रोज संध्याकाळी तीन तास टीव्ही, मोबाईल राहणार बंद; या ग्रामपंचायतीने घेतला ठराव

आताच्या काळात मुलाचा व पालकांचा संवाद होत नाही. त्यामुळे मुलांनादेखील अभ्यासाचा ताण वाटत आहे. त्यामुळे अनेक मुले तणावाखाली राहत आहेत. विद्यार्थी तणावमुक्त झाला पाहिजे.

रोज संध्याकाळी तीन तास टीव्ही, मोबाईल राहणार बंद; या ग्रामपंचायतीने घेतला ठराव
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 9:01 AM

कोल्हापूर : जिल्ह्यातील माणगाव या गावाने आपल्या 15 हजार रहिवाशांना वाचनाची सवय वाढवण्याचा संकल्प केला. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधणेसुद्धा गरजेचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुलांमधील गॅझेटची सवय सोडण्यासाठी दररोज संध्याकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत त्यांचे मोबाईल आणि घरातील टीव्ही बंद ठेवण्याचा ठराव मंजूर केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव हे गाव 15 हजार लोकसंखेचे गाव आहे. या गावामध्ये दरवर्षी गावाच्या हितासाठी काही न काही ठराव केला जातो. यावर्षी महिला दिनानिमित्त गावचे सरपंच राजू मगदूम व सदस्यांनी गावातील रात्री ६ ते ९ या दरम्यान मोबईल घरातील टीव्ही बंद ठेवण्याचा संकल्प केला. मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. आपला व आपल्या मुलाचा संवाद झाला पाहिजे, असा एकमुखी निर्णय घेतला आहे.

आताच्या काळात मुलाचा व पालकांचा संवाद होत नाही. त्यामुळे मुलांनादेखील अभ्यासाचा ताण वाटत आहे. त्यामुळे अनेक मुले तणावाखाली राहत आहेत. विद्यार्थी तणावमुक्त झाला पाहिजे. आपला अभ्यास व आई वडिलांकडे लक्ष दिले पाहिजे. या अनुषंघाने माणगाव गावातील सरपंच राजू मगदूम व सदस्यांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे गावकऱ्यांनी स्वागत केले आहे.

सायंकाळी सहा वाजता वाजेल सायरन

ग्रामपंचायत इमारतीच्या वरच्या बाजूला एक सायरन बसवण्यात आला आहे. तो दररोज संध्याकाळी 6 वाजता वाजेल. ग्रामस्थांना इलेक्ट्रॉनिक गॅझेट बंद करण्यास सांगतील. तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी तसेच ग्रामपंचायत सदस्य सुरुवातीला जनजागृती करण्यासाठी घरोघरी भेट देणार आहेत. लोकांना गॅझेट न वापरण्यास सांगणार आहेत. त्याऐवजी कुटुंबातील सदस्यांशी गप्पा मारा किंवा पुस्तक वाचा, असे आवाहन करणार आहेत. संध्याकाळी ७ च्या सुमारास सायरन वाजवून नागरिकांना सूचना दिली जाईल. पाच वेळा कुटुंबाला सूचना दिली जाईल. जे कुटुंब या नियमाचे पालन करणार नाहीत, कुटुंबाने सहाव्यांदा नियमाचे उल्लंघन केल्यास मालमत्ता कर वाढीच्या स्वरूपात दंड आकारला जाईल.

गावाला मिळाले अनेक पुरस्कार

ग्रामपंचायतीने परिसरातील केबल ऑपरेटरना दररोज संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत त्यांची सेवा खंडित करण्यासाठी पत्र लिहिले आहे. ज्यांच्याकडे DTH कनेक्शन आहे त्यांना त्यांचे टीव्ही सेट बंद करण्याचे आवाहन केले. तसेच या गावामध्ये स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येते. त्यामुळे या गावाला आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच गावामध्ये फिल्टर पाण्याचे प्लांटही बसवण्यात आले आहेत. माणगाव हे गाव कायम कोणत्याना कोणत्या निर्णयामुळे कायम चर्चेत असते. आता ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

Non Stop LIVE Update
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.