AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकांच्या भावना भाजपला कळल्या, त्यामुळेच…; प्रणिती शिंदे यांचा भाजपवर हल्लाबोल

Praniti Shinde on BJP and Solapur Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना प्रणिती शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. तसंच निवडणूक, संविधान अन् सोलापूरचा विकास यावर भाष्य. वाचा सविस्तर...

लोकांच्या भावना भाजपला कळल्या, त्यामुळेच...; प्रणिती शिंदे यांचा भाजपवर हल्लाबोल
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: May 05, 2024 | 5:05 PM
Share

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे या सोलापूर जिल्ह्यात दौरा करत आहेत. प्रणिती शिंदे स्थानिकांशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सोलापूर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजप प्रचारात ध्रुवीकरणाचा प्रयत्न करतोय. त्यांच्याकडे बोलण्यासाठी मुद्दे राहिले नाहीत. लोकांच्या भावना भाजपला कळल्या. त्यामुळेच त्यांनी नरेंद्र मोदींपासून योगीपर्यंत प्रचारासाठी नेते आणले आहेत. मागील दहा वर्षात हुकूमशाही आणि धमक्या देणारे सरकार आहे, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

संविधानावर प्रणिती शिंदे म्हणाल्या…

आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. प्रचारात अनेकांनी खांद्याला खांदा लावून साथ दिली. या सर्वांच्या प्रति माझ्या मनात कृतज्ञता आहे. ही लढाई माझ्या एकट्याची नाही. प्रचाराची सांगता बाबासाहेबांच्या अस्थी विहारात होतेय. कारण ही संविधान वाचवण्याची ही लढाई आहे.संविधान, गोरगरीब, कामगार, गृहिणी धोक्यात आहे. आरक्षण धोक्यात आहे आणि सोलापूर देखील धोक्यात आहे. त्यामुळे ही लढाई माझ्या एकटीची नाही. आपल्या सर्वांची सोलापूर वाचवण्याची लढाई आहे, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

मोदी सरकारवर निशाणा

मागील दहा वर्षात हुकूमशाही आणि धमक्या देणारे सरकार आहे. ही निवडणूक नेत्यांनी नाही तर पूर्णपणे लोकांनी ताब्यात घेतली आहे. लोकांना आता भाजप नकोय. त्यांच्या इच्छा आकांशा पूर्ण व्हाव्यात हीच प्रार्थना मी करतेय. लोकांना खूप त्रास सहन करावा लागला. महागाई आणि जीएसटी मुळे दोन वेळचे जेवण कसबस केलं जातंय. ही लढाई केवळ मतदानापुरती नाही. त्यामुळे लोकांचा विजय व्हावा हीच अपेक्षा आहे, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

सोलापुरात प्रचंड ऊन आहे. या उन्हात देखील लोकांनी मला साथ दिली, हीच लोकशाही आहे. आजची रात्र वैऱ्याची आहे. मतदानाला केवळ दोन दिवस राहिलेत. मतदानाचा उत्सव आपण साजरा करूयात, असं आवाहनही प्रणिती यांनी केलं.

लोकांच्या भावना भाजपला कळल्या त्यामुळेच त्यांनी मोदींपासून योगीपर्यंत प्रचारासाठी नेते आणले आहेत. लोक एकत्र आले की आता त्यांना कळेल. हुकूमशाही नाहीतर लोकशाहीची ताकद काय असते ते…, असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या.

Follow Us
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
Omraje Nimbalkar | भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या योग्य! ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा