AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मोदींच्या महाराष्ट्रात प्रचंड सभा झाल्या, 15 हजार खुर्च्यांपैकी 14 हजार रिकाम्याच होत्या,’ राऊतांचा पंतप्रधानांना खोचक टोला

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

'मोदींच्या महाराष्ट्रात प्रचंड सभा झाल्या, 15 हजार खुर्च्यांपैकी 14 हजार रिकाम्याच होत्या,' राऊतांचा पंतप्रधानांना खोचक टोला
संजय राऊत, खासदार, ठाकरे गटImage Credit source: ANI
| Updated on: Nov 09, 2024 | 9:52 PM
Share
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. जोरदार प्रचार सुरू असून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दरम्यान आज पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जाहीर सभेमधून भाजप आणि पंतप्रधान मोदी  यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या प्रचार सभेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन चार दिवसांपासून राज्यात आहेत, प्रचंड सभा झाल्या 15 हजार खुर्च्या होत्या, त्यातल्या 14 हजार रिकाम्या होत्या, असा टोला यावेळी संजय राऊत यांनी लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले राऊत? 

शिवसेनेच्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, दीड हजार ही रक्कम आहे का? आपण परवा महालक्ष्मी योजना जाहीर केली, महिन्याला ३ हजार, महिलांना राज्यभरात मोफत प्रवास, मानसन्मान राहील अशा या योजना आहेत. सिलींडर १४०० रुपयांना आणि २५ लाखांचा विमा याला राज्य चालवणे म्हणतात का? योजना यासाठी सांगितल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन चार दिवसांपासून राज्यात आहेत, प्रचंड सभा झाल्या. 15 हजार खुर्च्या होत्या, त्यातल्या 14 हजार रिकाम्या होत्या, असा खोचक टोला यावेळी राऊत यांनी लगावला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, नाशिकमध्ये मोदी होते, नेहमीप्रमाणे थापा मारून गेले, राज्याला कटांळाला आला आहे. फडणवीस यांनी कशा थापा मारल्या हे कराड यांनी सांगितलं. हे शहर दत्तक घेतले त्यांनी पोटचा मुलगा सोडा, सावत्र मुलाप्रमाणे सुद्धा सांभाळ केला नाही नागपूरमध्ये सुद्धा यांना रोजगार ठेवता आला नाही. सगळ्याचा हिशोब करू, या राज्यातून हे विष गेलं पाहिजे. त्यांनी कुठे आणलं अमृत समुद्र मंथन केले का ? तिकडे कमला हरल्या इकडे कमळबाई हरणार. दहा वर्षांत चुका केल्या ती सुधारण्याची वेळ आली आली आहे, असं राऊत यांनी म्हटलं.  तसेच यावेळी बोलताना त्यांनी महविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांना विजयी करा असं आवाहान देखील केलं.

Follow Us
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं सर्वात मोठं विधान,
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं मोठं विधान, मी दिल्लीला...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात... पहा VIDEO
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकडे चर्चा!
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला मोठा निर्णय, 22 तारखेला...
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच केला धक्कादायक खुलासा
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच समजलं, पहा...
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं?Video
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं? पहिला Video समोर
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले....
खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत...
मोठी बातमी! खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत सांगितलं अन्... काय घडलं?
ठाकरे गटाला मोठा धक्का? फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!
Sudhir Mungantiwar On Thackeray | ठाकरे गटाला मोठा धक्का? खासदारांच्या फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!