AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम होण्यासाठी प्लान काय, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं

106 वा आमदार द्या, करेक्ट कार्यक्रम करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम होण्यासाठी प्लान काय, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंImage Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Nov 04, 2022 | 3:36 PM
Share

सोलापूर : नैसर्गिक शेतीचं दहा हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं.गुजरातच्या राज्यापालांनी याचं एक मॉडल तयार केलं. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला. कुठलंही रासायनिक पदार्थ न वापरता तिप्पट उत्पादन घेणं सुरू केलं. त्यामुळं देशी गायीचं शेण, गोमुत्र, गुळ टाकून वैज्ञानिक पद्धतीनं शेती ते करतात. येत्या काळात आपल्या राज्यात नैसर्गिक शेतीचं मॉडल राबवायचं आहे. शेतकरी आपल्या शेतीमध्ये सर्व नैसर्गिक गोष्टी तयार करेल. बाहेरून त्याला काही विकत आणावं लागणार नाही. उत्पादकतेवर त्याचा काही परिणाम होणार नाही. उलट उत्पादकता वाढेल. हे काम आपण सुरू करतो आहोत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा येथील सभेत सांगितलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सुधाकरपंत परिचारक निवडणुकीसाठी उभे होते. त्यावेळी मी एक सभा घेण्याकरिता आलो होतो. 24 गावांना पाणी देणारी मंगळवेढा उपसा सिंचन योजना करणार, असं त्या सभेत आश्वासन दिलं. ते आश्वासन दिल्यानंतर सरकारचं गेलं. पण, मी सांगितलं होतं पुन्हा येईल.तुमची योजनादेखील मी पुन्हा यायची वाट पाहत बसली. मधल्या सरकारनं फाईल सरकवलीदेखील नाही.

तुमच्या आशीर्वादान समाधान दादांना तुम्ही निवडून दिलं. जे सांगितलं होतं आम्ही करेक्ट कार्यक्रम केला. आमचं सरकार आल्याबरोबर या योजनेला गती दिली. समाधान दादा यांनी पाठपुरावा केला.

त्यासंदर्भात सगळ्या मान्यता घेतल्या. मुख्यमंत्र्यांची सही झाली. इस्टिमेट 2017-18 च्या दरसूचीनं ठरलं. म्हणून नियोजन विभागानं लिहिलं की, नवीन दरसूचीप्रमाणे प्राकलन याव, अंस सांगितलं. नवीन दरसूचीप्रमाणे प्रकलन आल्याबरोबर कॅबिनेटपुढं ठेऊ. नवीन दरानं मान्यता देऊ. त्यानंतर 24 गावांना पाणी देणारा सिंचन प्रकल्प पूर्ण होईल, असं आश्वासनं देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

बसवेश्वरांचं स्मारक व्हावे, 151 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडं आणला होता. प्रस्ताव थंडबस्त्यातून बाहेर येईल. बसवेश्वराचं स्मारक करणार आहोत. चोखामोळा यांच्या स्मारकासंदर्भात पैसे खर्च झाले नव्हते. ते येत्या काळात पूर्ण करू. सगळ्या मागण्यांची नोंद मी घेतली आहे. पुढच्या निवडणुकीपूर्वी ही सर्व काम करून दाखवू. या कामाच्या भरोश्यावर लोकांसमोर जाऊ, असं वक्तव्य फडणवीस यांनी मंगळेढा येथील सभेत बोलताना केलं.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.