फायदा होणार आहे? या महामार्गाचा वाहतुकीसाठी कसा फायदा होणार आहे? टोल किती द्यावा लागणार?, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष मुलाखत (Cm Eknath Shinde Exclusive Interview) tv9 मराठीवर…

समृद्धी महामार्ग का?

ज्या देशातील रस्ते चांगले असतात त्या देशाची प्रगती अधिक वेगाने होते. अमेरिकेचंही तसंच आहे. त्यामुळे समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख उंचावेल, असा विश्वास आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मुलाखतीत बोलताना सांगितलं.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडण्यात आली. तेव्हा मी मंत्री होतो. तेव्हा या महामार्गाचं काम सुरू झालं. आता मी मुख्यमंत्री असताना त्याचं लोकर्पण होतंय. लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होतंय आणि या महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलंय, याचा मला आनंद आहे, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

समृद्धी महामार्ग सत्यात आणण्याचा मार्ग खडतर होता. पण त्याचं काम उत्तम झालंय. याचा मला आनंद आहे, असंही शिंदे म्हणालेत.

जमीनी द्यायला शेतकऱ्यांचा विरोध होता. त्यांना जमीनी द्यायला तयार करावं लागत होतं. काही ठिकाणी मुद्दाम विरोध करायला भाग पाडलं जात होतं. तेव्हा मी स्वत: बुलढाण्याला गेलो होतो. त्यांचा समज मी दूर केला. त्यांना फायदा दाखवून दिला. त्यांच्या जमीनीचा योग्य मोबदला देण्याचं वचन दिलं. लोकांना विश्वास नव्हता की त्यांना योग्य दाम मिळेल की नाही याचा पण मी त्यांना खात्री दिली. कागदावर सही करून दिली. तेव्हा हे लोक आपली जमीन द्यायला तयार झाले, अशी आठवण शिंदेंनी सांगितली.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या संपूर्ण मुलाखतीची लिंक

बुलढाण्याच्या लोकांचं मन परिवर्तन केल्यानंतर आम्ही तिथून निघालो. पायलटकडून विमान ढगात गेलं. तेव्हाचा तो प्रवास अतिशय अडचणीचा होता. तो थरारक प्रवास अजही आठवतो, असं शिंदेंनी सांगितलं.

Follow Us
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....