AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jitendra Awhad : आम्ही आरक्षण आणलं, पण तुम्ही ते वाचवू शकला नाहीत!; जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर हल्लाबोल

NCP MLA Jitendra Awhad on Maratha Reservation : जितेंद्र आव्हाड यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. पैठण ड्रग्ज प्रकरणातील कारवाईवरही आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिलीय. उडता पंजाब नाही तर महाराष्ट्र उडायला लागला आहे, असं आव्हाड म्हणालेत.

Jitendra Awhad : आम्ही आरक्षण आणलं, पण तुम्ही ते वाचवू शकला नाहीत!; जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर हल्लाबोल
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Oct 23, 2023 | 4:23 PM
Share

गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, ठाणे | 23 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं. तेव्हा आम्ही मराठा आरक्षण दिलं होतं. आम्ही आरक्षण आणलं. पण तुम्ही ते वाचवू शकला नाहीत. आरक्षण संदर्भात पहिली मागणी आम्हीच केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्यांवरती टीका करण्यापेक्षा आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी ते द्यावं. 288 आमदार यांना एकत्र करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे जाऊ. लोकसभेत 16 टक्के आरक्षण द्या, म्हणून मागणी करू, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत संविधानिक पदावर असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला गावात येऊ देणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. राज्यात ठिकठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. यावरही जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भात गावकरी कशी वागतीलय या बाबत कोणाचा अधिकार नाही. त्यामुळे सरकारचे मंत्री गावात जर जाऊ शकले नाहीत तर हा सरकारचा मोठा पराभव आहे. आम्ही लोकांच्या बाजूने उभे आहोत, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

पैठण ड्रग्ज प्रकरणी कारवाई झाली आहे. यावरही जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ड्रग्समुळे अनेक घरं आणि तरुण बरबाद होत आहेत. एवढं ड्रग्स येतं कुठून? पोलीस करत काय आहेत? उडता पंजाब नाही तर महाराष्ट्र उडायला लागला आहे. पुढच्या 10 वर्षात महाराष्ट्रातील पोरं ड्रग्जमध्ये फसलेली असतील. हा दोष पोलिसांचा आहे ,पोलिस रोखू शकत नाही पकडून शकत नागी हा पोलिसांचा अपयश आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे सरकारवर घणाघात केला आहे.

ड्रग्जवर योग्य ती कारवाई होत नाही. अनेक ठिकाण ड्रग्जचं रॅकेट चालवलं जात आहे. आम्ही सांगून सुद्धा पोलीस कारवाई करत नाही. इन लिगल ड्रग्स विकला जातो. त्याप्रमाणे इन लीगल बांधकाम देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक वेळा तक्रार केल्या असून सुद्धा कुठलीही कारवाई होत नाही पालिकेकडून देखील योग्य ती कारवाई केली जात नाही. आम्ही बोलून बोलून वैतागलो आहेत. पण यावर कारवाई होत नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

Follow Us
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू