AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वतःच्या पोरांचे पाळणे हलवा, दुसऱ्यांच्या पोरांचे… संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्ष वेगाने कामाला लागले असून असून अनेक पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोईंग वेगाने सुरू आहे. भारतीय जनता पक्षामध्ये तर सध्या वेगाने इनकमिंग सुरू आहे. स्वतःच्या पोरांचे पाळणे हलवा दुसऱ्यांच्या पोरांचे पाळणे हालवू नका, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

स्वतःच्या पोरांचे पाळणे हलवा, दुसऱ्यांच्या पोरांचे... संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल
| Updated on: Mar 18, 2024 | 10:18 AM
Share

मुंबई | 18 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकांची तारीख शनिवारी जाहीर झाल्या असून अवघ्या महिन्याभरावर मतदानाची तारीख आली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्ष वेगाने कामाला लागले असून असून अनेक पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोईंग वेगाने सुरू आहे. भारतीय जनता पक्षामध्ये तर सध्या वेगाने इनकमिंग सुरू आहे. काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांसब इतर पक्षांमधील नेतेही सध्या भाजपामध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. मात्र याच मुद्यावरून शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘स्वतःच्या पोरांचे पाळणे हलवा दुसऱ्यांच्या पोरांचे पाळणे हालवू नका ते पुन्हा पळून जातील’ असे टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडले.

हे बिन परिवाराचे आहेत का ?

सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भाजपवर कडाडून टीका केली. ‘ भारतीय जनता पक्ष हा दुसऱ्यांची पोरं पळवून मोठा झालेला पक्ष आहे. भारतीय जनता पक्ष हा दुसऱ्यांची पोर पळवणारा पक्ष. त्यांना स्वतःची पोर नाहीत. ते सर्व फोडलेली पोर आमची ते घेऊन ते बसले आहेत. हे बिन परिवाराचे आहेत का ? स्वतःच्या पोरांचे पाळणे हलवा दुसऱ्यांच्या पोरांचे पाळणे हालू नका ते पुन्हा पळून जातील’ असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला.

यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. आमच्या हातात ईडी-सीबीआय येईल तेव्हा भारतीय जनता पक्ष संपलेला असेल, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशाराच दिला. फडणवीसांच्या परिवारवादाच्या विधानाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं. “ज्या दिवशी आमच्या हातामध्ये केंद्रात ईडी आणि सीबीआय येईल तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी हे वाक्य पुन्हा ऐकून दाखवावं, त्यावेळी त्यांचा पक्ष शिल्लक राहिलेला नसेल. लोहा लोहे को काटता है, हे आम्हालाही माहिती आहे, फक्त त्यांनाच माहिती आहे असं नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या दिवशी आमच्या हातात ईडी-सीबीआयसह सत्ता येईल, त्या दिवशी फडणवीसांनी त्यांचा पक्ष वाचवून दाखवावा ” असे राऊत म्हणाले.

राहुल गांधी परखडपणे भूमिका मांडत आहे

काल शिवतीर्थावर झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेबद्दलही राऊत बोलले. शिवतीर्थावर मोठी जनसभा झाली. मोठ्या शक्ती बरोबर लढत आहोत. काल इंडिया आघाडी महाप्रचार सभा झाली .

इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहिले. प्रकाश आंबेडकर देखील उपस्थित होते, सर्वांनी आपली भूमिका मांडली. राहुल गांधी देशातील लोकप्रिय नेते आहे. देश भावी होणारा पंतप्रधान पाहत आहे अशी लोकांची भूमिका आहे. राहुल गांधी परखडपणे भूमिका मांडत आहे , ते झुकत नाही हा त्यांचा बाणा या देशातील लोकांना आवडत आहे. हुकूमशाही पुढे न झुकणारे असे ते आहेत. जे शरण गेले त्यांना इतिहास माफ करणार नाही, आम्ही लढणारे लोक आहोत असे राऊत म्हणाले.

चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ
चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ.
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न.
पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर
पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर.
जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको
जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको.
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?.
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण.
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!.
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट.
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार.
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल.