AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा जागतिक वारसा भाजपला पेलवेल ना? सामनातून खोचक सवाल, सांगितली अंदर की बात

महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. भाजप याचा राजकीय फायदा घेत असताना, सामनाने सरकारच्या दुर्लक्षामुळे किल्ल्यांच्या जतनाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

हा जागतिक वारसा भाजपला पेलवेल ना? सामनातून खोचक सवाल, सांगितली अंदर की बात
संजय राऊत
| Updated on: Jul 14, 2025 | 8:13 AM
Share

महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. यात महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सुवर्णदुर्ग, खांदेरी या किल्ल्यांचा समावेश आहे. आता यावरुन सामना अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद बाब असली तरी, भाजपने याचा राजकीय उत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे, तो जरूर साजरा करा. भाजपचा जन्म अशा उत्सवासाठीच आहे, पण हा जागतिक वारसा तुम्हाला पेलवेल ना? असा खोचक सवाल सामनातून करण्यात आला आहे.

अनेक वर्षांपासून त्यांच्या जतनाकडे सरकारचे लक्ष नाही

शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून आज महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला अशा एकूण 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावरुन टीका करण्यात आली आहे. भाजपने १०० हून अधिक ठिकाणी शिवआरती आणि शक्तिप्रदर्शन करण्याचे जाहीर केले आहे, जेणेकरून शिवरायांचे स्वराज्य आणि त्यांची दुर्गसंपदा ही भाजपमुळेच निर्माण झाल्याचा आभास निर्माण होईल, असा घणाघात सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी किल्ले बांधले, ते त्यांचे सामर्थ्य होते. मात्र, अनेक वर्षांपासून त्यांच्या जतनाकडे केंद्र आणि राज्य सरकारांनी विशेष लक्ष दिले नाही, असा आरोपही यातून करण्यात आला आहे.

भाजपवाल्यांनी तलवारीचेही राजकारण केले

“आज महाराष्ट्रावर ९ लाख कोटींचे कर्ज असताना, ‘लुटारूंचे राज्य’ चालवणारे लोक शिवरायांच्या नावावर जल्लोष करत आहेत. तसेच, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिला, पण महाराष्ट्रातच मराठी भाषा आणि मराठी माणसाचा सन्मान राहिलेला नाही. शिवरायांची भाषा जतन केली जात नाही. त्यासाठी आजही संघर्षाच्या ठिणग्या उडत आहेत व आता किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळाल्यावर भाजपवाले टणाटणा उडय़ा मारू लागले. काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवरायांची भवानी तलवार ब्रिटिश म्युझियममधून आणली व निवडणुकीपूर्वी या मंडळींनी त्या तलवारीची राजकीय यात्रा काढली. त्या तलवारीचे पुढे काय झाले? आता ती तलवार कोठे आहे? मुळात ही तलवार सरकार दावा करते त्याप्रमाणे भवानी तलवार नाही. राज्य सरकार शिवप्रेमींच्या भावनांशी खेळत आहे असे इतिहास तज्ञ सांगतात, तरीही भाजपवाल्यांनी तलवारीचेही राजकारण केलेच”, असा टोलाही सामनातून लगावण्यात आला आहे.

भाजपला हा जागतिक वारसा पेलवेल का?

“इतिहासाची मालकी आपल्याकडेच आहे असे सांगण्याचा भाजपचा हा प्रयत्न गमतीशीर आहे. मात्र अंदर की बात अशी की, जागतिक वारसा लाभलेल्या या 12 किल्ल्यांचे संवर्धन सरकारने केले नाही तर युनेस्को जागतिक वारशाचे हे मानांकन काढून घेईल. तसा नियमच आहे. पश्चिम घाट हासुद्धा एक ऐतिहासिक वारसा आहे. मात्र आज त्या पश्चिम घाटावर अमानुषपणे हातोडे, बुलडोझर, जेसीबी चालवले जात आहेत. अलमट्टी धरणाची उंची वाढवणे असो की शक्तिपीठ महामार्गाची जबरदस्ती, या World Heritage वरच हातोडे चालतील व युनेस्कोने ज्याचे संवर्धन करण्याचा संदेश दिला तेच नष्ट केले जाईल, असा आरोपही अग्रलेखातून करण्यात आला आहे. त्यामुळे, भाजपला हा ‘जागतिक वारसा’ पेलवेल का”, असा सवाल अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.