AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PUNE SATARA मार्गावरील खेड शिवापूर टोल प्रकरण तापलं, हटाव कृती समिती आक्रमक; रस्त्यावर उतरण्याचा इशारा

पुणे ((PUNE) सातारा (SATARA) मार्गावरील खेड शिवापूर टोल (KHED SHIVAPUR TOLL) नाक्यावरील टोल वसुली वरून खेड शिवापूर टोल नाका हटाव कृती समिती आक्रमक झाली आहे.

PUNE SATARA मार्गावरील खेड शिवापूर टोल प्रकरण तापलं,  हटाव कृती समिती आक्रमक; रस्त्यावर उतरण्याचा इशारा
कृती समितीकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांना निवेदन देण्यात आलं आहेImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 24, 2022 | 7:02 AM
Share

पुणे – पुणे (PUNE) सातारा (SATARA) मार्गावरील खेड शिवापूर टोल (KHED SHIVAPUR TOLL) नाक्यावरील टोल वसुली वरून खेड शिवापूर टोल नाका हटाव कृती समिती आक्रमक झाली आहे. टोल नाक्यावरील टोल वसुली तात्काळ बंद करून, टोलनाका स्थलांतराची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी खेड शिवापूर कृती समितीने केली आहे. संबंधित प्रकरणाची दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा कृती समितीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम (SANJAY KADAM) यांना दिला आहे. टोल नाका हटाव कृती समिती प्रचंड आक्रमक झाली असून कोणत्याही क्षणी रस्त्यावर उतरू शकते अशी माहिती प्राथमिक माहिती मिळत आहे. तीन वर्षापुर्वी देखील आंदोलन करण्यात आलं होतं. पण मागण्यांसंदर्भात केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं.

कोणत्याही क्षणी रस्त्यावर उतरण्याचा इशारा

पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर एम एच 12 आणि एम एच 14 या वाहनांची टोलमाफी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुणे सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाची कामे पूर्ण झाल्याने ही टोलमाफी बंद केली आहे. 1 मार्च पासून या वाहनांना टोल आकारण्यात येत असल्याची माहिती,एनएचएआयकडून सांगण्यात देण्यात आली आहे. पुणे सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाची रखडलेली कामे वेळेत पूर्ण करावी. खेड शिवापूर टोलनाका ‘पीएमारडीए’च्या हद्दीबाहेर हलविण्यात यावा. या मागणीसाठी खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीच्या वतीने तीन वर्षांपूर्वी आंदोलन करण्यात आले होते.त्यावेळी या मागण्यांसंदर्भात केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत हवेली पुणे शहर पिंपरी चिंचवड, भोर, वेल्हा, मुळशी आणि पुरंदर या पाच तालुक्यातील वाहनांना टोलमाफी देण्यात येईल, असे लेखी आश्वासन एनएचएआयकडून देण्यात आलं होतं.

मात्र 1 मार्च 2022 टोल आकारण्यास सुरूवात झाल्याने कृती समिती आक्रमक

तेव्हापासून खेड शिवापूर टोल नाक्यावर या पाच तालुक्यातील वाहनांना टोल आकारण्यात येत नव्हता. मात्र 1 मार्च 2022 पासून खेड-शिवापूर टोल नाक्यावर एम.एच.12 आणि एम.एच.14 या वाहनांना टोल आकारण्यास सुरुवात केली आहे. खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समिती, खेड-शिवापूर टोलनाका पीएमारडीए हद्दीबाहेर हलविण्याच्या मुद्द्यावर ठाम आहे. त्या संबंधिचं पत्र कृती समितीकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांना निवेदन देण्यात आलं आहे.टोलनाका स्थलांतराची प्रक्रिया सुरू करावी अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा कृती समितीकडून देण्यात आलाय.

Aurangabad | जिल्ह्यात 14 हजार रेशन कार्ड रद्द, काय आहेत कारणं? स्वस्त धान्य कुणाला किती मिळते?

Chandrapur | गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी रात्रीच्या गस्तीवर, 8 लाख रुपयांचा दंड वसूल

Nagpur | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, 25 मार्च रोजी गावपातळीवर शिबीर

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.