AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बेड माझ्या गुडघ्यापर्यंत उडाला, स्लॅब कोसळला आणि खिडक्यांच्या काचा फुटल्या’, स्फोटानंतर स्थानिकाने सांगितली आपबीती

डोंबिवलीत एमआयडीसी फेज 2 येथे अंबर केमिकल कंपनीत आज बॉयलरचा स्फोट झाला. त्यामुळे एकापोठापाठ एक असे तीन मोठे स्फोट झाले. या स्फोटात आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटामुळे परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्या. जवळपास दोन किमीपर्यंतची जमीन हादरली.

'बेड माझ्या गुडघ्यापर्यंत उडाला, स्लॅब कोसळला आणि खिडक्यांच्या काचा फुटल्या', स्फोटानंतर स्थानिकाने सांगितली आपबीती
डोंबिवली एमआयडीसीत एका कंपनीत भीषण स्फोट झाला
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: May 23, 2024 | 4:20 PM
Share

आपत्तीची झळ भीषण असते. ती किती भीषण असते ते आपण याआधीच्या आपत्तींमधून पाहिलं आहे. डोंबिवतील जी आज भयानक आपत्तीची घटना घडली ती देखील तितकीच भीषण आहे. डोंबिवली एमआयडीसीत फेस टू येथे असलेल्या अंबर केमिकल कंपनीत आज दुपारी भीषण स्फोटाची घटना घडली. या घटनेमुळे मोठा हाहा:कार उडाला. या घटनेत कितपत जीवितहानी झाली आहे ते सध्या तरी समजू शकणं अवघड आहे. कारण अंबर केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्यानंतर एकामागेएक अशा सलग तीन स्फोटांचा आवाज आला. हा आवाज इतका भीषण होता की दोन किमीपर्यंतची जमीन हादरली. अनेक इमारतींच्या काचा फुटल्या. रस्तावर उभ्या असणाऱ्या वाहनांच्या काचा फुटल्या. स्फोटानंतर कंपनीला भीषण आग लागली. या आगीने आजूबाजूच्याही कंपन्यांना भक्ष्य केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्फोटानंतर परिसरातील इमारतींना कशाप्रकारे झळ बसली याची माहिती तिथल्या स्थानिकांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देताना दिली. कल्याण शहराचे काँग्रेस उपाध्यक्ष अजय खैरे हे देखील त्याच परिसरात राहतात. त्यांनी स्फोटानंतरची आपबीती सांगितली. “ही स्फोटाची घटना आज दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास घडली. माझ्या घराचा बेड माझ्या गुडघ्यापर्यंत उडला. घरातल्या काचा सगळ्या फुटल्या आणि स्लॅब पडला. इतका घातक हा स्फोट होता”, असं अजय खैरे यांनी सांगितलं.

“याआधीदेखील दोनवेळा अशा स्फोटाच्या घटना घडल्या आहेत. एकदा इथेच आसपास एक कंपनी होती तिथे स्फोट झाला. तर एकदा जकात नाकाच्या इथे एक कंपनी होती तिथे स्फोट झालाय. तो स्फोट इतका मोठा होता की त्याचा आवाज जवळपास कल्याणपर्यंत गेला होता”, अशी प्रतिक्रिया अजय खैरे यांनी दिली.

दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती

ही दुर्घटना अतिशय भयानक होती. स्फोटानंतर परिसरात असलेल्या इमारतींच्या काचा फुटल्या. विशेष म्हणजे इमारतींच्या ग्राउंड फ्लोअरला असलेल्या दुकानांना असलेले लोखंडी सटर आवाजामुळे निघाले. तसेच गाडीचे काच फुटले. सुदैवाने गाडीचालक या दुर्घटनेत बचावला. अनेक इमारतींचे पत्रे उडाल्याचीदेखील घडना घडली. स्फोट इतका भीषण असल्याने कंपनीत असलेल्या कर्मचाऱ्यांची काय अवस्था असेल याबद्दल आपण विचारही करु शकणार नाहीत. भयानक दुर्घटना आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. हा स्फोट नेमका कशामुळे घडला, नियमांचं पालन गेलं नव्हतं का? या सगळ्या गोष्टी आता तपासातून समोर येतील. पण या दुर्घटनेमुळे गेलेल्या नागरिकांचा प्राण परत कधीच येणार नाही.

Follow Us
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत
'विलास घुले हत्या प्रकरणाशी कुटुंबाचा संबंध नाही'
विलास घुले हत्या प्रकरणाशी कुटुंबाचा संबंध नाही; बजरंग सोनवणे यांचा दावा, सीडीआर पुराव्यासाठी आव्हान
रिक्षाचालकांवरील मराठी सक्तीला राष्ट्रवादीचा विरोध
रिक्षाचालकांवरील मराठी सक्तीला राष्ट्रवादीचा विरोध; पारसनाथ तिवारी न्यायालयात जाणार.
झारखंड विद्यार्थी आंदोलनाचे यश. कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा रद्द
झारखंड विद्यार्थी आंदोलनाचे यश. कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा रद्द
तुकाराम मुंडेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड
तुकाराम मुंडेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड
‘एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते’; हुसेन दलवाईंचा मोठा दावा
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा
मनोज जरांगेंना तीन दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज
मनोज जरांगेंना डिस्चार्ज: मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटीत २९ ऑगस्ट उपोषणाची तयारी
नाशिक TCS प्रकरणातील संशयित आरोपी मतीन पटेलला जामीन
नाशिक TCS प्रकरणातील मतीन पटेलला जामीन मंजूर
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू