AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“व्यापारी आला,सौदा पण झाला आणि अचानक गारांचा पाऊस आला”; शेतकऱ्यांचं दुःख संपता संपेना..

शेतीचे झालेल्या नुकसानीमुळे मोठा फटका बसला आहे. त्यातच चार दिवसापूर्वी व्यापारी आला आणि सौदा पण झाला मात्र काल अचानक गारांचा पाऊस आला आणि हाताचा घास हिरवला गेला असंही शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

व्यापारी आला,सौदा पण झाला आणि अचानक गारांचा पाऊस आला; शेतकऱ्यांचं दुःख संपता संपेना..
| Edited By: | Updated on: Mar 19, 2023 | 5:03 PM
Share

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीकडे पाहून आता शेतकऱ्यांना आता अश्रू अनावार झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक द्राक्षबागा पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे भूईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता झालेल्या नुकसानीचे सरकारने पंचनामे करावे अशी मागणी करण्यात येत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील जेऊर गावातील टरबूज उत्पादक शेतकरी पुरते हैराण झाले आहेत. अवकाळीमुळे द्राक्षे, गहू, मका, गहू आणि टरबूज पिकांचे नुकसान झाल्याने आता शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरुन कसे निघणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सोलापूर जिल्ह्यातील भोरमधील दिगंबर सुरवसे या अल्पभूधारक शेतकऱ्याचेही तीन एकरावरील टरबूज मातीमोल झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी जगायचे कसे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अवकाळी पावसामध्ये झालेल्या नुकसानीचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसला आहे. शेतीतील पीकच पावसामुळे भूईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून कसं निघणार असा प्रश्न निर्माण झालेला असतानाच आता या नुकसानीचे पंचनामे होणार का असा सवालही शेतकरी उपस्थित करत आहेत.

अवकाळी पावसात नुकसान झालेल्या पिकांचे नुकसान झाल्याने आणि पीकं भूईसपाट झाल्याने आमच्या कष्टाने आम्ही पिकवले, निसर्गाने दिले आणि पुन्हा हिरावून घेतले.

त्यामुळे कोणाला दोष देणार असा भावूक सवाल बळीराजा करत आहे.नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, पैसे खर्च करून लावलेल्या टरबूज पिकाचे या अवकाळीमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आता केलेला खर्चही निघणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

शेतीचे झालेल्या नुकसानीमुळे मोठा फटका बसला आहे. त्यातच चार दिवसापूर्वी व्यापारी आला आणि सौदा पण झाला मात्र काल अचानक गारांचा पाऊस आला आणि हाताचा घास हिरवला गेला असंही शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.