AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satara Crime: सातारा जिल्हा तिहेरी हत्याकांडाने हादरला, चारित्र्याच्या संशयावरुन प्रियकराने प्रेयसी महिलेचा दाबला गळा, दोन लहानग्यांना ढकलले विहिरीत

15 जून रोजी रात्रीच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरून दत्ता नामदास आणि महिला यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. जेवण झाल्यानंतर दत्ता याने गळा दाबून या महिलेची हत्या केली. यानंतर दोन मुलांना वेलंग गावाजवळ असेलल्या विहिरित रात्री त्याने ढकलून दिले.

Satara Crime: सातारा जिल्हा तिहेरी हत्याकांडाने हादरला, चारित्र्याच्या संशयावरुन प्रियकराने प्रेयसी महिलेचा दाबला गळा, दोन लहानग्यांना ढकलले विहिरीत
Satara Tripple murderImage Credit source: TV 9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 2:43 PM
Share

सातारा – चारित्र्याच्या संशयावरुन प्रियकराने प्रेयसी महिलेचा (Lover Killed woman)गळा दाबून हत्या केली, त्यानंतर या महिलेच्या दोन लहान मुलांना गावाजळ असलेल्या विहिरीत ( 2 children in well)ढकलल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यात (Satara District)उघडकीस आली आहे.कोरेगाव तालुक्यातील मौजे वेलंग या गावच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला आहे. दत्ता नारायण नामदास असं या नराधम आरोपीचं नाव असून, हा आरोपी त्याच्या मूळ गावी अकलूजला निघून गेला होता. आता या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रहमतपूर पोलीस ठाण्यात आरोपी दत्ता नामदास याच्याविरोधात तिघांच्या हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नेमका काय घडला प्रकार

ही मृत महिला आपल्या पतीपासून विभक्त होऊन प्रियकर दत्ता याच्यासोबत राहत होती. तिच्यासोबत तिची दोन मुलेही होती. 15 जून रोजी रात्रीच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरून दत्ता नामदास आणि महिला यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. जेवण झाल्यानंतर दत्ता याने गळा दाबून या महिलेची हत्या केली. यानंतर दोन मुलांना वेलंग गावाजवळ असेलल्या विहिरित रात्री त्याने ढकलून दिले. ही हत्या करून आरोपीने वेलंग येथील राहत्या घराला बाहेरून कडी लावून अकलूजला पलायन केले.

स्थानिकांच्या माहितीनंतर आरोपी अटकेत

हा सर्व प्रकार स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ या प्रकरणाची माहिती रहिमतपूर पोलिसांना दिली. पोलिसांनी संशयित आरोपी दत्ता नारायण नामदासला अकलूजमधून ताब्यात घेतले आहे. तसेच वेलंग गावाजवळ मानभाऊच्या मळ्यातील विहिरीतून मुलांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या घटनेने पंचक्रोशी आणि सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चारित्र्यांच्या संशयावरुन संपूर्ण कुटुंब नाहिशे झाल्याची हळहळ जिल्ह्यात व्यक्त करण्यात येते आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.