AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संयम बाळगावा, सोशल मीडियातून प्रसिद्धी टाळावी, आर्यन खान प्रकरणानंतर उज्ज्वल निकम यांचा तपास यंत्रणांना सल्ला

राज्य किंवा केंद्र सरकारमधील तपास यंत्रणांनी तपास करताना अतिशय संयम बाळगला पाहिजे. उगीचच चमकोगिरी म्हणून वाट्टेल तशी निवेदने किंवा सोशल मीडियातून प्रसिद्धी टाळायला हवी, असं वक्तव्य ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी दिला.

संयम बाळगावा, सोशल मीडियातून प्रसिद्धी टाळावी, आर्यन खान प्रकरणानंतर उज्ज्वल निकम यांचा तपास यंत्रणांना सल्ला
UJJWAL NIKAM
| Edited By: | Updated on: Oct 23, 2021 | 4:44 PM
Share

सांगली : राज्य किंवा केंद्र सरकारमधील तपास यंत्रणांनी अतिशय संयम बाळगला पाहिजे. उगीचच चमकोगिरी म्हणून वाट्टेल तशी निवेदने किंवा सोशल मीडियातून प्रसिद्धी टाळायला हवी, असा सल्ला ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी दिला. क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी तसेच आर्यन खान अटक प्रकरणांनतर एनसबीसारख्या केंद्रीय तपास संस्था प्रसिद्धीच्या झोतात आल्या. ईडी तसेच एनसीबीसुद्धा मागील अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत आहेत. या पार्श्वभूमीवर निकम यांनी केलेल्या वक्तव्याला विशेष महत्त्व आले आहे.

सोशल मीडियातून प्रसिद्धी टाळायला हवी

“राज्य किंवा केंद्र सरकारमधील तपास यंत्रणांनी तपास करताना अतिशय संयम बाळगला पाहिजे. उगीच चमकोगिरी म्हणून वाटेल तशी निवेदने किंवा सोशल मीडियातून प्रसिद्धी टाळायला हवी. तपास यंत्रणांच्या कृत्यामुळे राजकीय नेते तपास यंत्रणावर टीका करायला उद्युक्त होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे,” असे उज्ज्वल निकम म्हणाले.

राजकीय लोकांनी न्यायालयात दाद मागावी

तसेच पुढे बोलताना “राजकीय नेत्यांनी तपास सुरू असताना तपास यंत्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर कायदा सुव्यवस्थेला हा मोठा धोका आहे, असं म्हणावं लागेल. तपास चुकीचा असेल तर राजकीय लोकांनी न्यायालयात दाद मागावी. पण प्रसारमाध्यमांसमोर आरोप करुन तपास यंत्रणांच्या गुणवतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ नये,” असे मत निकम यांनी व्यक्त केले.

आर्यन खान प्रकरणात प्रमोद महाजन यांच्या मृत्यूचा दाखला

दरम्यान, यापूर्वी वकील उज्ज्वल निकम यांनी आर्यन खान प्रकरणात महत्त्वाचे कायदेशीर पेच आणि संदर्भ सांगितले होते. त्यांनी दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या खटल्याचा दाखला दिला होता. “आर्यन खान हा व्हिआयपीचा मुलगा आहे, म्हणून त्याला जामीन मिळत नाही अस मी म्हणनार नाही. एनसीबीला आर्यन खानची व्हॉट्सअ‌ॅप चॅटिंग सापडली आहे. या चॅटिंगमध्ये जे तथ्य आहेत किंवा जे पुरावे आहेत त्याचा आधार घेत आर्यनचा जामीन नकारला गेला आहे. व्हॉट्सअ‌ॅप चॅटिंग ग्राह्य धरायची की नाही हे कोर्टात निश्चित होणार,” असे निकम यांनी सांगितले होते. तसेच पुढे बोलताना त्यांनी प्रमोद महाजन यांच्या मृत्यूचाही दाखला दिला होता. “प्रमोद महाजन त्यांचा भाऊ प्रविण महाजन याने त्यांना एक मेसेज पाठविला होता. त्याच मेसेजचा आधार घेत त्याच्यावर आरोप केला होता. नंतर कोर्टात त्या मेसेजचा संदर्भ सिद्ध करावा लागला. म्हणून एनसीबीला मुंबई हायकोर्टात आर्यन खान प्रकरणात व्हॉट्सअॅप चॅटिंग संदर्भातील दावा सिद्ध करावा लागणार आहे. त्याचबरोबर आर्यन खानचे वकीलदेखील आपली बाजू मंडणार आहेत,” असे निकम म्हणाले होते.

इतर बातम्या :

हिंमत असेल तर नाव बदलून दाखवा ! सरकारी परिपत्रकात औरंगाबादचं संभाजीनगर होताच इम्तियाज जलील भडकले

VIDEO: तुझी मर्जी म्हणजे तुझा अधिकार होऊ शकत नाही, हे विधी तज्ज्ञांनी सांगितलं पाहिजे; उद्धव ठाकरेंचा नाव घेता केंद्रावर जोरदार हल्ला

50 हजार गुंतवून सुरु करा ‘हा’ व्यवसाय, सरकारकडून मिळणार आर्थिक मदत; महिन्याला लाखो रुपये कमावण्याची संधी

Follow Us
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....