AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या सरकारला काहीही करून दंगल पेटवायची’, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

"लोकसभेच्या निकालावरून यांना काही समजलं नाही का? महाराष्ट्राच्या जनतेला हे सगळं आवडत नाही. विकसित भारत आहे आणि आपण त्यात दंगली पेटवत आहोत. काही ना काय कारण घेत दररोज काहीतरी घडवून आणतात", असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

'या सरकारला काहीही करून दंगल पेटवायची', जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
जितेंद्र आव्हाड
| Edited By: | Updated on: Sep 19, 2024 | 6:44 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भिवंडीतील घटनेवरुन महायुती सरकारवर गंभीर आरोप केला आहे. “या सरकारला काहीही करून दंगल पेटवायची आहे”, असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. “मला जे काही भिवंडीमधलं समजलं आणि दोन्ही समाजामधून समजलं की दंगल झाली असती जर या माणसाने मध्ये उडी घेतली नसती आणि या माणसाने उडी घेतली आणि दंगल थांबली आणि दंगल थांबवल्यानंतर हे बक्षीस मिळालं असेल तर पोलिसांच्या खच्चीकरण करण्याचं काम सुरू आहे. अंतर्गत हे देखील मला माहित आहे की, पोलिसांनी देखील याला विरोध केला आहे. तरी देखील बदली करण्यात आली. या मागे तिकडच्या बीजेपीच्या तिथला राजकीय नेता दंगल घडवू इच्छित होता आणि ही दंगल झाली नाही. त्याचे परिणाम डीसीपीला भोगावे लागले. याचा अर्थ स्पष्ट आहे. या सरकारला काहीही करून दंगल पेटवायची आहे आणि पोलिसांना हत्यार म्हणून पुढे पाठवायचं आहे”, असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसेच “मी पोलिसांनाच विनंती करेल. तुम्ही हत्यार बनवू नका. यांना दंगल घडवायची आहे”, असंदेखील जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“भिवंडीच्या डीसीपीची तडकाफडकी बदली, त्याच्यामागे असलेली कारण, याबाबत मी पत्रकार परिषद घेत आहे. गणपती विसर्जनाच्या आधी दंगल होता होता वाचली. पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. सगळ्यांना पळवून लावलं हे काही लोकांना पटलेलं दिसत नाही. त्यामुळे सरकारने त्या पोलीस अधिकाऱ्याची, त्याची उचलबांगडी केली. दंगल थांबवणं हा पोलिसांचा गुन्हा आहे का?”, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.

‘ज्या माणसाने दंगल थांबवली त्याची बदली का केली?’

“पोलीस शिकून येतात तेव्हा या देशाच संविधान हे प्रमाण मानलं जातं. संविधानाच्या विरोधात जाऊन तुम्ही वागू शकत नाही आणि सरकारचं हत्यार तुम्ही बनू शकत नाही. सरकारचा हत्यार म्हणून दंगली घडवून आणणे हे पोलिसांचे काम नाही. ज्या माणसाने दंगल थांबवली त्याची बदली का केली? काही घडलं असतं आणि हत्या झाली असती तर गोष्ट वेगळी आहे. मात्र काही न झाल्याने त्याचं बक्षीस म्हणून त्याची बदली 24 तासाच्या आत केली?”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

‘मुसलमानांनी जगायचं नाही का?’

“लोकसभेच्या निकालावरून यांना काही समजलं नाही का? महाराष्ट्राच्या जनतेला हे सगळं आवडत नाही. विकसित भारत आहे आणि आपण त्यात दंगली पेटवत आहोत. काही ना काय कारण घेत दररोज काहीतरी घडवून आणतात. बिहारमध्ये गोळीबार झालाय, नंतर 80 दलितांची घरे जळण्यात आली. हा जंगलराज आहे का?” असा सवाल आव्हाडांनी केला. तसेच “मुसलमानांनी जगायचं नाही का? त्यांना स्पष्ट सांगा की, तुम्ही देशाचे नागरिक नाहीत. मतदानात तुम्हाला अधिकार नाही. कुठली व्यवस्था मिळणार नाही. मात्र सगळं देऊन उपाशी ठेवणं हे योग्य नाही”, अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.

‘मविआ नेत्यांना विनंती करणार की…’

“मी आता सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती करणार आहे की, सगळ्यांनी एकत्र या. आपण सर्व त्या ठिकाणी जाऊ. देशाचं शोषण करणाऱ्यांविरोधात आपण सगळे उभे राहू. शोषण करताना ते ताकदवान होत गेले तर आपण काहीच करू शकणार नाही. ज्याचं शोषण होतं त्याला आपण ताकद दिली पाहिजे. ती ताकद देताना आपण त्यांच्याबरोबर दिसले पाहिजे. बिहारचे मुख्यमंत्री नितेश कुमार यांच्या मनातला समाजवाद कुठे केला? नितेश कुमार भाजपमध्ये पार्टनर आहेत. यावर भाजपने आपली प्रतिक्रिया दिली पाहिजे. ज्यांच्या समर्थनावरती तुमचं राज्य चालू आहे त्यांच्याच राज्यावरती दलित वस्ती पेटवली गेली आहे. भाजपचे दलितांबद्दल काय विचार आहेत?”, असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.