जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण? बच्चू कडूंच्या दाव्याने एकच खळबळ…म्हणाले राज्यात आजच सर्व्हे करा…सर्वाधिक पसंती याच नेत्याला
Bachchu Kadu big statements: राज्याच्या राजकारणात कधीकाळी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण? यावरून धुमशान उडाले होते. त्यानंतर कुणाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला हे सर्वश्रूत आहे. पण आता राज्यातील जनतेची पसंती कोणत्या नेत्याला आहे यावरून शिवसेनेत दाखल झालेले बच्चू कडू यांनी मोठे भाष्य केले आहे.

Bachchu Kadu on Eknath Shinde: जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदी आल्यावर हमखास विचारण्यात येतो. आता त्यामागील भावना काय हे जनतेला आणि नेत्यांनाच ठाऊक. पण देवाभाऊंच्या काळात या मुद्दावरून मोठा गदारोळ उडालेला आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी यापू्र्वी आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहोत असा दावा केला होता. त्यांच्या दाव्याने त्याकाळी खळबळही उडाली होती. आता तसाच प्रकार पुन्हा समोर आला आहे. प्रहारमधून शिंदे सेनेत दाखल झालेले बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री म्हणून जनतेची पसंती कुणाला आहे, याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या की पक्षाचा अजेंडा पुढे रेटला हे मात्र त्यांनी तपशीलवार सांगतिले नाही.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून प्रार्थना
एकनाथ शिंदे हे रात्री दोन वाजता सामान्यांसाठी दरवाजा उघडणारे नेते आहेत. त्यामुळे अशा ताकतीचा नेता राज्याचा मुख्यमंत्री व्हावा. सध्या सर्वेक्षण जरी केले तरी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावेत. असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे देवाला सकाळी घालण्यापेक्षा आपण जनतेच्या पुढे जाऊन एकत्रित एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रार्थना करू असेही यावेळी बच्चू कडू म्हणाले. आमदार बच्चू कडू हे पंढरपूर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं.
शिवसेनेने शेतकरी भूमिका स्पष्ट करावी
शिवसेनेला शेतकऱ्यांबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. विभागनुसार पीक पद्धती बदलत आहे. त्यामुळे विभागनुसार शिवसेनेने शेतकऱ्यांचे धोरण तयार केले पाहिजे. शिवसेनेने धोरण तयार केले तर त्या शेतकरी धोरणावर सरकारला कसे घेऊन जाता येईल. हे ठरवता येईल. असे म्हणत आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे.
आमदार बच्चू कडू हे आज पंढरपुरात आले होते. पंढरपुरात आल्यावर आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी धोरणाविषयी बोलत असताना. शिवसेनेने शेतकरी धोरण स्पष्ट करावे अशी थेट आणि स्पष्ट मागणी केली आहे. तसेच , आपण आज विठ्ठलाचे दर्शन घेऊन विठ्ठलाकडे इतकेच प्रार्थना केली आहे. की सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्याप्रतीच्या भावना चांगल्या आल्या पाहिजेत. ही प्रार्थना असल्याचेही आमदार बच्चू कडू म्हणाले.
