Manoj Jarange: बोटावर मोजण्याइतपत काँग्रेस उरली… मनोज जरांगे यांचा राहुल गांधी यांना तो थेट इशारा… वडेट्टीवारांचा असा घेतला समाचार
Manoj Jarange on Congress: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसोबत काँग्रेसवरही मोर्चा वळवला. विजय वडेट्टीवार यांच्या टीकेनंतर त्यांनी जोरदार प्रहार केला. त्यांनी वडेट्टीवार यांचा जोरदार समाचार घेतला. तर काँग्रेसला मोठा इशारा दिला.

कुणबी प्रमाणपरद्द झाल्यापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे हे सरकारवर धावून जात आहेत. सध्या ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी गेल्या चार दिवसात सरकारवर विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. 29 ऑगस्टच्या निर्णायक लढ्याची आठवण त्यांनी समाज बांधवांसह सरकारलाही करून दिली. आता महायुतीसोबत त्यांनी काँग्रेसवरही मोर्चा वळवला आहे. त्यांनी राहुल गांधी यांना इशारा दिला. तर नेते विजय वडेट्टीवार यांचा समाचार घेतला. वडेट्टीवार हे ओबीसींची बाजू लावून धरत आहेत. त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर यापूर्वी टीका केली आहे.
उपसमितीची बैठक, पण समाजाला फायदा काय?
आज सरकारच्या मराठा उपसमितीची बैठक होत आहे. त्यावरून जरांगे यांनी निशाणा साधला. किती बैठक घेणार अजून, समाजाला काय देताय तुम्ही, असा सवाल त्यांनी विचारला. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कुटुंबासाठी ऊर्जा खात्याचा साधा एक जीआर काढता आला नाही. फडणवीस यावर आता काय बोलणार असा उलट सवाल त्यांनी केला. दरवेळी मुख्यमंत्री छत्रपतीचं नाव घेतात. जी चूक केली त्याबदल् बोला, लोकांचा रोष कमी होईल, प्रमाणपत्र पुन्हा द्या, अशी मागमी त्यांनी केली.
सरकारचां तिरस्कार येतोय आता, तो वाढू देऊ नका, शेतकरी मुस्लिम ,ओबीसी मध्ये तिरस्कार वाढला आहे. सरकारने मराठा वर्गाला प्रचंड हिणवले आहे. 3 वर्षात किती मोर्चे झाले आणि 3 वर्षात काय दिले. मराठा समाजाचा पुन्हा मुंबईला जाण्याचा देखील विचार आहे, असा इशारा त्यांनी दिला. मला अनेक मराठा नेत्याच्या फोन येतो, आमदारर,खासदार फोन करून तुम्ही म्हणताय ते पटते असे सांगतात. राणें सारखे अनेक मराठा नेते आता बोलू लागले आहेत, याचे स्वागत आहे, असे जरांगे म्हणाले.
काँग्रेसवर सडकून टीका
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींसाठी मोर्चा उघडला आहे. त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. त्यावरून जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. वडेट्टीवार यांना माझ्यावर बोलायला राहुल गांधीने हे सांगितले आहे का तुम्हाला? असा सवाल त्यांनी विचारला. चार दोन लोकांमुळे काँग्रेसचं जरा नीट सुरू आहे. थोरात, देशमुख, चव्हाण, सपकाळ, नाना पेटोले यांच्यामुळे काँग्रेसचे बरं चाललं आहे, कशाला तुम्ही खेळ बिघडवताय? बोटावर मोजण्याइतके काँग्रेस राहिली आहे ती ही संपवू नका. कशाला ती खड्यात घालत आहेत. वडेट्टीवार कितीही बोलले तरी आम्ही आरक्षण घेणारच आहोत, असे उत्तर जरांगे पाटील यांनी दिले.