AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satara Crime: सातारा जिल्हा तिहेरी हत्याकांडाने हादरला, चारित्र्याच्या संशयावरुन प्रियकराने प्रेयसी महिलेचा दाबला गळा, दोन लहानग्यांना ढकलले विहिरीत

15 जून रोजी रात्रीच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरून दत्ता नामदास आणि महिला यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. जेवण झाल्यानंतर दत्ता याने गळा दाबून या महिलेची हत्या केली. यानंतर दोन मुलांना वेलंग गावाजवळ असेलल्या विहिरित रात्री त्याने ढकलून दिले.

Satara Crime: सातारा जिल्हा तिहेरी हत्याकांडाने हादरला, चारित्र्याच्या संशयावरुन प्रियकराने प्रेयसी महिलेचा दाबला गळा, दोन लहानग्यांना ढकलले विहिरीत
Satara Tripple murderImage Credit source: TV 9 marathi
| Edited By: Sandip Sakhare | Updated on: Jun 17, 2022 | 2:43 PM
Share

सातारा – चारित्र्याच्या संशयावरुन प्रियकराने प्रेयसी महिलेचा (Lover Killed woman)गळा दाबून हत्या केली, त्यानंतर या महिलेच्या दोन लहान मुलांना गावाजळ असलेल्या विहिरीत ( 2 children in well)ढकलल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यात (Satara District)उघडकीस आली आहे.कोरेगाव तालुक्यातील मौजे वेलंग या गावच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला आहे. दत्ता नारायण नामदास असं या नराधम आरोपीचं नाव असून, हा आरोपी त्याच्या मूळ गावी अकलूजला निघून गेला होता. आता या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रहमतपूर पोलीस ठाण्यात आरोपी दत्ता नामदास याच्याविरोधात तिघांच्या हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नेमका काय घडला प्रकार

ही मृत महिला आपल्या पतीपासून विभक्त होऊन प्रियकर दत्ता याच्यासोबत राहत होती. तिच्यासोबत तिची दोन मुलेही होती. 15 जून रोजी रात्रीच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरून दत्ता नामदास आणि महिला यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. जेवण झाल्यानंतर दत्ता याने गळा दाबून या महिलेची हत्या केली. यानंतर दोन मुलांना वेलंग गावाजवळ असेलल्या विहिरित रात्री त्याने ढकलून दिले. ही हत्या करून आरोपीने वेलंग येथील राहत्या घराला बाहेरून कडी लावून अकलूजला पलायन केले.

स्थानिकांच्या माहितीनंतर आरोपी अटकेत

हा सर्व प्रकार स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ या प्रकरणाची माहिती रहिमतपूर पोलिसांना दिली. पोलिसांनी संशयित आरोपी दत्ता नारायण नामदासला अकलूजमधून ताब्यात घेतले आहे. तसेच वेलंग गावाजवळ मानभाऊच्या मळ्यातील विहिरीतून मुलांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या घटनेने पंचक्रोशी आणि सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चारित्र्यांच्या संशयावरुन संपूर्ण कुटुंब नाहिशे झाल्याची हळहळ जिल्ह्यात व्यक्त करण्यात येते आहे.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप