AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकांच्या भावना भाजपला कळल्या, त्यामुळेच…; प्रणिती शिंदे यांचा भाजपवर हल्लाबोल

Praniti Shinde on BJP and Solapur Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना प्रणिती शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. तसंच निवडणूक, संविधान अन् सोलापूरचा विकास यावर भाष्य. वाचा सविस्तर...

लोकांच्या भावना भाजपला कळल्या, त्यामुळेच...; प्रणिती शिंदे यांचा भाजपवर हल्लाबोल
| Updated on: May 05, 2024 | 5:05 PM
Share

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे या सोलापूर जिल्ह्यात दौरा करत आहेत. प्रणिती शिंदे स्थानिकांशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सोलापूर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजप प्रचारात ध्रुवीकरणाचा प्रयत्न करतोय. त्यांच्याकडे बोलण्यासाठी मुद्दे राहिले नाहीत. लोकांच्या भावना भाजपला कळल्या. त्यामुळेच त्यांनी नरेंद्र मोदींपासून योगीपर्यंत प्रचारासाठी नेते आणले आहेत. मागील दहा वर्षात हुकूमशाही आणि धमक्या देणारे सरकार आहे, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

संविधानावर प्रणिती शिंदे म्हणाल्या…

आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. प्रचारात अनेकांनी खांद्याला खांदा लावून साथ दिली. या सर्वांच्या प्रति माझ्या मनात कृतज्ञता आहे. ही लढाई माझ्या एकट्याची नाही. प्रचाराची सांगता बाबासाहेबांच्या अस्थी विहारात होतेय. कारण ही संविधान वाचवण्याची ही लढाई आहे.संविधान, गोरगरीब, कामगार, गृहिणी धोक्यात आहे. आरक्षण धोक्यात आहे आणि सोलापूर देखील धोक्यात आहे. त्यामुळे ही लढाई माझ्या एकटीची नाही. आपल्या सर्वांची सोलापूर वाचवण्याची लढाई आहे, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

मोदी सरकारवर निशाणा

मागील दहा वर्षात हुकूमशाही आणि धमक्या देणारे सरकार आहे. ही निवडणूक नेत्यांनी नाही तर पूर्णपणे लोकांनी ताब्यात घेतली आहे. लोकांना आता भाजप नकोय. त्यांच्या इच्छा आकांशा पूर्ण व्हाव्यात हीच प्रार्थना मी करतेय. लोकांना खूप त्रास सहन करावा लागला. महागाई आणि जीएसटी मुळे दोन वेळचे जेवण कसबस केलं जातंय. ही लढाई केवळ मतदानापुरती नाही. त्यामुळे लोकांचा विजय व्हावा हीच अपेक्षा आहे, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

सोलापुरात प्रचंड ऊन आहे. या उन्हात देखील लोकांनी मला साथ दिली, हीच लोकशाही आहे. आजची रात्र वैऱ्याची आहे. मतदानाला केवळ दोन दिवस राहिलेत. मतदानाचा उत्सव आपण साजरा करूयात, असं आवाहनही प्रणिती यांनी केलं.

लोकांच्या भावना भाजपला कळल्या त्यामुळेच त्यांनी मोदींपासून योगीपर्यंत प्रचारासाठी नेते आणले आहेत. लोक एकत्र आले की आता त्यांना कळेल. हुकूमशाही नाहीतर लोकशाहीची ताकद काय असते ते…, असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.