AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर नागरिकांचा उद्रेक होईल, मनसे आमदार राजू पाटील यांचा इशारा

डोंबिवलीच्या ग्रामीण भागात पाणी पुरवठा सुरळीत नसल्याने नागरीक त्रस्त आहेत. त्यामुळे नागरिकांनी मनसे आामदार राजू पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

...तर नागरिकांचा उद्रेक होईल, मनसे आमदार राजू पाटील यांचा इशारा
| Edited By: | Updated on: Jul 14, 2021 | 8:48 PM
Share

डोंबिवली (ठाणे) : डोंबिवलीच्या ग्रामीण भागात पाणी पुरवठा सुरळीत नसल्याने नागरीक त्रस्त आहेत. त्यामुळे नागरिकांनी मनसे आामदार राजू पाटील यांच्यासह केडीएमसी आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी लवकरात लवकर पाणी प्रश्न सुटला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. इतकेच नाही तर अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही तर एका दिवशी नागरिकांचा उद्रेक होईल, असा इशाराही मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला.

पाण्यासाठी तासंतास प्रतीक्षा

डोंबिवली पूर्व भागातील काही परिसरात पाणी प्रश्न हा ज्वलंत बनला आहे. नांदीवली टेकडी, देसलेपाडा, भोपर, सागाव या परिसरातील हजारोची लोकसंख्या असलेल्या परिसरात पाणी टंचाईची समस्या आहे. जे पाणी येते त्याचा दाब कमी असतो. पाण्याचा दाब कमी असल्याने नागरीक हैराण झाले आहेत. तासंतास पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. या संदर्भात आज मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी अधिकारी आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांची एक बैठक डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात घेतली. या बैठकीला नागरिकही उपस्थित होते.

पाणी कमी दाबाने का येते? नागरिकांचा अधिकाऱ्यांना सवाल

नागरीक बैठकीदरम्यान संतप्त झाले. पाणी कमी दाबाने का येते? असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला. औद्योगिक भागातील कंपन्यांना पाणी मिळते. नागरीकांना का मिळत नाही? असा सवाल नागरिकांनी केला. लवकरात लवकर ही समस्या सुटली पाहिजे, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.

पाणीप्रश्न नेमका कधी सूटणार?

या प्रकरणावर आमदार राजू पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “सात दिवसात नागरिकांना दिलासा मिळणार आहे. येत्या डिसेंबरपर्यंत एक लाईन टाकण्याचे काम  पूर्ण होईल. त्याचबरोबर अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. पाणी प्रश्न सुटणार, अशी आशा आहे. पाणी प्रश्न सुटला नाही तर नागरीकांचा उद्रेक होईल”, असं राजू पाटील म्हणाले.

अधिकाऱ्यांची भूमिका काय?

याबाबत एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता कालीदास भांडेकर यांनी प्रतिक्रिया दिली. “केडीएमसीचे अभियंता आणि एमआयडीसीचे अभियंता संयुक्त पाहणी करतील. दुर्दैवाने दोन तीन वेळा ब्रेक डाऊन झाल्याने पाण्याचा प्रश्न उद्भवला. लवकर ही समस्या सुटेल”, असं कालीदास भांडेकर म्हणाले (MNS MLA Raju Patil warn administration over water supply).

हेही वाचा : ‘तुझी लायकी नाही, तुझ्यासोबत माझ्या मुलीचे लग्न करणार नाही’, प्रेयसीच्या आईचा दम, नंतर प्रियकराने जे केलं त्याने टिटवाळा हादरलं

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.