AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन महिन्यांनी दुकानाचं शटर उघडलं, कोल्हापुरातील व्यापाऱ्यांचा फटाके फोडून आनंद साजरा

शासनाच्या निर्णयानंतर आजपासून पात दिवसांसाठी कोल्हापूर शहरातील निर्बंध हटवले गेले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तीन महिन्यातून आज पहिल्यांदाच दुकानांचं शटर उघडलं. यावेळी व्यापाऱ्यांनी फटाके फोडूनआपला आनंद व्यक्त केला.

तीन महिन्यांनी दुकानाचं शटर उघडलं, कोल्हापुरातील व्यापाऱ्यांचा फटाके फोडून आनंद साजरा
कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी तीन महिन्यातून आज पहिल्यांदाच दुकानांचं शटर उघडलं. यावेळी व्यापाऱ्यांनी फटाके फोडूनआपला आनंद व्यक्त केला
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Jul 05, 2021 | 10:22 AM
Share

कोल्हापूरकोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी तब्बल तीन महिन्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. कोरोना संसर्गामुळे मागील तीन महिन्यांपासून दुकाने बंद होती. शासनाच्या निर्णयानंतर आजपासून पात दिवसांसाठी कोल्हापूर शहरातील निर्बंध हटवले गेले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तीन महिन्यातून आज पहिल्यांदाच दुकानांचं शटर उघडलं. यावेळी व्यापाऱ्यांनी फटाके फोडूनआपला आनंद व्यक्त केला. (Three months later Shop open in kolhapur merchants celebrated with fireCrackers)

शहरातील दुकाने उघडायला सुरुवात, व्यापाऱ्यांनी फटाके फोडले

अनेक दिवसांपासून व्यापारी निर्बंध हटवण्याची मागणी करत होते. अखेर व्यापाऱ्यांच्या मागणीला यश आलंय. कोल्हापूर शहरातील सर्व दुकानं उघडायला राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. आजपासून नऊ जुलै पर्यंत सकाळी सात ते सायंकाळी चार या वेळेत उघडता येणार आहे. परवानगी मिळताच व्यापाऱ्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. शहरातील महाद्वार रोड राजारामपुरी अशा मुख्य बाजारपेठेतील दुकाने उघडायला सुरुवात झाली आहे.

पाच दिवसानंतर पुन्हा आढावा घेतला जाणार

पाच दिवसानंतर पुन्हा परिस्थितीचा आढावा घेऊन पुढचा निर्णय घेतला जाणार आहे, असं राज्य शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. तसंच गर्दीचे प्रकार घडल्यास पुन्हा निर्बंध कडक करण्याचा देखील इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय.

राज्य शासनाच्या निर्णयाने व्यापाऱ्यांना दिलासा

कोल्हापूर शहरातील निर्बंध पाच दिवसांसाठी हटवण्याच्या निर्णयाने व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. कारण गेल्या कित्येक दिवसांपासून कोल्हापूर शहरातील व्यापारी निर्बंधांमुळे अडचणीत सापडले होते. राज्य सरकारच्या निर्बंधांमुळे त्यांना दुकानं बंद ठेवावी लागायची. मात्र आता शासनाच्या निर्णयानंतर व्यापाऱ्यांना दिलासा म्हणावा लागेल.

ग्रामीण भागात निर्बंध कायम

कोल्हापूर शहरातील जरी निर्बंध हटवले गेले असले तरी ग्रामीण भागात मात्र निर्बंध कायम आहेत. ग्रामीण भागातील निर्बंध हटण्यासाठी जनतेला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

पालकमंत्री सतेज पाटील काय म्हणाले?

कोल्हापुरातील पॉझिटिव्हिटी रेट आणि रुग्णसंख्या याबाबत प्रभारी जिल्हाधिकारी यांनी शासनाला एक पत्र पाठवलं होतं. जनभावनेचा विचार करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांनी कोल्हापूर शहरातील निर्बंध पाच दिवसासाठी हटवले आहेत. शासनाने जनतेच्या हिताचा निर्णय घेतला आहे. मात्र जनतेने देखील सरकारने घालून दिलेले निर्बंध पाळायला हवेत, असं कोल्हापूर शहराचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

(Three months later Shop open in kolhapur merchants celebrated with fireCrackers)

हे ही वाचा :

कोल्हापूर शहरातील निर्बंध पाच दिवसांसाठी हटवले, राज्य शासनाचा निर्णय; पण पालकमंत्र्यांचं कळकळीचं आवाहन

Follow Us
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?