AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NICU बेडसाठी मुंबई-ठाण्यात चकरा मारल्या पण नको तेच घडलं…, उल्हासनगरमध्ये नवजात बाळाने सोडले प्राण

उल्हासनगर शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक आरोप; आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळले.

NICU बेडसाठी मुंबई-ठाण्यात चकरा मारल्या पण नको तेच घडलं..., उल्हासनगरमध्ये नवजात बाळाने सोडले प्राण
ulhasnagar hospital
| Updated on: Jun 05, 2026 | 11:08 AM
Share

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हानगरच्या रुग्णालयात NICU आणि बालकांसाठी विशेष व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध नसल्याने एका नवजात चिमुकलीचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे उल्हासनगरच्या आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे, रुग्णालय प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. बाळाचे वजन अत्यंत कमी असल्याने त्याला वाचवणे वैद्यकीयदृष्ट्या अशक्य होते, असा दावा रुग्णालयाने केला आहे.

नेमकं काय घडलं?

उल्हासनगर येथे राहणाऱ्या नाजीरा धिरेंद्र राजभर यांनी एका खासगी रुग्णालयात अत्यंत कमी वजनाच्या कन्येला जन्म दिला. या चिमुकलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला तातडीने NICU म्हणजे नवजात शिशु अतिदक्षता विभाग आणि बालकांसाठीच्या विशेष व्हेंटिलेटरची गरज होती. नातेवाईकांनी तिला तात्काळ उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. मात्र, या ठिकाणी हवी तशी अत्याधुनिक यंत्रणा नव्हती. त्यामुळे हताश झालेल्या वडिलांनी मुलीचे प्राण वाचवण्यासाठी मुंबईतील वाडिया, सायन आणि कळवा रुग्णालयांचे उंबरठे झिजवले. परंतु कुठेच वेळेत बेड आणि उपचार न मिळाल्याने या चिमुकलीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.

या दुर्दैवी घटनेनंतर भाजप नगरसेविका सुचित्रा सिंह यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री आणि आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. शहापूर, मुरबाड, कर्जत, बदलापूर आणि उल्हासनगर परिसरातील हजारो गरीब रुग्णांसाठी हे मध्यवर्ती रुग्णालय एकमेव मोठा आधार आहे. असे असतानाही येथे बालकांसाठी अत्यावश्यक सुविधा का नाहीत? असा संतप्त सवाल सुचित्रा सिंह यांनी केला आहे. तसेच या रुग्णालयात तातडीने सुसज्ज NICU विभाग सुरु करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

रुग्णालयावरील आरोप चुकीचे

तर दुसरीकडे, मध्यवर्ती रुग्णालयाचे अधीक्षक मनोहर बनसोडे यांनी प्रशासनाची बाजू स्पष्ट केली आहे. २९ तारखेला रात्री ९ च्या सुमारास या बाळाला रुग्णालयात आणण्यात आले होते. ते बाळ ५ ते ६ महिन्यांचे होते. त्याचे वजन अवघे ५०० ग्रॅम होते. त्यामुळे हे बाळ वाचवणे अत्यंत कठीण होते. रुग्णालयातील सीपॅप (CPAP) यंत्रणेवर बाळाला ठेवून सर्वतोपरी उपचार करण्यात आले. यानंतर वाडिया रुग्णालयात विशेष NICU व्हेंटिलेटरसाठी संदर्भ करण्यात आला होता. मात्र तिथे बेड उपलब्ध नव्हता. डॉक्टरांनी बाळाला वाचवण्याचे सर्व प्रामाणिक प्रयत्न केले असून रुग्णालयावरील आरोप चुकीचे आहेत, असे डॉक्टरांनी सांगितले.

Follow Us
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा