AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Taliye Landslide : धोकादायक गावांचं पुनर्वसन करणार, नवं धोरण महिनाभरात आणणार : विजय वडेट्टीवार

मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे. दुसरीकडे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही धोकादायक गावांचं पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.

Taliye Landslide : धोकादायक गावांचं पुनर्वसन करणार, नवं धोरण महिनाभरात आणणार : विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री
| Edited By: | Updated on: Jul 24, 2021 | 4:01 PM
Share

महाड : महाडमधील तळीये मधलीवाडी गाव दरड कोसळल्यामुळे उद्ध्वस्त झालं आहे. ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले 40 मृतदेह आतापर्यंत काढण्यात आले आहेत. अजूनही काही मृतदेह मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचा अंदाज जिल्हाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावाला भेट देऊन गावातील परिस्थितीची माहिती घेतली. तसंच मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे. दुसरीकडे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही धोकादायक गावांचं पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. (Dangerous villages will be rehabilitated, a new policy within a month)

परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. तळीये गावातील प्रकार अचानक घडला आहे. अशा गावांचा आढावा घेऊन गावांचं पुनर्वसन करण्याची गरज आहे. या सगळ्यावर कायमस्वरुपी तोडगा काढला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत 38 मृतदेह मिळाले आहेत. हे सगळं प्रचंड वेदनादायी आहे. कुणीही याची कल्पना करु शकत नाही, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. भविष्यात आपल्याला निसर्गाची काळजी घ्यावी लागेल. धोकादायक गावांचं पुनर्वसन करणार, महिनाभरात त्याबाबत नवं धोरण आणलं जाईल, अशी घोषणाही यावेळी वडेट्टीवार यांनी केलीय.

मुख्यमंत्र्यांकडून भरपावसात पाहणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी येताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना घटनेची माहिती दिली. ही माहिती घेत असतानाच जोरदार पावसाला सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांनी भरपावसात हातात छत्री धरून स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांचं सांत्वन करत त्यांना धीर दिला.

कागदपत्रांची चिंता करू नका

या दुर्घटनेत ज्यांचं नुकसान झालं आहे. त्यांचं सर्वांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यांची सर्व कागदपत्रे त्यांना मिळवून देण्यात येणार आहे. तुम्ही काळजी करू नका. आम्ही सर्व मदत करू. फक्त तुम्ही स्वत:ला सावरा, असंही त्यांनी सांगितलं.

डोंगरातील लोकांचं पुनर्वसन करणार

गेल्या काही वर्षांपासूनचा हा अनुभव आहे. आक्रित म्हणावं असं आक्रित घडत आहे. पावसाळ्यात अनपेक्षित घटना घडत आहे. त्यामुळे त्यातून शहाणे होण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षापासून चक्रीवादळानेच पावसाळा सुरू होत असल्याचं दिसून येत आहे. अनेक वस्त्या डोंगरदऱ्यात आहेत. त्यांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. आम्ही फक्त पुनर्वसनाचा विचार करणार नाही. तर त्याचा आराखडा तयार करणार आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

कागदपत्रांची चिंता करू नका, सर्वांना मदत करु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीये गावात, दरड दुर्घटनेची पाहणी

महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

Dangerous villages will be rehabilitated, a new policy within a month

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.