AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मोदींच्या महाराष्ट्रात प्रचंड सभा झाल्या, 15 हजार खुर्च्यांपैकी 14 हजार रिकाम्याच होत्या,’ राऊतांचा पंतप्रधानांना खोचक टोला

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

'मोदींच्या महाराष्ट्रात प्रचंड सभा झाल्या, 15 हजार खुर्च्यांपैकी 14 हजार रिकाम्याच होत्या,' राऊतांचा पंतप्रधानांना खोचक टोला
संजय राऊत, खासदार, ठाकरे गटImage Credit source: ANI
| Updated on: Nov 09, 2024 | 9:52 PM
Share
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. जोरदार प्रचार सुरू असून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दरम्यान आज पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जाहीर सभेमधून भाजप आणि पंतप्रधान मोदी  यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या प्रचार सभेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन चार दिवसांपासून राज्यात आहेत, प्रचंड सभा झाल्या 15 हजार खुर्च्या होत्या, त्यातल्या 14 हजार रिकाम्या होत्या, असा टोला यावेळी संजय राऊत यांनी लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले राऊत? 

शिवसेनेच्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, दीड हजार ही रक्कम आहे का? आपण परवा महालक्ष्मी योजना जाहीर केली, महिन्याला ३ हजार, महिलांना राज्यभरात मोफत प्रवास, मानसन्मान राहील अशा या योजना आहेत. सिलींडर १४०० रुपयांना आणि २५ लाखांचा विमा याला राज्य चालवणे म्हणतात का? योजना यासाठी सांगितल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन चार दिवसांपासून राज्यात आहेत, प्रचंड सभा झाल्या. 15 हजार खुर्च्या होत्या, त्यातल्या 14 हजार रिकाम्या होत्या, असा खोचक टोला यावेळी राऊत यांनी लगावला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, नाशिकमध्ये मोदी होते, नेहमीप्रमाणे थापा मारून गेले, राज्याला कटांळाला आला आहे. फडणवीस यांनी कशा थापा मारल्या हे कराड यांनी सांगितलं. हे शहर दत्तक घेतले त्यांनी पोटचा मुलगा सोडा, सावत्र मुलाप्रमाणे सुद्धा सांभाळ केला नाही नागपूरमध्ये सुद्धा यांना रोजगार ठेवता आला नाही. सगळ्याचा हिशोब करू, या राज्यातून हे विष गेलं पाहिजे. त्यांनी कुठे आणलं अमृत समुद्र मंथन केले का ? तिकडे कमला हरल्या इकडे कमळबाई हरणार. दहा वर्षांत चुका केल्या ती सुधारण्याची वेळ आली आली आहे, असं राऊत यांनी म्हटलं.  तसेच यावेळी बोलताना त्यांनी महविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांना विजयी करा असं आवाहान देखील केलं.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा