AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्याला विरोधी पक्षनेताच नाही, शरद पवार यांचे भाष्य काय?; कोणता किस्सा सांगितला?

१९८० रोजी आमचे ५८ आमदार निवडून आले होते. त्यानंतर मी विदेशात गेलो होते. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांनी आमचे ५२ आमदार फोडले होते. तेव्हा आमच्याकडे फक्त सहा आमदार शिल्लक राहिले. मग आम्ही केवळ ६ आमदार होतो. परंतु आम्ही प्रभावी काम केले.

राज्याला विरोधी पक्षनेताच नाही, शरद पवार यांचे भाष्य काय?; कोणता किस्सा सांगितला?
शरद पवार
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 24, 2024 | 6:47 PM
Share

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक निकालात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. या निवडणुकीत महायुतीच्या झंझावतापुढे महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. या पराभवात महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपदासाठी लागणार २८ चा जादूई आकडाही गाठता आला नाही. त्यामुळे राज्यात विरोधी पक्षनेता नसणार आहे. त्यावर शरद पवार यांनी १९८० मधील किस्सा सांगितला. शरद पवार म्हणाले, विरोधी पक्षनेता असलेली संख्या विरोधी पक्षाकडे नाही. पण विरोधी पक्षनेता असावा, असे मत व्यक्त केला.

काय म्हणाले शरद पवार

शरद पवार म्हणाले, १९८० रोजी आमचे ५८ आमदार निवडून आले होते. त्यानंतर मी विदेशात गेलो होते. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांनी आमचे ५२ आमदार फोडले होते. तेव्हा आमच्याकडे फक्त सहा आमदार शिल्लक राहिले. मग आम्ही केवळ ६ आमदार होतो. परंतु आम्ही प्रभावी काम केले. जनतेचे प्रश्न मांडले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत विजय मिळवला. आताही विरोधी पक्षाकडे संख्या नसली तरी विरोधी पक्षनेता असायला हवा, असे शरद पवार यांनी म्हटले.

शरद पवार म्हणाले, आमच्या पक्षातून बाहेर गेलेल्या लोकांनी निवडणुका लढल्या. आता त्यांना यश मिळाले आहे. ती सर्व लोक चव्हाण साहेब किंवा गांधी नेहरूंच्या विचाराने काम करणारे होते. परंतु त्यांनी आता संपर्क आणि सहयोग भाजपसोबत ठेवला. दुसरीकडे चव्हाण साहेबांचे आयुष्य पहिल्यावर त्यांनी त्या काळातील जनसंघ आणि भाजपशी कधी संबंध ठेवला नाही. त्यांनी त्यांच्याशी शेवटपर्यंत वैचारिक अंतर कायम राखले, असे त्यांनी म्हटले.

बारामतीमध्ये का दिला उमेदवार

शरद पवार यांनी बारामतीमधील दिलेल्या उमेदवारीवर भाष्य केले. ते म्हणाले, बारामती मतदार संघात उमेदवार देणे आवश्यक होते. त्या ठिकाणी उमेदवारी दिली नसती तर राज्यात काय संदेश दिला गेला असता. बारामतीमधील दोन्ही उमेदवाराची तुलना होऊ शकत नाही. कारण अजित पवार अनेक वर्षापासून राजकारणात आहेत. तसेच ते राज्यातील सत्तेतही आहेत. दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधात नवखा तरुण उमेदवार होता, हे आम्हाला माहीत आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा