AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मोदींच्या महाराष्ट्रात प्रचंड सभा झाल्या, 15 हजार खुर्च्यांपैकी 14 हजार रिकाम्याच होत्या,’ राऊतांचा पंतप्रधानांना खोचक टोला

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

'मोदींच्या महाराष्ट्रात प्रचंड सभा झाल्या, 15 हजार खुर्च्यांपैकी 14 हजार रिकाम्याच होत्या,' राऊतांचा पंतप्रधानांना खोचक टोला
संजय राऊत, खासदार, ठाकरे गटImage Credit source: ANI
| Updated on: Nov 09, 2024 | 9:52 PM
Share
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. जोरदार प्रचार सुरू असून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दरम्यान आज पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जाहीर सभेमधून भाजप आणि पंतप्रधान मोदी  यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या प्रचार सभेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन चार दिवसांपासून राज्यात आहेत, प्रचंड सभा झाल्या 15 हजार खुर्च्या होत्या, त्यातल्या 14 हजार रिकाम्या होत्या, असा टोला यावेळी संजय राऊत यांनी लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले राऊत? 

शिवसेनेच्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, दीड हजार ही रक्कम आहे का? आपण परवा महालक्ष्मी योजना जाहीर केली, महिन्याला ३ हजार, महिलांना राज्यभरात मोफत प्रवास, मानसन्मान राहील अशा या योजना आहेत. सिलींडर १४०० रुपयांना आणि २५ लाखांचा विमा याला राज्य चालवणे म्हणतात का? योजना यासाठी सांगितल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन चार दिवसांपासून राज्यात आहेत, प्रचंड सभा झाल्या. 15 हजार खुर्च्या होत्या, त्यातल्या 14 हजार रिकाम्या होत्या, असा खोचक टोला यावेळी राऊत यांनी लगावला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, नाशिकमध्ये मोदी होते, नेहमीप्रमाणे थापा मारून गेले, राज्याला कटांळाला आला आहे. फडणवीस यांनी कशा थापा मारल्या हे कराड यांनी सांगितलं. हे शहर दत्तक घेतले त्यांनी पोटचा मुलगा सोडा, सावत्र मुलाप्रमाणे सुद्धा सांभाळ केला नाही नागपूरमध्ये सुद्धा यांना रोजगार ठेवता आला नाही. सगळ्याचा हिशोब करू, या राज्यातून हे विष गेलं पाहिजे. त्यांनी कुठे आणलं अमृत समुद्र मंथन केले का ? तिकडे कमला हरल्या इकडे कमळबाई हरणार. दहा वर्षांत चुका केल्या ती सुधारण्याची वेळ आली आली आहे, असं राऊत यांनी म्हटलं.  तसेच यावेळी बोलताना त्यांनी महविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांना विजयी करा असं आवाहान देखील केलं.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.