AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TV9 Poll : गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेसची अवस्था आणखी दयनीय होईल?; वाचा पोल काय सांगतो?

पाच राज्यातील पराभवानंतर काँग्रेस (congress) अंतर्गत कलह समोर आला आहे. पाचही राज्यातील पराभवावर काँग्रेस हायकमांडने चिंतन सुरू केलेलं असतानाच काँग्रेसच्या काही नेत्यांनी थेट गांधी कुटुंबाने (gandhi family) पक्षाचं नेतृत्व सोडण्याची मागणी केली आहे.

TV9 Poll : गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेसची अवस्था आणखी दयनीय होईल?; वाचा पोल काय सांगतो?
गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेसची अवस्था आणखी दयनीय होईल?; वाचा पोल काय सांगतो?Image Credit source: tv9 hindi
| Updated on: Mar 16, 2022 | 12:36 PM
Share

मुंबई: पाच राज्यातील पराभवानंतर काँग्रेस (congress) अंतर्गत कलह समोर आला आहे. पाचही राज्यातील पराभवावर काँग्रेस हायकमांडने चिंतन सुरू केलेलं असतानाच काँग्रेसच्या काही नेत्यांनी थेट गांधी कुटुंबाने (gandhi family) पक्षाचं नेतृत्व सोडण्याची मागणी केली आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेसला खरोखरच काही अस्तित्व राहणार आहे का? गांधी कुटुंबाला नेतृत्वापासून बाजूला केलं तर काँग्रेसमध्ये पक्षाची धुरा सांभाळणारा कोणी नवा चेहरा आहे का? नव्या नेतृत्वामुळे काँग्रेसला कितपत नवसंजीवनी मिळेल? नवं नेतृत्व मोदी-शहांच्या भाजपला (bjp) रोखू शकेल का? असे सवाल या निमित्ताने केले जात आहेत. ‘टीव्ही9 मराठी’नेही गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेसची अवस्था आणखी दयनीय होईल? असा सवाल करणारा पोल घेतला होता. त्यात 54 टक्के लोकांनी ‘होय’ असं उत्तर दिलं. याचा अर्थ गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेसला काहीच अर्थ उरणार नसल्याचं या लोकांचं म्हणणं आहे.

पाच राज्यातील निवडणुका, काँग्रेस नेत्यांची विधाने या पार्श्वभूमीवर ‘टीव्ही 9 मराठी’ने एक पोल घेतला. गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेसची अवस्था आणखी दयनीय होईल? असा सवाल या पोलमधून करण्यात आला होता. ‘होय’, ‘नाही’ आणि ‘सांगता येत नाही’ असे पर्याय मतांसाठी देण्यात आले होते. शिवाय हा पोल युट्यूबवर 17 तास ठेवण्यात आला होता. या पोलमध्ये 64 हजार 935 लोकांनी भाग घेतला होता. या 17 तासातील आलेली ही आकडेवारी बरंच काही सांगून जाणारी आहे. गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेसची अवस्था आणखी दयनीय होईल? असा सवाल केला असता त्याला 54 टक्के लोकांनी ‘होय’ असं उत्तर दिलं. 37 टक्के लोकांनी ‘नाही’ असं उत्तर दिलं तर 9 टक्के लोकांनी ‘सांगता येत नाही’, असं उत्तर दिलं. यावरून गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेसचं अस्तित्व नगण्य असल्याचंही या पोलमधून स्पष्ट होत आहे.

poll

poll

सिब्बल नेमकं काय म्हणाले होते?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत देताना थेट काँग्रेस नेतृत्वावरच प्रश्नचिन्हं उपस्थित केले होते. गांधी कुटुंबाने आता काँग्रेसचं नेतृत्वं सोडावं आणि इतरांना संधी द्यावी. काँग्रेस सर्वांचीच व्हायला हवी, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली आहे.

आता कुटुंबाची काँग्रेस ऐवजी सर्वांची काँग्रेस होण्याची गरज आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाचे मला आश्चर्य वाटले नाही. त्याचा मला आधीच अंदाज होता. 2014पासून आमची सातत्याने घसरण होत आहे. आम्ही एकापाठोपाठ एक राज्य गमावत आहोत. ज्या राज्यात आम्हाला यश मिळालं, तिथले कार्यकर्तेही सोबत ठेवण्यात आम्ही अपयशी ठरलो. या दरम्यान काँग्रेसचे प्रमुख नेते गायब झाले आहेत. जे नेतृत्व करू शकत होते ते काँग्रेसपासून दूर जात आहेत. 2022च्या विधानसभा निवडणुकीतही नेतृत्व करू शकणारे नेते सोडून गेले आहेत. मी आकडे पाहत होतो. त्यातून आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. 2014पासून आतापर्यंत 177 खासदार, आमदारांसह आणि सुमारे 222 उमेदवार काँग्रेसला सोडून गेले आहेत. कोणत्याही राजकीय पक्षातून एवढ्या मोठ्या प्रमाणवर नेते सोडून गेल्याचं कधीच पाहिलं नाही, असं कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या:

गावसकर, सचिन, विराटसारखे दिग्गजही संन्यास घेतात, मग आपण काँग्रेसची धुरा नव्या नेतृत्वाकडे का देत नाही?; सिब्बल यांचा सवाल

गांधी कुटुंबाने काँग्रेसचं नेतृत्व सोडावं, आता इतरांना संधी द्या; कपिल सिब्बल यांचा गांधी कुटुंबाला मोठा झटका

मोदींची सत्ता आल्यापासून किती खासदार आणि आमदार काँग्रेसला सोडून गेले; कपिल सिब्बल यांनी सांगितला नेमका आकडा

Follow Us
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्... पुढे काय घडलं?
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
Bhandara | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण....
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
Supriya Sule | छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत...
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत मोठी खलबत
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते.
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते टार्गेट, राजकारण तापलं
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग
DCM Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग, चर्चांना उधाण!